शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

चुरस असली तरी मतदानाची टक्केवारी ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:16 IST

बार्शी विधानसभा मतदारसंघ; तिन्ही उमेदवारांनी करून घेतले मतदान

ठळक मुद्देमतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरूग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झालेमतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून

शहाजी फुरडे-पाटील 

बार्शी : विधानसभा निवडणुकीत बार्शीविधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षांपूर्वी झाले एवढेच म्हणजे ७२ टक्के मतदान झाले आहे़ मतदान प्रक्रिया ही सुरळीतपणे मात्र थोडीशी संथगतीने झाली असली तरी तालुक्यात महायुती, अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही उमेदवारांनी चुरशीने मतदान करून घेतले आहे़ यंदा तालुक्यात कुठेही भांडण-तंटे किंवा अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष़ बार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे दिलीप सोपल, अपक्ष राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर यांच्याशिवाय इतर ११ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत.

तालुक्याच्या राजकारणात सोपल व राऊत हे दोन गट प्रबळ आहेत़ त्यात यंदा प्रथमच वैराग भागातील असलेले निरंजन भूमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब अजमावत आहेत़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देखील ७२ टक्के मतदान होते़ यंदा देखील ७२़३९ टक्केच मतदान झाले आहे़ केवळ मतदान वाढलेले असल्यामुळे आकड्याच्या खेळात दहा हजार मतदान हे जास्त झाले आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत असलेल्या दिलीप सोपल यांनी पक्ष बदलत शिवसेनेत प्रवेश केला व महायुतीची उमेदवारी मिळवली़ त्यामुळे भाजपमध्ये असलेले राजेंद्र राऊत यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरून निवडणूक लढवली़ राष्ट्रवादीत असलेल्या निरंजन भूमकर यांनी सोपल यांच्या पाठीमागे न जाता राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन प्रथमच वैराग भागातील उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक यंदा सर्वार्थाने वेगळी अशी आहे.

मतदानाचा टक्का मागील वेळेप्रमाणे कायम असला तरी  वाढलेले दहा हजार मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे.

तालुक्यात सर्वाधिक नव्वद  टक्के मतदान हे गाताचीवाडी या गावात झाले तर सर्वात कमी मतदान ५७ टक्के हे शहरातील १३० नंबर केंद्रावर झाले़ ग्रामीण भागात जवळपास प्रत्येक केंद्रावर ६० ते ८८ टक्के मतदान झाले आहे तर शहरी भागात ५७ ते ७५ टक्के मतदान झाले आहे.

५० हजारांपर्यंत लागल्या पैजा- मतदान झाल्यानंतर या निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत गावागावात व चौकाचौकात घोळक्याद्वारे चर्चा सुरू असून, आमच्या गावात बाण चालला बघा़़़ अन् तुमच्या गावात ट्रॅक्टरची लय हवा होती, असं ऐकायला आलंय ते खरं हाय का अशा आशयाचे संवाद बोलले जात आहेत़ अनेक ठिकाणी शंभर रुपयांपासून दहा ते पन्नास हजारांपर्यंत पैजा देखील लागल्या आहेत़ 

८२२ दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्कतालुक्यात असलेल्या पुरुष १,५९,६५९ पैकी १,१७,००९ यांनी तर महिला १,४६,२४० पैकी १,०४,४३४ आणि ११ पैकी ६ इतर असे एकूण ३,०५,९२० पैकी २,२१,४५२ मतदारांनी मतदान केले़ यामध्ये ११६१ दिव्यांगांपैकी ८२२ दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावला़ 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणDilip Sopalदिलीप सोपलbarshi-acबार्शी