शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

ग्रामीण रोजगार हमी योजनेत फक्त अडीच हजार मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:15 IST

सोलापूर जिल्हा : मजुरी कमी असल्याने कामांकडे मजुरांची पाठ

 बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : मागील काही वर्षांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेला ग्रामीण भागातील मजुरांकडून प्रतिसाद मिळेना. दिवसेंदिवस कामांची संख्या आणि मजुरांची संख्या यात घट होत आहे. सध्या प्रतिदिन २३८ रुपये मजुरी आहे.

प्रतिवर्षी दोन ते पाच रुपयांची मजुरीवाढ मिळते. खासगी ठेकेदारांकडून प्रतिदिन पाचशे ते हजार रुपये मजुरी मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर शहराकडे वळत आहेत. मजुरी चांगली मिळत असल्याने खासगी बांधकामांकडे मजुरांचा ओढा अधिक आहे.

सोलापूर जिल्ह्यात सध्या ४१९ कामे सुरू आहेत. यात २६५९ मजूर कार्यरत आहेत. एकेकाळी लाखो मजूर या योजनेंतर्गत काम करायचे. आता ही संख्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. डिसेंबर २०१९ दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ५५४ कामे सुरू होती. 

त्यावेळी ३१०९ मजूर कार्यरत होते. एप्रिल २०१९ ला फक्त ३६८ कामे सुरू होती. त्यावेळी २२७३ मजूर कार्यरत होते. ऑक्टोबर २०१९ ला १४९ कामे          सुरू होती. त्या वेळेस ७३३ मजूर कार्यरत होते.

रोजगाराची साधने वाढली..केंद्र सरकारकडून ही योजना राबविली जाते. या योजनेचा देशभरात बोलबाला होता. ग्रामीण भागातील बेरोजगारांना वर्षातील शंभर दिवस हमखास काम, या योजनेंतर्गत मिळते. पूर्वी रोजगाराची साधने कमी होती, त्यामुळे या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायचा. आता रोजगाराची साधने वाढली आहेत. लोक शहराकडे मजुरीसाठी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय.

आता माझे वय पंचेचाळीस आहे. सात-आठ वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेवर कामाला जायचो. त्यावेळी ती मजुरी परवडायची. आता महागाई वाढली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत फक्त २३८ रुपये मिळतात. या तुलनेत शहरातील खासगी बांधकाम ठेकेदाराकडे आठशे रुपये मजुरी मिळते. त्यामुळे मी आणि माझे अनेक सहकारी रोजगार हमी योजनांच्या कामांवर जात नाही.- रामदास मोरे, मोहोळ तालुका

टॅग्स :SolapurसोलापूरGovernmentसरकारagricultureशेतीFarmerशेतकरी