शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

१० लाखांचे टेबल पेलणार अडीचशे किलो वजनाचेही रूग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:32 IST

सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ओटी टेबल दाखल; लठ्ठपणा निदान उपचार करण्यासाठी होणार टेबलचा उपयोग

ठळक मुद्देगरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांच्या नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहेसर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात येणारशासकीय रुग्णालय परिसरात याबाबत जनजागृती करण्यात येणार

सोलापूर : लठ्ठ व्यक्तींवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक बेरियाट्रिक ओटी टेबल छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणार आहे. अडीचशे किलोचा लठ्ठ रूग्ण पेलण्याची या टेबलची क्षमता आहे. दरम्यान, या टेबलचा उपयोग ज्या विभागात होणार ंआहे, त्या लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्या उद्घाटन होणार आहे. 

या अत्याधुनिक आॅपरेशन टेबलची किंमत १० लाख रुपये असून, कोइमतूर येथून तो सोलापूरकडे आणण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. गरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांच्या नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. त्याबाबत जागृती व योग्य असे उपचार करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालय परिसरात याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्राच्या आत तसेच बाहेरही फलक लावण्यात येणार आहे. 

रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास अत्याधुनिक साहित्याची गरज असते. या अनुषंगाने बेरियाट्रिक ओटी टेबल व इतर साहित्य आणण्यात आले आहेत. या टेबलचे वैशिष्ट्य म्हणजे यावर २५० किलोचा रुग्ण मावू शकतो. जुन्या पद्धतीच्या टेबलवरुन रुग्ण पडण्याची शक्यता असते. नव्या टेबलमुळे ही शक्यता नसणार आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला वेगवेगळ्या बाजूने हलवता येऊ शकते. यामुळे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना अधिक सोपे होते. या टेबलची हालचाल रिमोटनेही करता येते.

असा ठरवतात व्यक्तीचा लठ्ठपणा..- लठ्ठपणा ठरवताना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. यासाठी बीएमआय हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल असा फॉर्म्युला उपयोगात आणला जातो. यावरुन कोणती व्यक्ती लठ्ठ आहे कोणती नाही हे ठरवले जाते. बीएमआय = वजन / उंचीचा वर्ग यावरुन बीएमए काढला जातो. भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य