शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 10:52 IST

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे.

ठळक मुद्दे मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिलेएकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

बार्शी : पूर्वीच्या राखीव असलेल्या उस्मानाबादलोकसभा मतदारसंघात दोन वेळा संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी बार्शीच्या शिवाजी कांबळे यांना मिळाली असून, सेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले आहे़ एकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

उस्मानाबादलोकसभा मतदारसंघ हा गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून राखीव होता़ यापूर्वी काँग्रेसचे अरविंद कांबळे हे पाच वेळा खासदार होते़ त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजी बापू कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव केला़ पुढील १९९८ व १९९९ च्या दोन्ही निवडणुकात ते एकदा पराभूत झाले तर एकदा विजयी झाले़ या तिन्ही निवडणुकीत शिवाजी कांबळे यांना बार्शी तालुक्याने भरभरुन साथ दिली़ त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

त्यांना पहिल्यांदा तीस हजार, पुन्हा पंधरा व दहा हजार असा लीड तालुक्याने दिला़ २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या कल्पना नरहिरे व राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव ढोबळे अशी लढत झाली़ यात ढोबळे यांना दोन हजारांचे मताधिक्य तालुक्यातून मिळाले़ मात्र ढोबळे हे पराभूत झाले़ २००९ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला.

राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील विरुध्द शिवसेनेचे रवींद्र गायकवाड अशी लढत झाली़ यामध्ये बार्शी तालुक्यात आ़ दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या दोघांनीही पद्मसिंह पाटील यांचा प्रचार केल्याने तालुक्यातून तब्बल पंधरा हजारांचे मताधिक्य मिळाले़ पाटील संसदेत पोहोचले़ २०१४ च्या निवडणुकीतही पाटील विरुध्द गायकवाड असाच सामना झाला. बार्शी तालुक्याने यावेळी ५५ हजारांचा लीड दिल्याने गायकवाड हे विक्रमी मताने विजयी झाले़ म्हणजेच सहा निवडणुकांत बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोनदा राष्ट्रवादीला लीड दिला आहे़ 

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे़ हे दोन्ही नेते उस्मानाबादचे आहेत़ यंदा विजय मिळवण्यासाठी बार्शी तालुक्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण असणार आहे़ नव्हे तर बार्शी ज्या उमेदवाराला मताधिक्य देणार तोच खासदार विजयी होणार हे मात्र नक्की़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकOsmanabadउस्मानाबादlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकDilip Sopalदिलीप सोपलNCPराष्ट्रवादी काँग्रेस