शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

मागील १९ दिवसात फक्त २७५ क्विंटल पार्सलची वाहतूक

By appasaheb.patil | Updated: April 29, 2020 15:35 IST

प्रतिसाद मिळेना; कोरोनामुळे रेल्वेचे उत्पन्नही घटले, रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेचा वाहतूक खर्च कमीच

ठळक मुद्देसर्वांनी रेल्वे पार्सल वाहतुकीचा मार्ग अवलंब करावा. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे बरेच फायदे आहेतपार्सल गाड्या या वेळापत्रकानुसार धावतात आणि संबंधित ठिकाणावर वेगाने माल पोहोचवितातराज्य हद्दीवर वाहतुकीच्या मुद्यांना याचा सामना करावा लागत नाही. रेल्वे पार्सल वाहतुकीचे दर देखील रोडवेच्या तुलनेत आहेत

सुजल पाटील 

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून पार्सल गाड्या सुरू केल्या; मात्र या गाड्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मागील १९ दिवसात पार्सल गाडीने फक्त २७५ क्विंटल मालाची वाहतूक झाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापूर विभागातून ८ एप्रिलपासून पार्सलची वाहतूक सुरू करण्यात आली. सोलापूर विभागातून मुंबई-चेन्नई, मुंबई-सिकंदराबाद आणि साप्ताहिक गाडी राजकोट-कोईमतूर ही धावत आहे; मात्र रेल्वे प्रशासनाला पार्सल गाड्यांमधून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याचे सांगण्यात आले. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक कमी आर्थिक बजेटमधून होत आहे. याचा फायदा व्यापारी, कारखानदार, शेतकºयांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कृषी मालाची साखळी खंडित झाली आहे. या कोरोना साथीच्या आजारात शेतकºयांकडून खरेदी करणारे एजंट कोणताही धोका घेत नाहीत. कामगारांची कमतरता, मार्केट यार्ड बंद , नागरी प्रशासनाद्वारे निर्बंध इत्यादी कारणांमुळे ते शेतकºयांकडून माल खरेदी करीत नाहीत. शेती उत्पादन हे नाशवंत असल्याने त्वरित निकाली काढावे लागत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे प्रतिसाद कमी मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

उत्पन्न मिळाले फक्त ५० हजार...- व्यापारी, कारखानदार, शेतकरी यांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ८ एप्रिलपासून पार्सल वाहतूक सुरू केली. सुरुवातीला मुंबई-चेन्नई ही गाडी सुरू केली. प्रतिसाद पाहता पुन्हा मुंबई-सिकंदराबाद सुरू केली, त्यानंतर साप्ताहिक म्हणून राजकोट-कोईमतूर ही गाडी सुरू केली. मागील १९ दिवसात रेल्वेला पार्सल वाहतुकीतून केवळ ५० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सर्वांनी रेल्वे पार्सल वाहतुकीचा मार्ग अवलंब करावा. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे बरेच फायदे आहेत. पार्सल गाड्या या वेळापत्रकानुसार धावतात आणि संबंधित ठिकाणावर वेगाने माल पोहोचवितात. राज्य हद्दीवर वाहतुकीच्या मुद्यांना याचा सामना करावा लागत नाही. रेल्वे पार्सल वाहतुकीचे दर देखील रोडवेच्या तुलनेत आहेत. तसेच या पार्सल गाड्या पुढेही बºयाच कालावधीपर्यंत सुरू राहतील. तसेच ट्रान्सशीपमेंटलाही परवानगी आहे, त्यामुळे हा माल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पाठविला जाऊ शकतो.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे