शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 10:52 IST

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे.

ठळक मुद्दे मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिलेएकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

बार्शी : पूर्वीच्या राखीव असलेल्या उस्मानाबादलोकसभा मतदारसंघात दोन वेळा संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी बार्शीच्या शिवाजी कांबळे यांना मिळाली असून, सेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले आहे़ एकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

उस्मानाबादलोकसभा मतदारसंघ हा गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून राखीव होता़ यापूर्वी काँग्रेसचे अरविंद कांबळे हे पाच वेळा खासदार होते़ त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजी बापू कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव केला़ पुढील १९९८ व १९९९ च्या दोन्ही निवडणुकात ते एकदा पराभूत झाले तर एकदा विजयी झाले़ या तिन्ही निवडणुकीत शिवाजी कांबळे यांना बार्शी तालुक्याने भरभरुन साथ दिली़ त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

त्यांना पहिल्यांदा तीस हजार, पुन्हा पंधरा व दहा हजार असा लीड तालुक्याने दिला़ २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या कल्पना नरहिरे व राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव ढोबळे अशी लढत झाली़ यात ढोबळे यांना दोन हजारांचे मताधिक्य तालुक्यातून मिळाले़ मात्र ढोबळे हे पराभूत झाले़ २००९ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला.

राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील विरुध्द शिवसेनेचे रवींद्र गायकवाड अशी लढत झाली़ यामध्ये बार्शी तालुक्यात आ़ दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या दोघांनीही पद्मसिंह पाटील यांचा प्रचार केल्याने तालुक्यातून तब्बल पंधरा हजारांचे मताधिक्य मिळाले़ पाटील संसदेत पोहोचले़ २०१४ च्या निवडणुकीतही पाटील विरुध्द गायकवाड असाच सामना झाला. बार्शी तालुक्याने यावेळी ५५ हजारांचा लीड दिल्याने गायकवाड हे विक्रमी मताने विजयी झाले़ म्हणजेच सहा निवडणुकांत बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोनदा राष्ट्रवादीला लीड दिला आहे़ 

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे़ हे दोन्ही नेते उस्मानाबादचे आहेत़ यंदा विजय मिळवण्यासाठी बार्शी तालुक्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण असणार आहे़ नव्हे तर बार्शी ज्या उमेदवाराला मताधिक्य देणार तोच खासदार विजयी होणार हे मात्र नक्की़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकOsmanabadउस्मानाबादlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकDilip Sopalदिलीप सोपलNCPराष्ट्रवादी काँग्रेस