शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील पुनर्वसन जमीन वाटप प्रकरणात अधिकारी दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:04 IST

राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिले कारवाई करण्याचे आदेश

ठळक मुद्देराज्यात ५५ लाख प्रकल्पबाधित व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे चावडी वाचन करण्याचे आदेशडिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप

सोलापूर : जिल्ह्यात पुनर्वसन जमीन वाटपात दोषी असलेल्या अधिकाºयांवर निश्चितपणे कारवाई होईल. लवकरात लवकर कारवाई होईल यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली. उजनीसाठी संपादित झालेल्या ९२ गावांपैकी ८८ गावे नव्याने वसविण्यात आली आहेत. या पुनर्वसित गावांमध्ये १८ प्रकारच्या नागरी सुविधा देण्यासाठी जलसंपदा विभागाने ३३० कोटींचा आराखडा मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी माधव भंडारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता आर. के. जगताप, एस. एम. जगताप, एन. व्ही, जिवणे, बाळासाहेब जाधव, उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, मोहिनी चव्हाण, प्रवीण साळुंके आदी उपस्थित होते.

भंडारी म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न शासनाने गांभीर्याने घेतलेले नव्हते. चार महिन्यांपूर्वी प्राधिकरणाचे काम माझ्याकडे आले. राज्यात ५५ लाख प्रकल्पबाधित आहेत म्हणजेच त्यांच्या ५५ लाख समस्या आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या लवकर सोडवल्या पाहिजेत. उजनी धरण तयार झाल्यापासून धरणग्रस्तांना अद्याप न्याय मिळाला नाही. त्यांच्या तक्रारी सुरूच आहेत़ १ डिसेंबरपर्यंत विस्थापितांच्या याद्या संकलन करून त्याबाबत लोकसुनावणी व चावडी वाचन करून याद्या निश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पर्यायी जमिनी दिलेल्या धरणग्रस्तांची यादी तयार करण्यास सांगितले आहे़ विशेष म्हणजे व्हिडीओ चित्रीकरणाद्वारे चावडी वाचन करण्याचे आदेश देण्यात आले आहे़

३५० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावठाण व ग्रामपंचायतींचे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे़ जिल्ह्यात एकूण ५ हजार ६७१ प्रकल्पग्रस्त असून, त्यातील ३ हजार ३६६ पात्र आहेत़ त्यापैकी १ हजार १६२ जणांना जमीन वाटप केली आहे़ डिसेंबर २०१९ पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  

दोन जिल्ह्यांसाठी शिबिरे- सातारा आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत सोलापूर जिल्ह्यात शिबीर आयोजित करण्याच्या सूचनाही भंडारी यांनी आढावा बैठकीत दिल्या. ज्या शेतकºयांना जमिनीच्या मोबदल्यात जमीन नको असेल तर त्यांना स्वेच्छा पुनर्वसनाच्या माध्यमातून रोख रक्कम दिली जाईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयUjine Damउजनी धरण