शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

पालकांनो पावसाळ्यात लहान मुलांना जपा; रात्री ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

By appasaheb.patil | Updated: August 11, 2022 15:30 IST

ताप, खोकल्यांचे पेशंट वाढले; बालरोग तज्ज्ञांकडील ओपीडी वाढली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पावसाळ्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतात. तापमानात सतत बदल होत राहतो. सलग पाऊस चालू राहिल्यास दिवसेंदिवस स्वच्छ सूर्यप्रकाश येत नाही. जागोजागी पाणी साचते. पाण्याची डबकी होतात. त्यामुळे चिलटे, माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना यावेळी संसर्ग होण्याची भीती असते. नुकतीच रांगू लागलेली बाळे पटकन् काही वस्तू तोंडात टाकतात. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.

पावसाळ्यात कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया, डेंग्यू हे आजार होतात. पावसाळ्यात पाणी तुंबून राहते. करवंट्या, शहाळी, जुने टायर, फुटलेली मडकी, गुरांची पाण्याची भांडी, जुने कॅन यात पाऊस साठतो. त्याने डेंग्यू व मलेरियाच्या डासांना (एडीस, ॲनोफॅलीस) आमंत्रण मिळते. त्यांची पैदास वाढते. हे दोन्ही आजार गंभीर होऊन जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात ऊन, वारा अन् पावसाचा सामना करावा लागतो. अशा बदलत्या वातावरणामुळे अनेक आजार डोके वर काढू लागतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते त्यांना पावसाळ्यात आजार होण्याचा धोका जास्त असतो; पण बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना सर्वाधिक आजारांचा फटका बसतो. पावसाळ्यात मुलांना आजारांपासून रोखायचं असेल तर बाहेरचे पदार्थ खाण्यास देणं टाळा, घरचं शिजवलेलं, ताजे अन्न द्या असेही आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांनी केले आहे.

----------

पावसाळ्यात लहान मुलांना होणारे आजार

  • - जुलाब
  • - मलेरिया
  • - उलट्या
  • - गॅस्ट्रो
  • - टायफॉईड
  • - कॉलरा
  • - डेंग्यू

----------

काय करायला हवे?

  • - लहान मुलांना गाळून आणि उकळून पाणी द्या.
  • - ताजे, गरम व शिजवलेले अन्न मुलांना द्या.
  • - पावसात भिजू देऊ नका, ओले कपडे घालू नका
  • - शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

-----------

त्वचेचे आजारही होऊ शकतो ?

पावसाळ्यात लहान मुलांना त्वचेसंदर्भातील आजारही होऊ शकतो. हा व्हायरल आजार आहे. हाता-पायाला रॅष येतात. हा आजार चार ते पाच दिवसात आपोआप कमी होतो. याला उपचाराची गरज नाही. पालकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये असे बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांनी सांगितले आहे.

-----------

पावसाळ्यात लहान मुलांची जास्त काळजी घेणं महत्त्वाचे आहे. शक्यतो पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासोबतच जुलाबसदृश व संसर्गजन्य आजार सर्वात जास्त लहान मुलांना होतात. वेळीच काळजी अन् उपचार घेतले तर ते लवकर बरे होतात. कोणताही आजार मुलांना झाल्यास पालकांनी अजिबात घाबरू नये. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेतल्यास मुलं लवकर बरी होतात.

- विक्रम दबडे, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यRainपाऊस