शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:57 IST

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; रेस्क्यू पथकाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देवीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेलेधोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आलामाळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली

सोलापूर : वीर व उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील ४० गावांतील ७ हजार ६८७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

उजनी धरणातून सुमारे एक लाख क्युसेकच्या पुढे पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या ४४ गावांतील १८७८ कुटुंबांचे शाळा, मंदिर, सभामंडपात स्थलांतर केले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या गावनिहाय नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूर तालुका- सुस्ते: ४००, अंबाबाई पटांगण: १०९, पिराची कुरोली: १७५, व्यास नारायण झोपडपट्टी: १0३0, लखुबाई मंदिर परिसर: १0१२, पुळूज: ५३४, पुळूजवाडी: ५८, विटे: ३३२, खरसोळी: ७0, पोहेरगाव: ७३८, तारापूर: ५९, अजनसोंड: ८0, पटकुरोली: १६, खेडभोसे: ८६, देवडे: ६५, गुरसाळे: ९0, शेगाव दुमाला: ३४, भटुंबरे: १९, देगाव: १७३, कान्हापुरी: १७, कºहाळे: ८८, आव्हे: २२६, नांदोेरे: ५२, तरटगाव भोसे: २८२, शेळवे: ४२,खेडभाळवणी: ३२, चळे: २२८, आंबे: २१0, सरकोली: ३४0, वाडीकुरोली: १९0, होळे: २0५. अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील ३१ गावांमधील १७४७ कुटुंबांतील ६९९२ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

वीर धरणातील पाण्यामुळे निरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील ९ गावांतील १३१ कुटुंबांतील ६९५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये कुरभावी: १९, एकशिव: ६, पळसमंडल: ५५, कदमवाडी: २७, उंबरे: ११९, तिरवंडी: ८५, आनंदनगर: ८, अकलूज: ३५0, बिजवडी: २६.  उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांना  सतर्क करण्यात आले आहे. पुराचा धोका असणाºया वाड्यावस्त्यांवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले  आहे.

अशी राबविली यंत्रणा- वीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापुरातील १५ आणि अक्कलकोट तालुक्यातील १0 गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा आदींची सोय संबंधित तहसीलदारांमार्फत करण्यात आली आहे. पुराच्या पाण्याने गंभीर हानी झाल्याचे एकही वृत्त नसल्याचे जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणfloodपूरwater transportजलवाहतूक