शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

आमचं सरकार कायदेशीरच, आमचा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 06:09 IST

देशात घटना, कायदा आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. लोकशाहीत बहुमताला, नंबर्सला महत्त्व आहे - एकनाथ शिंदे

"पावसामुळे अनेक गोष्टींवर मर्यादा आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा पूरपरिस्थितीच्या नियंत्रणासाठी वापरावी लागत आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा करून निवडणुका पावसाळ्यात घेणं सोयीचं होणार नाही हे त्यांच्याशी बोलणार आहोत," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. 

ओबीसी आरक्षणाबाबत मी आणि उपमुख्यमंत्री राज्याचे अॅटर्नी जनरल यांची भेट घेतली. आरक्षण त्यांना मिळेल आणि न्याय मिळेल असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही लोकशाही मार्गानं राज्य स्थापन केलं आहे. देशात घटना, कायदा आहे. त्याच्या बाहेर कोणालाही जाता येत नाही. लोकशाहीत बहुमताला, नंबर्सला महत्त्व आहे. हे सरकार जे स्थापन केलंय ते कायदेशीर आहे. आम्हाला न्यायव्यस्थेवर विश्वास असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

"माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मिळाला हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझे वडिल या ठिकाणी होते, माझा मुलगाही या ठिकाणी होता आणि नातूही, हे भाग्य सर्वांनाच मिळालं पाहिजं. पांडुरंगाला सर्वकाही माहित असतं. पाऊस उशिरा सुरू झालाय, पण चांगला सुरू झाला आहे. कुठेही अतिवृष्टी होऊ नये, बळीराजा सुखावला पाहिजे, चांगला पाऊस होऊ द्या, बळीराजा आपला मायबाप आहे. सर्व संकट दूर होऊ द्या, करोनाचा नायनाट होऊ द्या, सर्वांना चांगले दिवस येऊ द्या असं साकडं मी पांडुरंगाकडे घातलं आहे," असं एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्याची भरभराट होऊ द्या - मुख्यमंत्रीया राज्याची भरभराट विकास वेगानं होऊ द्या, सर्व समाज घटक या सर्वांसाठी सरकार प्रयत्नशील असेल. सर्वांगिण विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनीदेखील आम्हाला सांगितलं, राज्याच्या विकासाठी मोठे प्रकल्प उभे करा. निधीची कमतराता भासू देणार नाही आणि केंद्र सरकार पाठिशी उभे राहिल असं आश्वासनही त्यांनी दिल्याचे ते म्हणाले.

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंदिराचा विकास झाला पाहिजे, यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना पंढरपुरातील विठ्ठल मंदिर व परिसरातील विकासाचा एक विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश दिले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAshadhi Ekadashiआषाढी एकादशी