शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मिरचीला भाव मिळाला नाही अन् खरबूज विक्रीअभावी जागेवर सडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 13:28 IST

कोरोनाचं संकट; रानमसलेच्या वसंत पाटील या शेतकºयाची व्यथा

ठळक मुद्देमोजक्या शेतकºयांना शेती उत्पादनातून चांगला पैसा मिळतोअपेक्षित उत्पादन न आल्याने व मालाला अपेक्षित भाव मिळत नाहीयावर्षी तर कोरोनामुळे संपूर्ण शेती नुकसानीत आहे

अरुण बारसकर

सोलापूर : अद्ययावत शेतीतून चांगले उत्पादन घेण्यासाठी मल्चिंग व ठिबकच्या सहाय्याने ढोबळी मिरची व खरबुजाचे पीक घेतले. मिरचीला दर मिळाला नाही व खरबूज कोरोनामुळे जागेवरच सडले. ही व्यथा आहे रानमसले येथील वसंत रामा पाटील यांची.

उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावालगत वसंत पाटील यांची चार एकर शेती. पत्नी, दोन मुले व सुना शेतातच राबतात. मुलगा सचिन व संतोष यांनी एक एकर ढोबळी सिमला मिरची केली. त्यासाठी रान तयार केले, त्यावर मल्चिंग कागद टाकला. नव्याने ठिबक केले व मिरची लावली. चांगली मिरची येण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे खते दिली. शिवाय आवश्यक तेवढ्या फवारण्याही केल्या. 

मिरचीचे पीक जोमात आणले. आता चांगला पैसा होईल असे वाटत असतानाच मिरचीला दरच मिळाला नाही. तोडणीचा खर्चही मिरचीच्या विक्रीतून होत नसल्याने तोडणीच बंद केली. मिरचीसाठी मल्चिंग, ठिबक, खते व रोपांसाठी साधारण  तीन लाख रुपये खर्च झाल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.

अशीच स्थिती खरबुजाचीही झाली. रान तयार करुन मल्चिंग व ठिबकसाठी खर्च करुन पावणेदोन एकरात ११ हजार खरबुजाची रोपे लावली. आवश्यक खते, फवारण्या केल्याने दर्जेदार खरबूज आले. अशी विक्री सुरू होणार इतक्यात कोरोनामुळे संचारबंदी लागू झाली. बाजारात विक्रीसाठी घेऊन जाता येईना व सभोवतालच्या गावात विक्रीसाठी गेल्यावर गावकºयांकडून वाहनाची अडवणूक झाली. पोलीसही वाहने अडवू लागले. त्यामुळे खरबूज जागेवरच सडले. खरबूज पीक घेण्यासाठी दोन-अडीच लाख रुपये खर्च झाला; मात्र थोड्याफार विक्रीतून ५० हजार रुपये मिळाल्याचे सचिन पाटील यांनी सांगितले.

खर्चही निघाला नाही- सलग तीन वर्षे वेगवेगळ्या पिकांसाठी  आठ ते दहा लाख रुपये खर्च केला; मात्र केलेला खर्चही उत्पादन विक्रीतून निघाला नाही. एकतर पाण्याची अडचण त्यातून तुटपुंज्या पाण्यावर आणलेल्या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे अडचणीत आलो, असल्याची व्यथा रानमसलेचे शेतकरी वसंत पाटील यांनी व्यक्त केली. 

मोजक्या शेतकºयांना शेती उत्पादनातून चांगला पैसा मिळतो; मात्र बहुतांश शेतकरी खर्च करूनही अपेक्षित उत्पादन न आल्याने व मालाला अपेक्षित भाव मिळत नाही. यावर्षी तर कोरोनामुळे संपूर्ण शेती नुकसानीत आहे.- प्रभाकर देशमुख, जनहित शेतकरी संघटना

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेतीFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार