शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

अरे माणसा माणसा ! कवा होणार माणूस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 16:29 IST

माणूस विमानाच्या सहाय्याने पक्ष्याप्रमाणे आकाशात संचार करायला शिकला, जहाजाच्या सहाय्याने पाण्यात माशाप्रमाणे फिरु लागला, अवकाश यानाने चंद्रावर गेला, अंतराळात ...

माणूस विमानाच्या सहाय्याने पक्ष्याप्रमाणे आकाशात संचार करायला शिकला, जहाजाच्या सहाय्याने पाण्यात माशाप्रमाणे फिरु लागला, अवकाश यानाने चंद्रावर गेला, अंतराळात फिरु लागला, पण अजून जमिनीवर माणसाप्रमाणे त्याला वागता येत नाही म्हणून तर नसेल ना, खान्देशातील प्रसिध्द आदरणीय कवयित्री बहिणाबार्इंनी प्रश्न विचारला ‘अरे माणसा माणसा! कवा होणार माणूस?’ त्याचीच प्रचिती आणून देणारी आजची कोर्ट स्टोरी.

जेलमधून पत्र आले. पत्रातील मजकुरावरुन समजून आले की, त्या बार्इंना लहान जन्मलेल्या मुलीच्या खुनाच्या आरोपावरुन अटक झालेली आहे, त्यांचे कोणीही नातेवाईक त्या बार्इंना अटक झाल्यापासून भेटायला आलेले नव्हते. मी त्यांचे वकीलपत्र घ्यावे अशी त्यांची इच्छा होती. माझ्या सहकारी वकिलांना त्या बार्इंची जेलमधून वकीलपत्रावर सही आणण्यास व केसची कागदपत्रे घेऊन येण्यास पाठविले. वकीलपत्रावर सही व कागदपत्रे मिळाली. तिसरी मुलगीच झाल्यामुळे तिचा नवरा व सासरचे लोक तिला प्रचंड त्रास देत होते. नवरा तर तिला नेहमी बेदम मारहाण करीत असे. त्या छळाला कंटाळून तिने काही दिवसांपूर्वीच जन्माला आलेल्या मुलीला कवटाळून विहिरीत उडी घेतली होती. शेजारच्या शेतात काम करणारा शेतकरी ताबडतोब विहिरीवर पळत गेला. त्याने विहिरीत उडी मारुन तिला वाचविले. परंतु ते बाळ बुडाले होते. तिच्यावर त्या बाळाचा खून केला व तिने स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन तिच्याविरुध्द खटला दाखल झाला होता. तिच्यातर्फे आम्ही जामीन अर्ज दाखल केला. आरोपी महिला असल्यामुळे न्यायाधीशांनी तिचा जामीन अर्ज मंजूर केला. तिच्या नवºयाला जामीन घेऊन येण्याबद्दल पत्र लिहिले. नवरा भेटायलादेखील आला नाही. तिला वडील नव्हते.

विधवा आई मजुरी करुन बेघर वस्तीत राहून कसेबसे जीवन जगत होती. तिलादेखील पत्र पाठविले. ती आली. तिने जामीनदार मिळविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तिला जामीनदार मिळाला नाही. तिच्या नवºयाच्या गावचा एकजण आला होता. त्याला तिच्या नवºयाला जामीन देण्यासाठी बोलावून आणण्यासाठी सांगितले. तो म्हणाला, तिचा नवरा हरामखोर आहे. बायको जेलमध्येच राहावी  व तिला जन्मठेप होऊन कायमची ती जेलमध्येच राहावी अशी त्याची इच्छा आहे. त्याने दुसरे लग्न करायची तयारी सुरुदेखील केली आहे, असेदेखील त्याने सांगितले. त्या दुर्दैवी स्त्रीची केस तर फारच विचित्र होती. शिक्षा होण्याची दाट शक्यता होती. खटल्याच्या दिवशी तिला जेलमधून आणण्यात आले. तिला मी स्पष्टपणे सर्व गोष्टीची कल्पना दिली. ती ढसाढसा रडत म्हणाली, वकीलसाहेब त्या दिवशी मी मेले असते तर किती बरे झाले असते हो. मला फार गलबलून आले.

यथावकाश केसची सुनावणी सुरु झाली. मला तर सर्व अंधकारच जाणवत होता. सोलापुरातील ख्यातनाम डॉ. विजय कानेटकर यांची गाठ घेतली. त्यांना केसची सर्व कल्पना दिली. शवविच्छेदन अहवाल दाखविला. शवविच्छेदन अहवाल त्यांनी बारकाईने वाचला. त्यातील त्रुटी सांगितल्या. त्यांच्या मार्गदर्शनानुसार शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांचा उलट तपास करुन सदर बालकाचा मृत्यू बुडाल्यामुळे झाला हा त्या डॉक्टरांचा निष्कर्ष किती चुकीचा आहे हे त्या डॉक्टर साक्षीदाराकडून कबूल करुन घेतले. त्या बालकाचा मृत्यू बुडून झाल्यामुळे, ‘झाला’ याबद्दलचा पुरावा संशयास्पद आहे, तहान लागल्यामुळे विहिरीत पाणी किती आहे हे वाकून बघताना तोल जाऊन ती स्त्री आरोपी विहिरीत पडली असा आमचा बचाव होता. न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली. निकालाच्या दिवशी तिचा नवरा अगर आई कोणीही आले नव्हते. एस.टी.बसचे तिकीट व इतर खर्चाला पैसे देऊन तिला तिच्या आईकडे पाठविले. दिवसामागून दिवस जात होते. एकेदिवशी एक मनुष्य केसची कागदपत्रे घेऊन आॅफिसला आला. मुलगी झाल्यामुळे केलेल्या छळामुळे त्याच्या सुनेने आत्महत्या केलेली होती. त्याबद्दल त्याच्या मुलावर खटला भरण्यात आलेला होता. आरोपीचे नाव बघताच मी चमकलो. 

वाचक हो तो आरोपी त्या बाईचाच नवरा होता. त्याने दुसरे लग्न केले. दुसºया बायकोलादेखील दोन मुलीच झाल्या म्हणून तो तिचा छळ करत होता. त्या छळाला कंटाळूनच त्याच्या बायकोने आत्महत्या केली होती. कवयित्री बहिणाबाई म्हणतात हेच खरे     अरे माणसा माणसा !  कवा होणार माणूस?- अ‍ॅड. धनंजय माने(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी