शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

मतदानावेळी नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडेच असल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:22 IST

मोहोळ विधानसभा मतदारसंघ : टक्का घटला तरी २० हजारांनी मतदान वाढले

ठळक मुद्देअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झालेया निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला

अशोक कांबळे 

मोहोळ : होणार होणार म्हणून बहुचर्चित विधानसभेची निवडणूक यंदा एकदाची संपलीही.  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळविधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झाले असले तरी सन २०१९ मध्ये मतदानाचा आकडा २० हजाराने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. 

सन २०१४ मध्ये २ लाख ८० हजार ३७७ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ५३६ इतके मतदान झाले होते. त्याची टक्केवारी ६६.८६ इतकी होती. तर नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ६५.६२ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. गत निवडणुकीपेक्षा १ टक्का मतदान जरी कमी दिसत असले तरी २० हजार ४५८ मतदान या निवडणुकीत वाढले आहे.

मतदारसंघात शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. त्यामुळे सकाळच्या पहिल्या दोन तासात मतदारांची गैरसोय झाली, परंतु सकाळी ११ नंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. 

मतदारसंघातील कोळेगाव, कुरुल, सावळेश्वर, खुनेश्वर, अर्जुनसोंड, आष्टी या ६ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, परंतु सहायक निवडणूक अधिकारी जीवन बनसोडे व निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी तातडीने मशीन बदलून मतदान सुरळीत पार पडले. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

निवडणूक  प्रचारात तालुक्याच्या स्थानिक राजकारणातील एकमेकांची गटबाजी, एकमेकांच्या गटबाजीतून मतांची कशी होईल विभागणी, एकमेकांचे पाठिंबे यावरून एकमेकांची उणीदुणी काढण्यातच सर्वांनी धन्यता मानल्याचे चित्र प्रचारात दिसून आले. या निवडणूक प्रचारात नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असे चित्र निर्माण झाल्याने सुज्ञ मतदार व नवीन वाढलेल्या युवा मतदारांनी नेमका काय निर्णय घेतलाय हे २४ तारखेला मतमोजणीनंतरच समजणार आहे.

ठोस मुद्यांची वानवा- मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत वंचित राहिल्याचे दिसत आहे.आजही  ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आष्टी उपसा सिंचन योजना, पोखरापूर तलावात पाणी सोडणे, शिरापूर उपसा सिंचन योजना, ५० वर्षांपासून रखडलेला मोहोळ शहराच्या कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, याबाबतचा ठोस अजेंडा घेऊन कोणीच प्रचारात उतरलेले दिसून आले नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोळvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण