शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पालकांनो पावसाळ्यात लहान मुलांना जपा; रात्री ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

By appasaheb.patil | Updated: August 11, 2022 15:30 IST

ताप, खोकल्यांचे पेशंट वाढले; बालरोग तज्ज्ञांकडील ओपीडी वाढली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : पावसाळ्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होतात. तापमानात सतत बदल होत राहतो. सलग पाऊस चालू राहिल्यास दिवसेंदिवस स्वच्छ सूर्यप्रकाश येत नाही. जागोजागी पाणी साचते. पाण्याची डबकी होतात. त्यामुळे चिलटे, माशा यांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे पावसाळी आजार वाढतात. पाण्यातून मुलांना यावेळी संसर्ग होण्याची भीती असते. नुकतीच रांगू लागलेली बाळे पटकन् काही वस्तू तोंडात टाकतात. त्यामुळे त्यातून विषाणूसंसर्ग होऊ शकतो.

पावसाळ्यात कीटकजन्य आजार डासांपासून मलेरिया, डेंग्यू हे आजार होतात. पावसाळ्यात पाणी तुंबून राहते. करवंट्या, शहाळी, जुने टायर, फुटलेली मडकी, गुरांची पाण्याची भांडी, जुने कॅन यात पाऊस साठतो. त्याने डेंग्यू व मलेरियाच्या डासांना (एडीस, ॲनोफॅलीस) आमंत्रण मिळते. त्यांची पैदास वाढते. हे दोन्ही आजार गंभीर होऊन जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात ऊन, वारा अन् पावसाचा सामना करावा लागतो. अशा बदलत्या वातावरणामुळे अनेक आजार डोके वर काढू लागतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते त्यांना पावसाळ्यात आजार होण्याचा धोका जास्त असतो; पण बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांना सर्वाधिक आजारांचा फटका बसतो. पावसाळ्यात मुलांना आजारांपासून रोखायचं असेल तर बाहेरचे पदार्थ खाण्यास देणं टाळा, घरचं शिजवलेलं, ताजे अन्न द्या असेही आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांनी केले आहे.

----------

पावसाळ्यात लहान मुलांना होणारे आजार

  • - जुलाब
  • - मलेरिया
  • - उलट्या
  • - गॅस्ट्रो
  • - टायफॉईड
  • - कॉलरा
  • - डेंग्यू

----------

काय करायला हवे?

  • - लहान मुलांना गाळून आणि उकळून पाणी द्या.
  • - ताजे, गरम व शिजवलेले अन्न मुलांना द्या.
  • - पावसात भिजू देऊ नका, ओले कपडे घालू नका
  • - शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा

-----------

त्वचेचे आजारही होऊ शकतो ?

पावसाळ्यात लहान मुलांना त्वचेसंदर्भातील आजारही होऊ शकतो. हा व्हायरल आजार आहे. हाता-पायाला रॅष येतात. हा आजार चार ते पाच दिवसात आपोआप कमी होतो. याला उपचाराची गरज नाही. पालकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये असे बालरोगतज्ज्ञ डॉ. विक्रम दबडे यांनी सांगितले आहे.

-----------

पावसाळ्यात लहान मुलांची जास्त काळजी घेणं महत्त्वाचे आहे. शक्यतो पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासोबतच जुलाबसदृश व संसर्गजन्य आजार सर्वात जास्त लहान मुलांना होतात. वेळीच काळजी अन् उपचार घेतले तर ते लवकर बरे होतात. कोणताही आजार मुलांना झाल्यास पालकांनी अजिबात घाबरू नये. डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेतल्यास मुलं लवकर बरी होतात.

- विक्रम दबडे, बालरोगतज्ज्ञ, सोलापूर

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यRainपाऊस