शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आमचं सरकार कायदेशीरच, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 06:09 IST

देशात घटना, कायदा आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. लोकशाहीत बहुमताला, नंबर्सला महत्त्व आहे - एकनाथ शिंदे

"पावसामुळे अनेक गोष्टींवर मर्यादा आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा पूरपरिस्थितीच्या नियंत्रणासाठी वापरावी लागत आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करून निवडणुका पावसाळ्यात घेणं सोयीचं होणार नाही हे त्यांच्याशी बोलणार आहोत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. 

ओबीसी आरक्षणाबाबत मी आणि उपमुख्यमंत्री राज्याचे अॅटर्नी जनरल यांची भेट घेतली. आरक्षण त्यांना मिळेल आणि न्याय मिळेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गानं राज्य स्थापन केलं आहे. देशात घटना, कायदा आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. लोकशाहीत बहुमताला, नंबर्सला महत्त्व आहे. हे सरकार जे स्थापन केलंय ते कायदेशीर आहे. आम्हाला न्यायव्यस्थेवर विश्वास असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

"माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मिळाला हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझे वडिल या ठिकाणी होते, माझा मुलगाही या ठिकाणी होता आणि नातूही, हे भाग्य सर्वांनाच मिळालं पाहिजं. पांडुरंगाला सर्वकाही माहित असतं. पाऊस उशिरा सुरू झालाय, पण चांगला सुरू झाला आहे. कुठेही अतिवृष्टी होऊ नये, बळीराजा सुखावला पाहिजे, चांगला पाऊस होऊ द्या, बळीराजा आपला मायबाप आहे. सर्व संकट दूर होऊ द्या, करोनाचा नायनाट होऊ द्या, सर्वांना चांगले दिवस येऊ द्या असं साकडं मी पांडुरंगाकडे घातलं आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्याची भरभराट होऊ द्या - मुख्यमंत्रीया राज्याची भरभराट विकास वेगानं होऊ द्या, सर्व समाज घटक या सर्वांसाठी सरकार प्रयत्नशील असेल. सर्वांगिण विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनीदेखील आम्हाला सांगितलं, राज्याच्या विकासाठी मोठे प्रकल्प उभे करा. निधीची कमतराता भासू देणार नाही आणि केंद्र सरकार पाठिशी उभे राहिल असं आश्वासनही त्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंदिराचा विकास झाला पाहिजे, यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व परिसरातील विकासाचा एक विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश दिले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshadhi Ekadashiआषाढी एकादशी