शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

नियोजनबद्ध शेती; गतवर्षी पेटविलेल्या तुरीचे यंदा घेतले विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 14:33 IST

सोलापूर : तुरीच्या काढणीचा खर्च परवडत नाही म्हणून गतवर्षी तुरीच्या उभ्या पिकाला पेटवून देणाºया अक्कलकोट तालुक्यातील बासलेगांव येथील शेतकºयाने ...

ठळक मुद्देकर्नाटकात जास्त दर मिळतो म्हणून केले धाडस२१ एकरांत २१० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले राज्यात ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जाते तर कर्नाटकात ६१०० रुपये दर

सोलापूर : तुरीच्या काढणीचा खर्च परवडत नाही म्हणून गतवर्षी तुरीच्या उभ्या पिकाला पेटवून देणाºया अक्कलकोट तालुक्यातील बासलेगांव येथील शेतकºयाने यंदा धाडस करून २१ एकरात २१० क्विंटल इतके तुरीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कर्नाटकात तुरीला महाराष्टÑापेक्षा जास्त प्रती क्विंटल ६१०० हमीभाव असल्याने या शेतकºयाने पुन्हा तूर पिकविण्याचे धाडस केले आहे.

गतवर्षी पाऊसमान चांगला असल्याने राज्यात तुरीचे बंपर उत्पादन झाले होते़ त्यामुळे तुरीचा बाजारभाव अतिशय कमी झाला होता़ राज्य सरकारने शेतकºयांच्या मागणीमुळे राज्यात ठिकठिकाणी तूर खरेदीची केंद्रे सुरू केली होती़ तुरीला प्रति क्विंटल ४५०० रुपये हमीभाव जाहीर केला होता, तरीही व्यापाºयांनी ३ हजार ते ३ हजार ३०० रुपये क्विंटल दराने तुरीची खरेदी सुरू केली़ राज्यभर या प्रकाराचा शेतकºयांनी निषेध नोंदवला़ अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव येथील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी दहा एकरांवर तुरीचे पीक घेतले होते़ तुरीच्या काढणीचा खर्च आणि तुरीचा बाजारातील दर यांचा ताळमेळ बसत नसल्याने बिराजदार यांनी दहा एकर क्षेत्रातील तुरीचे उभे पीक पेटवून दिले आणि शासनाचा निषेध नोंदवला होता.

यंदा शशिकांत बिराजदार यांनी पुन्हा दहा एकर क्षेत्रात तुरीचे पीक घेतले़ २४ जून रोजी पिंकू या वाणाची टोकन पद्धतीने लावण केली़ जून-जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण बºयापैकी होत़े़ त्यामुळे तुरीचे पीक जोमदार आले़ आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिली़ त्यामुळे बिराजदार यांनी एक पाण्याची पाळी दिली़ मजुरांचा प्रश्न गंभीर असल्याने ट्रॅक्टरच्या साह्याने दोन वेळा कुळव मारले़ कीड व्यवस्थापनासाठी तीन वेळा कीटकनाशकाची फवारणी केली़ वातावरण आणि हवामान उत्तम असल्याने तुरीची चांगली वाढ झाली़ नुकतीच या तुरीची हार्वेस्टरच्या साह्याने काढणी करण्यात आली आहे.

२१ एकरांत २१० क्विंटल तुरीचे उत्पादन झाले आहे़ महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्रे  सुरू करण्यात आली आहेत़ तरीही व्यापारी शेतकºयांकडून अतिशय कमी दराने तुरीची खरेदी करीत आहेत़ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झालेला हमीभाव केंद्रात आजही तुरीचे दर कमीच आहेत. राज्यात ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने तूर खरेदी केली जाते तर कर्नाटकात ६१०० रुपये दर आहे़ एका खातेदाराच्या नावे २० क्विंटल तूर खरेदी केली जाते. त्यामुळे सीमावर्ती भागातील अक्कलकोट-दक्षिण सोलापूर तालुक्यातून अनेक शेतकरी आपली तूर कर्नाटकात विक्रीसाठी पाठवत आहेत़ नातलगांच्या नावे या तुरीची विक्री करण्यात येत आहे़

लक्ष वेधले; पण पणन विभागाने दुर्लक्ष केले!महाराष्ट्र आणि कर्नाटकात हमी  भाव केंद्रात खरेदी केल्या जाणाºया तुरीचे दर वेगवेगळे असल्याने महाराष्ट्रातील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत़ शशिकांत बिराजदार यांनी याप्रकरणी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ परंतु अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने आणि पणन विभागाने त्यांना बेदखल केले़ त्यामुळेच ही तूर कर्नाटकाच्या केंद्रात विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे़ 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड