शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

मागील १९ दिवसात फक्त २७५ क्विंटल पार्सलची वाहतूक

By appasaheb.patil | Updated: April 29, 2020 15:35 IST

प्रतिसाद मिळेना; कोरोनामुळे रेल्वेचे उत्पन्नही घटले, रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वेचा वाहतूक खर्च कमीच

ठळक मुद्देसर्वांनी रेल्वे पार्सल वाहतुकीचा मार्ग अवलंब करावा. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे बरेच फायदे आहेतपार्सल गाड्या या वेळापत्रकानुसार धावतात आणि संबंधित ठिकाणावर वेगाने माल पोहोचवितातराज्य हद्दीवर वाहतुकीच्या मुद्यांना याचा सामना करावा लागत नाही. रेल्वे पार्सल वाहतुकीचे दर देखील रोडवेच्या तुलनेत आहेत

सुजल पाटील 

सोलापूर : लॉकडाऊनमध्ये मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून पार्सल गाड्या सुरू केल्या; मात्र या गाड्यांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. मागील १९ दिवसात पार्सल गाडीने फक्त २७५ क्विंटल मालाची वाहतूक झाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

सोलापूर विभागातून ८ एप्रिलपासून पार्सलची वाहतूक सुरू करण्यात आली. सोलापूर विभागातून मुंबई-चेन्नई, मुंबई-सिकंदराबाद आणि साप्ताहिक गाडी राजकोट-कोईमतूर ही धावत आहे; मात्र रेल्वे प्रशासनाला पार्सल गाड्यांमधून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नसल्याचे सांगण्यात आले. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतूक कमी आर्थिक बजेटमधून होत आहे. याचा फायदा व्यापारी, कारखानदार, शेतकºयांनी घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

कृषी मालाची साखळी खंडित झाली आहे. या कोरोना साथीच्या आजारात शेतकºयांकडून खरेदी करणारे एजंट कोणताही धोका घेत नाहीत. कामगारांची कमतरता, मार्केट यार्ड बंद , नागरी प्रशासनाद्वारे निर्बंध इत्यादी कारणांमुळे ते शेतकºयांकडून माल खरेदी करीत नाहीत. शेती उत्पादन हे नाशवंत असल्याने त्वरित निकाली काढावे लागत आहे. अशा एक ना अनेक कारणांमुळे प्रतिसाद कमी मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

उत्पन्न मिळाले फक्त ५० हजार...- व्यापारी, कारखानदार, शेतकरी यांच्या मागणीनुसार मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने ८ एप्रिलपासून पार्सल वाहतूक सुरू केली. सुरुवातीला मुंबई-चेन्नई ही गाडी सुरू केली. प्रतिसाद पाहता पुन्हा मुंबई-सिकंदराबाद सुरू केली, त्यानंतर साप्ताहिक म्हणून राजकोट-कोईमतूर ही गाडी सुरू केली. मागील १९ दिवसात रेल्वेला पार्सल वाहतुकीतून केवळ ५० हजारांचे उत्पन्न मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सर्वांनी रेल्वे पार्सल वाहतुकीचा मार्ग अवलंब करावा. रस्ते वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे बरेच फायदे आहेत. पार्सल गाड्या या वेळापत्रकानुसार धावतात आणि संबंधित ठिकाणावर वेगाने माल पोहोचवितात. राज्य हद्दीवर वाहतुकीच्या मुद्यांना याचा सामना करावा लागत नाही. रेल्वे पार्सल वाहतुकीचे दर देखील रोडवेच्या तुलनेत आहेत. तसेच या पार्सल गाड्या पुढेही बºयाच कालावधीपर्यंत सुरू राहतील. तसेच ट्रान्सशीपमेंटलाही परवानगी आहे, त्यामुळे हा माल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पाठविला जाऊ शकतो.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे