शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोलापुरातील रेल्वे प्रवाशांची संख्या घटली; रोज होतात दीडशे तिकीटं रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 13:46 IST

रेल्वे स्थानक: वाढत्या कोरोनाचा परिणाम जाणवतोय

सोलापूर : वाढत्या कोरोनामुळे राज्यात कडक संचारबंदीचे आदेश आहेत. त्यामुळे लोक बाहेर अथवा परगावी जाणे टाळत आहेत. शिवाय लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेमुळे प्रवासी रेल्वेने प्रवास करणे टाळत आहेत. सोलापूर विभागातील २०० लोक दररोज १४७ तिकिटे रद्द करीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृत्युदरातही मोठी वाढ दिसून येत आहे. रुग्णसंख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी शासनाने ३० एप्रिलपर्यंत कडक संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद केले आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडत नाहीत. शिवाय संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबत चर्चा होत असल्याने लोक रेल्वेने प्रवास करण्याचे टाळत आहेत. आपली आजची कामे उद्या, परवा अन् महिन्यानंतर पुढे ढकलून घरातच राहणे पसंत करीत आहेत. मागील काही दिवसांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. 

  • मुंबई, पुण्याची गर्दी ओसरली...
  •  कडक संचारबंदी व लॉकडाऊनच्या भीतीने पुणे, मुंबईमधील लोक सोलापूरकडे परतत होते. मात्र मागील आठवड्यापासून परत येणाऱ्यांची संख्या ओसरल्याचे पाहावयास मिळत आहे.n रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना केंद्र व राज्य शासनाने दिलेले कोरोनाविषयक सर्व नियम पाळणे बंधनकारक केले आहे. 
  •  शासनाने धार्मिक स्थळे बंद केल्याने रेल्वेने पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

विशेष रेल्वे गाड्यांनाही गर्दी कमीच...रेल्वे प्रशासनाने कोरोनानंतर प्रवाशांसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित तिकीट असलेल्यांनाच प्रवास करता येत होता, मात्र मागील काही दिवसांपासून याही विशेष गाड्यांमधील प्रवाशांची संख्या कमीच झाली आहे. प्रवासी संख्या घटल्याने रेल्वेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. मात्र मालवाहतूक गाड्या सुरूच आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे