शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 10:52 IST

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे.

ठळक मुद्दे मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिलेएकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

बार्शी : पूर्वीच्या राखीव असलेल्या उस्मानाबादलोकसभा मतदारसंघात दोन वेळा संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी बार्शीच्या शिवाजी कांबळे यांना मिळाली असून, सेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले आहे़ एकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

उस्मानाबादलोकसभा मतदारसंघ हा गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून राखीव होता़ यापूर्वी काँग्रेसचे अरविंद कांबळे हे पाच वेळा खासदार होते़ त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजी बापू कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव केला़ पुढील १९९८ व १९९९ च्या दोन्ही निवडणुकात ते एकदा पराभूत झाले तर एकदा विजयी झाले़ या तिन्ही निवडणुकीत शिवाजी कांबळे यांना बार्शी तालुक्याने भरभरुन साथ दिली़ त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

त्यांना पहिल्यांदा तीस हजार, पुन्हा पंधरा व दहा हजार असा लीड तालुक्याने दिला़ २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या कल्पना नरहिरे व राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव ढोबळे अशी लढत झाली़ यात ढोबळे यांना दोन हजारांचे मताधिक्य तालुक्यातून मिळाले़ मात्र ढोबळे हे पराभूत झाले़ २००९ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला.

राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील विरुध्द शिवसेनेचे रवींद्र गायकवाड अशी लढत झाली़ यामध्ये बार्शी तालुक्यात आ़ दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या दोघांनीही पद्मसिंह पाटील यांचा प्रचार केल्याने तालुक्यातून तब्बल पंधरा हजारांचे मताधिक्य मिळाले़ पाटील संसदेत पोहोचले़ २०१४ च्या निवडणुकीतही पाटील विरुध्द गायकवाड असाच सामना झाला. बार्शी तालुक्याने यावेळी ५५ हजारांचा लीड दिल्याने गायकवाड हे विक्रमी मताने विजयी झाले़ म्हणजेच सहा निवडणुकांत बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोनदा राष्ट्रवादीला लीड दिला आहे़ 

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे़ हे दोन्ही नेते उस्मानाबादचे आहेत़ यंदा विजय मिळवण्यासाठी बार्शी तालुक्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण असणार आहे़ नव्हे तर बार्शी ज्या उमेदवाराला मताधिक्य देणार तोच खासदार विजयी होणार हे मात्र नक्की़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकOsmanabadउस्मानाबादlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकDilip Sopalदिलीप सोपलNCPराष्ट्रवादी काँग्रेस