शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

पवारांनी खेळी करत भाजप अन् सेनेला सत्तेपासून रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 14:35 IST

सोलापुरातील सर्वसामान्य जनतेचे मत : युतीने एकत्र यावे, सेनेला मुख्यमंत्रिपद द्याव

ठळक मुद्देमागील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आम्ही पाहिला शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने आपल्या मित्रपक्षाचा मान ठेवला पाहिजेशरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत, तेच यंदा मुख्यमंत्री व्हावे

 सोलापूर : शिवसेनेकडे सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक पाठबळ दाखवण्यासाठी २४ तास असताना राजकारणात मुत्सद्दी असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय खेळी केली़ आणि त्यांनी शिवसेना आणि भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले, असे मत सोलापूरकरांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर राज्यातील सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकदा एकत्र येऊन सत्ता स्थापन करावे याचबरोबर शिवसेनेचा मुख्यमंत्री करावा, अशी मागणीही सोलापूरकरांकडून होत होती.

सध्या सत्तेचा तिढा जरी कायम असला तरी मुख्यमंत्री हा काम करणारा पाहिजे़ मागील पाच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री आम्ही पाहिला आहे़ पण यंदा शिवसेनेला संधी दिली पाहिजे़ त्यांनाही मुख्यमंत्रिपद देऊन भाजपने आपल्या मित्रपक्षाचा मान ठेवला पाहिजे़- उत्तम कांबळे, नागरिक

शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत़ तेच यंदा मुख्यमंत्री व्हावे़ त्यांना चांगला राजकीय अनुभव आहे़, हे राज्यानेही पाहिले आहे़ यामुळे राज्याला त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे़ शरद पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणूनच कदाचित पवार यांनी राजकीय खेळी करत वेळेत शिवसेनेला पाठिंबा दिला नाही़-जालिंदर प्रभळकर

शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा न देता कोणतीही राजकीय खेळी केली नाही़ पण काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे पाठिंबा दिला नसेल़ भाजपने मागील पाच वर्षांत केलेला कारभार पाहता यंदा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हायला पाहिजे़ मागील पाच वर्षांत भाजपच्या लोकांनीही शिवसेनेला संपवण्याचा पूर्ण पयत्न केला़ यामुळे शिवसेनेला संधी मिळालीच पाहिजे़ - संजय उकरंडे 

राज्याची राजकीय स्थिती ही कोणाच्याही ध्यानीमनी नसताना असे घडत आहे़ मोठ्या प्रमाणात भाजपचे सीट निवडून आले़ यामध्ये शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाचा हट्ट पकडून वेगळा झाला आहे़ शरद पवार हे राज्याचे किंगमेकर आहेत़ ते ऐंशी वर्षांचे असतानाही त्यांनी दोन्ही पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला, पण ते सोबत येणार आहेत का नाही, हे स्पष्ट होणे कठीण आहे.- जयराज नागणसुरे

दोन्ही काँग्रेसच्या खेळीला सेनेने बळी पडू नयेपूर्वी शिवसेना आणि भाजप यांनी सरकार स्थापन केले़ यंदा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद द्यावे, त्यांनी शेतकºयांसाठी खूप आंदोलने केली आहेत़ यामुळे त्यांना संधी द्यावी.राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रसने जी खेळी केली आहे त्याला शिवसेनेने बळी न पडता युती टिकवत शिवसेना आणि भाजपने पुन्हा एकदा एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. अशा कुरघोड्या करणाºयांना धडा शिकवावा आणि आपली मैत्री अशीच टिकवून ठेवावी, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात येत होते.

शिवसेनेला संधी द्यामागील पाच वर्षांत शिवसेनेने खूप तडजोडी केल्या. भाजपसोबत फरफटत गेली़ भाजपसोबत जो मान पाहिजे तो मान काही मिळाला नाही़ पण यंदा शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाले पाहिजे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे