शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सोलापुरातील रेल्वे प्रवाशांची संख्या घटली; रोज होतात दीडशे तिकीटं रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 13:46 IST

रेल्वे स्थानक: वाढत्या कोरोनाचा परिणाम जाणवतोय

सोलापूर : वाढत्या कोरोनामुळे राज्यात कडक संचारबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे लोक बाहेर अथवा परगावी जाणे टाळत आहेत. शिवाय लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेमुळे प्रवासी रेल्वेने प्रवास करणे टाळत आहेत. सोलापूर विभागातील २०० लोक दररोज १४७ तिकिटे रद्द करीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृत्युदरातही मोठी वाढ दिसून येत आहे. रुग्णसंख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केले आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. शिवाय संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबत चर्चा होत असल्याने लोक रेल्वेने प्रवास करण्याचे टाळत आहेत. आपली आजची कामे उद्या, परवा अन् महिन्यानंतर पुढे ढकलून घरातच राहणे पसंत करीत आहेत. मागील काही दिवसांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. 

  • मुंबई, पुण्याची गर्दी ओसरली...
  •  कडक संचारबंदी व लॉकडाऊनच्या भीतीने पुणे, मुंबईमधील लोक सोलापूरकडे परतत होते. मात्र मागील आठवड्यापासून परत येणाऱ्यांची संख्या ओसरल्याचे पाहावयास मिळत आहे.n रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना केंद्र व राज्य शासनाने दिलेले कोरोनाविषयक सर्व नियम पाळणे बंधनकारक केले आहे. 
  •  शासनाने धार्मिक स्थळे बंद केल्याने रेल्वेने पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विशेष रेल्वे गाड्यांनाही गर्दी कमीच...रेल्वे प्रशासनाने कोरोनानंतर प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित तिकीट असलेल्यांनाच प्रवास करता येत होता, मात्र मागील काही दिवसांपासून याही विशेष गाड्यांमधील प्रवाशांची संख्या कमीच झाली आहे. प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. मात्र मालवाहतूक गाड्या सुरूच आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे