शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील; आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:55 IST

अक्कलकोट तालुका टंचाई आढावा बैठक

ठळक मुद्देप्रत्येकाने शिवारात पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी योजना राबवावीअक्कलकोट तालुक्याची दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरूदुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. म्हेत्रे यांनी केले

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्याची दुष्काळी परिस्थितीकडे वाटचाल सुरू आहे. दुष्काळीप्रसंगी पाणी न दिल्यास लोक जोड्याने मारतील अशी भीती आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी व्यक्त केली.

 अक्कलकोट तालुका टंचाई आढावा बैठकीत म्हेत्रे बोलत होते. यावेळी तहसीलदार अंजली मरोड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवानंद पाटील, पंचायत समिती सभापती सुरेखा काटगाव, गटविकास अधिकारी कोळी, उपसभापती प्रकाश हिप्परगी, महादेव बेळ्ळे, राजेंद्र बंदीछोडे, के. पी. पिरजादे, गुंडप्पा पोमाजी,तालुका कृषी अधिकारी राम फडतरे, प्रदीप जगताप, प्रदीप पाटील,अरुण जाधव,तालुका कृषी अधिकारी राम फडतरे,तलाठी संघटना अध्यक्ष ए पी पाटील,  नूरधीन मुजावर, रमेश भासगी, निगप्पा कोळी यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.

प्रत्येकाने शिवारात पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी योजना राबवावी. त्यासाठी प्रत्येकाने जिद्दीने कामाला लागावे. राजकारण बाजूला सारून लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. म्हेत्रे यांनी केले.उपाध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले, नाविंदगी, नागणसूर, शावळ, गौडगाव (बु.) या गावांनी वीज बिल न भरल्यामुळे शावळ येथे असलेले पंपहाऊस बंद आहे. पन्नास टक्के बिल जिल्हा परिषद भरण्यास तयार आहे, त्याचा प्रस्ताव द्यावा. सोलारवर हातपंपमधून पाणी उपसा वीज बिल भरावे लागणार नाही, त्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव देण्याचे आवाहन केले.

तहसीलदार अंजली मरोड यांनी दुष्काळामुळे घाबरून न जाता नामी संधी समजून प्रत्येक गावातील विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, सरळीकरण यासारखी कामे करावीत, असे आवाहन केले.

टँकरपेक्षा इतर स्त्रोत शोधा- गळोरगी, भोसगे, बोरेगाव, चपळगाववाडी, बावकरवाडी, शेगाव, गोगाव,उमरगे या गावांत पाणीटंचाई भासणार नसल्याचे संबंधितांनी सांगितले. हिळ्ळीत पाणी मुबलक असले तरी ते पिण्यालायक नाही. हालहळ्ळी (ह.)येथील कोणीच उपस्थित नव्हते. हातपंप दुरुस्तीसाठी कर्मचारी नाहीत, ते मानधनावर घ्यावेत, असे ठरले. एबीसीडी या कोडवर्डबाबत पाणीपुरवठा अधिकाºयांना सांगता आले नाही. ५०० फुटांच्या आत असणाºया विहीर, बोअरमधून विनामानधन पाणी घेण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. टँकरपेक्षा इतर स्त्रोत शोधा, असे तहसीलदार म्हणाल्या. सर्वच गावांत डिसेंबरअखेर पाणीटंचाई भासणार असल्याचे सांगण्यात आले.

म्हेत्रे भडकले- बैठक चालू असताना काही कर्मचारी गप्पा मारण्यात,मोबाईल चॅटिंग करण्यात मग्न होते. तेव्हा भडकलेले म्हेत्रे म्हणाले, तुम्हाला शिस्त नाही. आम्ही काय वेळ काढून गोट्या खेळायला बसलो आहे काय? गावात दाखवण्यासाठी पदाधिकारी होता का? अशा शब्दात म्हेत्रे यांनी खडसावले. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय