शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

मतदानावेळी नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडेच असल्याचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:22 IST

मोहोळ विधानसभा मतदारसंघ : टक्का घटला तरी २० हजारांनी मतदान वाढले

ठळक मुद्देअनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झालेया निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला

अशोक कांबळे 

मोहोळ : होणार होणार म्हणून बहुचर्चित विधानसभेची निवडणूक यंदा एकदाची संपलीही.  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मोहोळविधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या तुलनेत १ टक्का मतदान कमी झाले असले तरी सन २०१९ मध्ये मतदानाचा आकडा २० हजाराने वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. या निवडणुकीमध्ये नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असल्याचे चित्र प्रक र्षाने दिसून आले. 

सन २०१४ मध्ये २ लाख ८० हजार ३७७ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ५३६ इतके मतदान झाले होते. त्याची टक्केवारी ६६.८६ इतकी होती. तर नुकत्याच पार पडलेल्या मतदानात एकूण ३ लाख ५ हजार ४८० मतदारांपैकी २ लाख ४५८  मतदारांनी मताचा हक्क बजावला आहे. त्याची टक्केवारी ६५.६२ टक्के इतकी नोंदविली गेली आहे. गत निवडणुकीपेक्षा १ टक्का मतदान जरी कमी दिसत असले तरी २० हजार ४५८ मतदान या निवडणुकीत वाढले आहे.

मतदारसंघात शहरासह तालुक्यात रविवारी रात्रीपासूनच पाऊस सुरु होता. त्यामुळे सकाळच्या पहिल्या दोन तासात मतदारांची गैरसोय झाली, परंतु सकाळी ११ नंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. 

मतदारसंघातील कोळेगाव, कुरुल, सावळेश्वर, खुनेश्वर, अर्जुनसोंड, आष्टी या ६ ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, परंतु सहायक निवडणूक अधिकारी जीवन बनसोडे व निवडणूक नायब तहसीलदार राजशेखर लिंबारे यांनी तातडीने मशीन बदलून मतदान सुरळीत पार पडले. त्यामुळे कुठेही अनुचित प्रकार न घडता मतदान शांततेत पार पडले.

निवडणूक  प्रचारात तालुक्याच्या स्थानिक राजकारणातील एकमेकांची गटबाजी, एकमेकांच्या गटबाजीतून मतांची कशी होईल विभागणी, एकमेकांचे पाठिंबे यावरून एकमेकांची उणीदुणी काढण्यातच सर्वांनी धन्यता मानल्याचे चित्र प्रचारात दिसून आले. या निवडणूक प्रचारात नेते एकीकडे तर मतदार दुसरीकडे असे चित्र निर्माण झाल्याने सुज्ञ मतदार व नवीन वाढलेल्या युवा मतदारांनी नेमका काय निर्णय घेतलाय हे २४ तारखेला मतमोजणीनंतरच समजणार आहे.

ठोस मुद्यांची वानवा- मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत वंचित राहिल्याचे दिसत आहे.आजही  ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, आष्टी उपसा सिंचन योजना, पोखरापूर तलावात पाणी सोडणे, शिरापूर उपसा सिंचन योजना, ५० वर्षांपासून रखडलेला मोहोळ शहराच्या कायमस्वरुपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, याबाबतचा ठोस अजेंडा घेऊन कोणीच प्रचारात उतरलेले दिसून आले नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरmohol-acमोहोळvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण