शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

चुरस असली तरी मतदानाची टक्केवारी ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:16 IST

बार्शी विधानसभा मतदारसंघ; तिन्ही उमेदवारांनी करून घेतले मतदान

ठळक मुद्देमतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरूग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झालेमतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : विधानसभा निवडणुकीत बार्शीविधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांपूर्वी झाले एवढेच म्हणजे ७२ टक्के मतदान झाले आहे़ मतदान प्रक्रिया ही सुरळीतपणे मात्र थोडीशी संथगतीने झाली असली तरी तालुक्यात महायुती, अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही उमेदवारांनी चुरशीने मतदान करून घेतले आहे़ यंदा तालुक्यात कुठेही भांडण-तंटे किंवा अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष़ बार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांच्याशिवाय इतर ११ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

तालुक्याच्या राजकारणात सोपल व राऊत हे दोन गट प्रबळ आहेत़ त्यात यंदा प्रथमच वैराग भागातील असलेले निरंजन भूमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब अजमावत आहेत़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील ७२ टक्के मतदान होते़ यंदा देखील ७२़३९ टक्केच मतदान झाले आहे़ केवळ मतदान वाढलेले असल्यामुळे आकड्याच्या खेळात दहा हजार मतदान हे जास्त झाले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत असलेल्या दिलीप सोपल यांनी पक्ष बदलत शिवसेनेत प्रवेश केला व महायुतीची उमेदवारी मिळवली़ त्यामुळे भाजपमध्ये असलेले राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून निवडणूक लढवली़ राष्ट्रवादीत असलेल्या निरंजन भूमकर यांनी सोपल यांच्या पाठीमागे न जाता राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन प्रथमच वैराग भागातील उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक यंदा सर्वार्थाने वेगळी अशी आहे.

मतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

तालुक्यात सर्वाधिक नव्वद  टक्के मतदान हे गाताचीवाडी या गावात झाले तर सर्वात कमी मतदान ५७ टक्के हे शहरातील १३० नंबर केंद्रावर झाले़ ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झाले आहे.

५० हजारांपर्यंत लागल्या पैजा- मतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरू असून, आमच्या गावात बाण चालला बघा़़़ अन् तुमच्या गावात ट्रॅक्टरची लय हवा होती, असं ऐकायला आलंय ते खरं हाय का अशा आशयाचे संवाद बोलले जात आहेत़ अनेक ठिकाणी शंभर रुपयांपासून दहा ते पन्नास हजारांपर्यंत पैजा देखील लागल्या आहेत़ 

८२२ दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्कतालुक्यात असलेल्या पुरुष १,५९,६५९ पैकी १,१७,००९ यांनी तर महिला १,४६,२४० पैकी १,०४,४३४ आणि ११ पैकी ६ इतर असे एकूण ३,०५,९२० पैकी २,२१,४५२ मतदारांनी मतदान केले़ यामध्ये ११६१ दिव्यांगांपैकी ८२२ दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला़ 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपलbarshi-acबार्शी