शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

सोलापूर जिल्ह्यातील पुनर्वसन जमीन वाटप प्रकरणात अधिकारी दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:04 IST

राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले कारवाई करण्याचे आदेश

ठळक मुद्देराज्यात ५५ लाख प्रकल्पबाधित व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे चावडी वाचन करण्याचे आदेशडिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप

सोलापूर : जिल्ह्यात पुनर्वसन जमीन वाटपात दोषी असलेल्या अधिकाºयांवर निश्चितपणे कारवाई होईल. लवकरात लवकर कारवाई होईल यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली. उजनीसाठी संपादित झालेल्या ९२ गावांपैकी ८८ गावे नव्याने वसविण्यात आली आहेत. या पुनर्वसित गावांमध्ये १८ प्रकारच्या नागरी सुविधा देण्यासाठी जलसंपदा विभागाने ३३० कोटींचा आराखडा मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी माधव भंडारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता आर. के. जगताप, एस. एम. जगताप, एन. व्ही, जिवणे, बाळासाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, मोहिनी चव्हाण, प्रवीण साळुंके आदी उपस्थित होते.

भंडारी म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतलेले नव्हते. चार महिन्यांपूर्वी प्राधिकरणाचे काम माझ्याकडे आले. राज्यात ५५ लाख प्रकल्पबाधित आहेत म्हणजेच त्यांच्या ५५ लाख समस्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकर सोडवल्या पाहिजेत. उजनी धरण तयार झाल्यापासून धरणग्रस्तांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांच्या तक्रारी सुरूच आहेत़ १ डिसेंबरपर्यंत विस्थापितांच्या याद्या संकलन करून त्याबाबत लोकसुनावणी व चावडी वाचन करून याद्या निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यायी जमिनी दिलेल्या धरणग्रस्तांची यादी तयार करण्यास सांगितले आहे़ विशेष म्हणजे व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे चावडी वाचन करण्याचे आदेश देण्यात आले आहे़

३५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावठाण व ग्रामपंचायतींचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़ जिल्ह्यात एकूण ५ हजार ६७१ प्रकल्पग्रस्त असून, त्यातील ३ हजार ३६६ पात्र आहेत़ त्यापैकी १ हजार १६२ जणांना जमीन वाटप केली आहे़ डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  

दोन जिल्ह्यांसाठी शिबिरे- सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सोलापूर जिल्ह्यात शिबीर आयोजित करण्याच्या सूचनाही भंडारी यांनी आढावा बैठकीत दिल्या. ज्या शेतकºयांना जमिनीच्या मोबदल्यात जमीन नको असेल तर त्यांना स्वेच्छा पुनर्वसनाच्या माध्यमातून रोख रक्कम दिली जाईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयUjine Damउजनी धरण