शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

आषाढी वारीनंतरची पंढरी; दोन दिवसांत २१० टन कचरा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 14:54 IST

नगरपालिकेच्या १२५० कर्मचाºयांनी बजावली सेवा; शहर होतंय चकाचक 

ठळक मुद्देआषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेतवाळवंटात विशेष स्वच्छता राहावी म्हणून पंढरपूर नगरपरिषद व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेच्या कर्मचाºयांमार्फत दररोज स्वच्छता ५५ घंटागाड्यांद्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम चालू

पंढरपूर : आषाढी यात्रेचा प्रमुख सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर आता वारकरी परतू लागले आहेत. आषाढी एकादशीचा सोहळा शुक्रवारी पार पडल्यानंतर शनिवारी आणि रविवारी या दोन्ही दिवशी नगरपालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली असून, शनिवारी ९० तर रविवारी १२० असा २१० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून १० ते १२ लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. ते वाखरी, रेल्वे स्टेशन, टाकळी, कासेगाव रोड, ६५ एकर परिसरासह शहरातील अन्य मोकळे मैदान, मठ, नागरिकांच्या घरात मुक्कामी होते़ यामुळे कचराकुंड्यांत शिळे अन्न, पत्रावळ्या मोठ्या प्रमाणात होत्या. तसेच यात्रा कालावधीत अनेक छोटे-छोटे व्यापारी व्यवसाय करत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या होत्या. 

शहरात लाखो भाविकांची गर्दी असल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर गर्दी होती़ त्यामुळे वाहनांना शहरातील रस्त्यांवरुन ये-जा करता येत नव्हते़ यामुळे अनेक ठिकाणी कचºयांचे ढिगारे साचले होते. ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी रात्री कचरा उचलण्याचे काम करत होते, मात्र गर्दीच्या ठिकाणी कचरा उचलता येत नव्हता.

साठलेल्या कचºयामुळे नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवू नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने २४ तासांची स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. यामुळे दररोज शहरातून ९० टन कचरा उचलला जात आहे.

वाळवंटात विशेष स्वच्छता राहावी म्हणून पंढरपूर नगरपरिषद व जिल्ह्यातील इतर नगरपरिषदेच्या कर्मचाºयांमार्फत दररोज स्वच्छता करण्यात येत आहे. वाळवंटात उघड्यावर शौचास बसू नये म्हणून विशेष टीम नेमण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी अभिजित बापट व जनसंपर्क अधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले. ही मोहीम तीन-चार दिवस चालणार आहे.

अशी आहे यंत्रणा- ५५ घंटागाड्यांद्वारे दिवसा व रात्री २४ तास कचरा गोळा करण्याचे काम चालू आहे. शहरात कचरा त्वरित उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील ८ वाहने, ८ टिपर, २ कॉम्पॅक्टर, ३ डम्पर प्लेसर, ५ डंपिंग ट्रॉली, ७० कंटेनरमार्फत दररोज ९० ते १२० टन कचरा उचलण्यात येत असल्याचे आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे यांनी सांगितले.

६५ एकर परिसरातही स्वच्छता सुरु- ६५ एकर परिसरात एकूण ४८७ प्लॉट भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. संपूर्ण ६५ एकरमध्ये लाखो भाविक मुक्कामी असल्याने या भागात कचरा साठला होता. जसे दिंड्या प्लॉट सोडून जातील, तसे कचरा उचलण्याचे काम सुरु असल्याचे उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी सांगितले.

पंढरपुरात मोठ्या प्रमाणात मठ, वाडे, धर्मशाळा असल्याने त्या ठिकाणीही कचरा साठत होता. त्यामुळे २४ तासांत जमेल त्या पद्धतीने कचरा उचलण्याचे काम नगरपरिषदेचे कर्मचारी करत आहेत़ अनेक मठांत दिंडीप्रमुख, पालखीप्रमुख, विश्वस्त निवासी होते़ त्या मठांतील महाराज मंडळींनी शहरात स्वच्छता अभियान राबवावे़- सचिन ढोले,प्रांताधिकारी. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी