शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

मागील १९ दिवसात फक्त २७५ क्विंटल पार्सलची वाहतूक

By appasaheb.patil | Updated: April 29, 2020 15:35 IST

प्रतिसाद मिळेना; कोरोनामुळे रेल्वेचे उत्पन्नही घटले, रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेचा वाहतूक खर्च कमीच

ठळक मुद्देसर्वांनी रेल्वे पार्सल वाहतुकीचा मार्ग अवलंब करावा. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे बरेच फायदे आहेतपार्सल गाड्या या वेळापत्रकानुसार धावतात आणि संबंधित ठिकाणावर वेगाने माल पोहोचवितातराज्य हद्दीवर वाहतुकीच्या मुद्यांना याचा सामना करावा लागत नाही. रेल्वे पार्सल वाहतुकीचे दर देखील रोडवेच्या तुलनेत आहेत

सुजल पाटील 

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून पार्सल गाड्या सुरू केल्या; मात्र या गाड्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मागील १९ दिवसात पार्सल गाडीने फक्त २७५ क्विंटल मालाची वाहतूक झाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापूर विभागातून ८ एप्रिलपासून पार्सलची वाहतूक सुरू करण्यात आली. सोलापूर विभागातून मुंबई-चेन्नई, मुंबई-सिकंदराबाद आणि साप्ताहिक गाडी राजकोट-कोईमतूर ही धावत आहे; मात्र रेल्वे प्रशासनाला पार्सल गाड्यांमधून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याचे सांगण्यात आले. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक कमी आर्थिक बजेटमधून होत आहे. याचा फायदा व्यापारी, कारखानदार, शेतकºयांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कृषी मालाची साखळी खंडित झाली आहे. या कोरोना साथीच्या आजारात शेतकºयांकडून खरेदी करणारे एजंट कोणताही धोका घेत नाहीत. कामगारांची कमतरता, मार्केट यार्ड बंद , नागरी प्रशासनाद्वारे निर्बंध इत्यादी कारणांमुळे ते शेतकºयांकडून माल खरेदी करीत नाहीत. शेती उत्पादन हे नाशवंत असल्याने त्वरित निकाली काढावे लागत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे प्रतिसाद कमी मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

उत्पन्न मिळाले फक्त ५० हजार...- व्यापारी, कारखानदार, शेतकरी यांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ८ एप्रिलपासून पार्सल वाहतूक सुरू केली. सुरुवातीला मुंबई-चेन्नई ही गाडी सुरू केली. प्रतिसाद पाहता पुन्हा मुंबई-सिकंदराबाद सुरू केली, त्यानंतर साप्ताहिक म्हणून राजकोट-कोईमतूर ही गाडी सुरू केली. मागील १९ दिवसात रेल्वेला पार्सल वाहतुकीतून केवळ ५० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सर्वांनी रेल्वे पार्सल वाहतुकीचा मार्ग अवलंब करावा. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे बरेच फायदे आहेत. पार्सल गाड्या या वेळापत्रकानुसार धावतात आणि संबंधित ठिकाणावर वेगाने माल पोहोचवितात. राज्य हद्दीवर वाहतुकीच्या मुद्यांना याचा सामना करावा लागत नाही. रेल्वे पार्सल वाहतुकीचे दर देखील रोडवेच्या तुलनेत आहेत. तसेच या पार्सल गाड्या पुढेही बºयाच कालावधीपर्यंत सुरू राहतील. तसेच ट्रान्सशीपमेंटलाही परवानगी आहे, त्यामुळे हा माल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पाठविला जाऊ शकतो.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे