शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:57 IST

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; रेस्क्यू पथकाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देवीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेलेधोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आलामाळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली

सोलापूर : वीर व उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील ४० गावांतील ७ हजार ६८७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

उजनी धरणातून सुमारे एक लाख क्युसेकच्या पुढे पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या ४४ गावांतील १८७८ कुटुंबांचे शाळा, मंदिर, सभामंडपात स्थलांतर केले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या गावनिहाय नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूर तालुका- सुस्ते: ४००, अंबाबाई पटांगण: १०९, पिराची कुरोली: १७५, व्यास नारायण झोपडपट्टी: १0३0, लखुबाई मंदिर परिसर: १0१२, पुळूज: ५३४, पुळूजवाडी: ५८, विटे: ३३२, खरसोळी: ७0, पोहेरगाव: ७३८, तारापूर: ५९, अजनसोंड: ८0, पटकुरोली: १६, खेडभोसे: ८६, देवडे: ६५, गुरसाळे: ९0, शेगाव दुमाला: ३४, भटुंबरे: १९, देगाव: १७३, कान्हापुरी: १७, कºहाळे: ८८, आव्हे: २२६, नांदोेरे: ५२, तरटगाव भोसे: २८२, शेळवे: ४२,खेडभाळवणी: ३२, चळे: २२८, आंबे: २१0, सरकोली: ३४0, वाडीकुरोली: १९0, होळे: २0५. अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील ३१ गावांमधील १७४७ कुटुंबांतील ६९९२ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

वीर धरणातील पाण्यामुळे निरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील ९ गावांतील १३१ कुटुंबांतील ६९५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये कुरभावी: १९, एकशिव: ६, पळसमंडल: ५५, कदमवाडी: २७, उंबरे: ११९, तिरवंडी: ८५, आनंदनगर: ८, अकलूज: ३५0, बिजवडी: २६.  उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांना  सतर्क करण्यात आले आहे. पुराचा धोका असणाºया वाड्यावस्त्यांवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले  आहे.

अशी राबविली यंत्रणा- वीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापुरातील १५ आणि अक्कलकोट तालुक्यातील १0 गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा आदींची सोय संबंधित तहसीलदारांमार्फत करण्यात आली आहे. पुराच्या पाण्याने गंभीर हानी झाल्याचे एकही वृत्त नसल्याचे जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणfloodपूरwater transportजलवाहतूक