शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांचे टेबल पेलणार अडीचशे किलो वजनाचेही रूग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:32 IST

सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ओटी टेबल दाखल; लठ्ठपणा निदान उपचार करण्यासाठी होणार टेबलचा उपयोग

ठळक मुद्देगरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांच्या नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहेसर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात येणारशासकीय रुग्णालय परिसरात याबाबत जनजागृती करण्यात येणार

सोलापूर : लठ्ठ व्यक्तींवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक बेरियाट्रिक ओटी टेबल छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणार आहे. अडीचशे किलोचा लठ्ठ रूग्ण पेलण्याची या टेबलची क्षमता आहे. दरम्यान, या टेबलचा उपयोग ज्या विभागात होणार ंआहे, त्या लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्या उद्घाटन होणार आहे. 

या अत्याधुनिक आॅपरेशन टेबलची किंमत १० लाख रुपये असून, कोइमतूर येथून तो सोलापूरकडे आणण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. गरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांच्या नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. त्याबाबत जागृती व योग्य असे उपचार करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालय परिसरात याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्राच्या आत तसेच बाहेरही फलक लावण्यात येणार आहे. 

रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास अत्याधुनिक साहित्याची गरज असते. या अनुषंगाने बेरियाट्रिक ओटी टेबल व इतर साहित्य आणण्यात आले आहेत. या टेबलचे वैशिष्ट्य म्हणजे यावर २५० किलोचा रुग्ण मावू शकतो. जुन्या पद्धतीच्या टेबलवरुन रुग्ण पडण्याची शक्यता असते. नव्या टेबलमुळे ही शक्यता नसणार आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला वेगवेगळ्या बाजूने हलवता येऊ शकते. यामुळे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना अधिक सोपे होते. या टेबलची हालचाल रिमोटनेही करता येते.

असा ठरवतात व्यक्तीचा लठ्ठपणा..- लठ्ठपणा ठरवताना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. यासाठी बीएमआय हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल असा फॉर्म्युला उपयोगात आणला जातो. यावरुन कोणती व्यक्ती लठ्ठ आहे कोणती नाही हे ठरवले जाते. बीएमआय = वजन / उंचीचा वर्ग यावरुन बीएमए काढला जातो. भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य