शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 11:57 IST

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; रेस्क्यू पथकाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी केले स्पष्ट

ठळक मुद्देवीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेलेधोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आलामाळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली

सोलापूर : वीर व उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माळशिरस व पंढरपूर तालुक्यातील ४० गावांतील ७ हजार ६८७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

उजनी धरणातून सुमारे एक लाख क्युसेकच्या पुढे पाणी सोडण्यात आल्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या ४४ गावांतील १८७८ कुटुंबांचे शाळा, मंदिर, सभामंडपात स्थलांतर केले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या गावनिहाय नागरिकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. पंढरपूर तालुका- सुस्ते: ४००, अंबाबाई पटांगण: १०९, पिराची कुरोली: १७५, व्यास नारायण झोपडपट्टी: १0३0, लखुबाई मंदिर परिसर: १0१२, पुळूज: ५३४, पुळूजवाडी: ५८, विटे: ३३२, खरसोळी: ७0, पोहेरगाव: ७३८, तारापूर: ५९, अजनसोंड: ८0, पटकुरोली: १६, खेडभोसे: ८६, देवडे: ६५, गुरसाळे: ९0, शेगाव दुमाला: ३४, भटुंबरे: १९, देगाव: १७३, कान्हापुरी: १७, कºहाळे: ८८, आव्हे: २२६, नांदोेरे: ५२, तरटगाव भोसे: २८२, शेळवे: ४२,खेडभाळवणी: ३२, चळे: २२८, आंबे: २१0, सरकोली: ३४0, वाडीकुरोली: १९0, होळे: २0५. अशा प्रकारे पंढरपूर तालुक्यातील ३१ गावांमधील १७४७ कुटुंबांतील ६९९२ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

वीर धरणातील पाण्यामुळे निरा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका पोहोचला आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यातील ९ गावांतील १३१ कुटुंबांतील ६९५ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये कुरभावी: १९, एकशिव: ६, पळसमंडल: ५५, कदमवाडी: २७, उंबरे: ११९, तिरवंडी: ८५, आनंदनगर: ८, अकलूज: ३५0, बिजवडी: २६.  उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गावांना  सतर्क करण्यात आले आहे. पुराचा धोका असणाºया वाड्यावस्त्यांवरील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले  आहे.

अशी राबविली यंत्रणा- वीर व उजनीचे पाणी भीमा नदीत सोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील ७ पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी या पुलाच्या बाजूने येणारा रस्ता बॅरिकेडिंगद्वारे बंद करण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील १९ पूल पाण्याखाली गेले आहेत. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापुरातील १५ आणि अक्कलकोट तालुक्यातील १0 गावांत पूरस्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा आदींची सोय संबंधित तहसीलदारांमार्फत करण्यात आली आहे. पुराच्या पाण्याने गंभीर हानी झाल्याचे एकही वृत्त नसल्याचे जिल्हा आपत्कालीन कक्षाकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणfloodपूरwater transportजलवाहतूक