शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र; गरिबीमुळे कामाला गेलेल्या ३५५ बालकांची झाली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 11:47 IST

सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेली आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहिमेंतर्गत ३५५ बालकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित पालकांच्या ताब्यात ...

ठळक मुद्देदोन पीडित, तीन हरवलेल्या बालकांचा समावेशसोलापुरात हॉटेल, कापडाची दुकाने, लॉज आदी ठिकाणी बालकामगार मोठ्या प्रमाणात गेल्यावर्षी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत १६८ मुलांची सुटका करण्यात आली

सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेली आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहिमेंतर्गत ३५५ बालकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामध्ये दोन अपहरण करण्यात आलेली पीडित मुले व तीन हरवलेल्या बालकांचा समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली. 

मोहिमेंतर्गत शहरातील हरवलेली, बेवारस, बालमजूर, कचरा गोळा करणारे, भिक्षा मागणारे तसेच रेकॉर्डवरील बालकांचा शोध घेण्यात आला. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २0१८ दरम्यान ही मोहीम घेण्यात आली. शहरातील सात पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी १ महिला अधिकारी व ३ महिला कर्मचारी, महिला कक्षाकडील ७ महिला कर्मचारी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील २ महिला कर्मचारी असे सर्व मिळून ७ महिला पोलीस अधिकारी व २९ महिला पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बालकल्याण मंडळ, चाईल्ड लाईन, रेल्वे चाईल्ड लाईन व विधायक भारती संस्था, मुंबई आणि बालकामगार अधिकारी सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते. 

१८ वर्षांखालील मुलांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा महिला व बालविकास विभागासमोर उभे केले जात होते. बालकांच्या पालकांची खातरजमा करून त्यांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यात आले. मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून प्रोत्साहन देण्यात आले. पिटा अ‍ॅक्ट अंतर्गत एक कारवाई करण्यात आली असून त्यात पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. गेल्यावर्षी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत १६८ मुलांची सुटका करण्यात आली होती. यंदा ३५५ मुलांना स्वगृही पाठवण्यात आले आहे. ही मोहीम पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक दुपारगुडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षा कांबळे यांनी पार पाडली.

काम करणे ही बालकांची मजबुरी- सोलापुरात हॉटेल, कापडाची दुकाने, लॉज आदी ठिकाणी बालकामगार मोठ्या प्रमाणात दिसून येत होते.  जे वय हसण्या-बागडण्याचे, शिक्षण घेण्याचे आहे; त्या वयात मुले कामाला जाऊन घरप्रपंचाला हातभार लावतात.   मात्र कायद्याने हा गुन्हा आहे.  मुलांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात आली.  यामध्ये सर्रास गरीब घरातील मुले आढळून आली.  त्यामुळे काम करणे ही त्यांची मजबुरी होती.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसChild Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवा