शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीनंतरची पंढरी; दोन दिवसांत २१० टन कचरा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:54 IST

नगरपालिकेच्या १२५० कर्मचाºयांनी बजावली सेवा; शहर होतंय चकाचक 

ठळक मुद्देआषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेतवाळवंटात विशेष स्वच्छता राहावी म्हणून पंढरपूर नगरपरिषद व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेच्या कर्मचाºयांमार्फत दररोज स्वच्छता ५५ घंटागाड्यांद्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम चालू

पंढरपूर : आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी नगरपालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, शनिवारी ९० तर रविवारी १२० असा २१० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून १० ते १२ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. ते वाखरी, रेल्वे स्टेशन, टाकळी, कासेगाव रोड, ६५ एकर परिसरासह शहरातील अन्य मोकळे मैदान, मठ, नागरिकांच्या घरात मुक्कामी होते़ यामुळे कचराकुंड्यांत शिळे अन्न, पत्रावळ्या मोठ्या प्रमाणात होत्या. तसेच यात्रा कालावधीत अनेक छोटे-छोटे व्यापारी व्यवसाय करत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या होत्या. 

शहरात लाखो भाविकांची गर्दी असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर गर्दी होती़ त्यामुळे वाहनांना शहरातील रस्त्यांवरुन ये-जा करता येत नव्हते़ यामुळे अनेक ठिकाणी कचºयांचे ढिगारे साचले होते. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी रात्री कचरा उचलण्याचे काम करत होते, मात्र गर्दीच्या ठिकाणी कचरा उचलता येत नव्हता.

साठलेल्या कचºयामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने २४ तासांची स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. यामुळे दररोज शहरातून ९० टन कचरा उचलला जात आहे.

वाळवंटात विशेष स्वच्छता राहावी म्हणून पंढरपूर नगरपरिषद व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेच्या कर्मचाºयांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. वाळवंटात उघड्यावर शौचास बसू नये म्हणून विशेष टीम नेमण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट व जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले. ही मोहीम तीन-चार दिवस चालणार आहे.

अशी आहे यंत्रणा- ५५ घंटागाड्यांद्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम चालू आहे. शहरात कचरा त्वरित उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ८ वाहने, ८ टिपर, २ कॉम्पॅक्टर, ३ डम्पर प्लेसर, ५ डंपिंग ट्रॉली, ७० कंटेनरमार्फत दररोज ९० ते १२० टन कचरा उचलण्यात येत असल्याचे आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी सांगितले.

६५ एकर परिसरातही स्वच्छता सुरु- ६५ एकर परिसरात एकूण ४८७ प्लॉट भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. संपूर्ण ६५ एकरमध्ये लाखो भाविक मुक्कामी असल्याने या भागात कचरा साठला होता. जसे दिंड्या प्लॉट सोडून जातील, तसे कचरा उचलण्याचे काम सुरु असल्याचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले.

पंढरपुरात मोठ्या प्रमाणात मठ, वाडे, धर्मशाळा असल्याने त्या ठिकाणीही कचरा साठत होता. त्यामुळे २४ तासांत जमेल त्या पद्धतीने कचरा उचलण्याचे काम नगरपरिषदेचे कर्मचारी करत आहेत़ अनेक मठांत दिंडीप्रमुख, पालखीप्रमुख, विश्वस्त निवासी होते़ त्या मठांतील महाराज मंडळींनी शहरात स्वच्छता अभियान राबवावे़- सचिन ढोले,प्रांताधिकारी. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी