शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांचे टेबल पेलणार अडीचशे किलो वजनाचेही रूग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 12:32 IST

सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ओटी टेबल दाखल; लठ्ठपणा निदान उपचार करण्यासाठी होणार टेबलचा उपयोग

ठळक मुद्देगरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांच्या नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहेसर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात येणारशासकीय रुग्णालय परिसरात याबाबत जनजागृती करण्यात येणार

सोलापूर : लठ्ठ व्यक्तींवर उपचार करण्यासाठी अत्याधुनिक बेरियाट्रिक ओटी टेबल छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणार आहे. अडीचशे किलोचा लठ्ठ रूग्ण पेलण्याची या टेबलची क्षमता आहे. दरम्यान, या टेबलचा उपयोग ज्या विभागात होणार ंआहे, त्या लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्या उद्घाटन होणार आहे. 

या अत्याधुनिक आॅपरेशन टेबलची किंमत १० लाख रुपये असून, कोइमतूर येथून तो सोलापूरकडे आणण्यात येत असल्याचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. गरीब, श्रीमंत अशा सर्व स्तरांच्या नागरिकांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. त्याबाबत जागृती व योग्य असे उपचार करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात लठ्ठपणा निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालय परिसरात याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. केंद्राच्या आत तसेच बाहेरही फलक लावण्यात येणार आहे. 

रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आल्यास अत्याधुनिक साहित्याची गरज असते. या अनुषंगाने बेरियाट्रिक ओटी टेबल व इतर साहित्य आणण्यात आले आहेत. या टेबलचे वैशिष्ट्य म्हणजे यावर २५० किलोचा रुग्ण मावू शकतो. जुन्या पद्धतीच्या टेबलवरुन रुग्ण पडण्याची शक्यता असते. नव्या टेबलमुळे ही शक्यता नसणार आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाला वेगवेगळ्या बाजूने हलवता येऊ शकते. यामुळे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांना अधिक सोपे होते. या टेबलची हालचाल रिमोटनेही करता येते.

असा ठरवतात व्यक्तीचा लठ्ठपणा..- लठ्ठपणा ठरवताना केवळ वजनाचा निकष लक्षात न घेता आणखीन काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते. यासाठी बीएमआय हा साधारण लोकांना सहजपणे मोजता येईल असा फॉर्म्युला उपयोगात आणला जातो. यावरुन कोणती व्यक्ती लठ्ठ आहे कोणती नाही हे ठरवले जाते. बीएमआय = वजन / उंचीचा वर्ग यावरुन बीएमए काढला जातो. भारतीयांमध्ये बीएमआय २१ हा योग्य मानला जातो. परंतु तो अधिक असल्यास त्या व्यक्तीला स्थूल असे म्हटले जाते. हाच मानक युरोपीय लोकांसाठी ३० असा आहे. याचे कारण भारतीय लोकांमध्ये चरबी मुख्यत: पोटाच्या आसपास अधिक प्रमाणात साठते. पोटाच्या आसपासची चरबी ही जास्त धोकादायक असते कारण ही चरबी शांत न बसता रक्तामध्ये काही टॉक्सिक हार्मोन्स सोडते.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य