शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील एनटीपीसी, विमानतळाबाबत खासदारांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे ! सुशिलकुमार शिंदे यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:03 IST

सोलापूर : बोरामणीचे विमानतळ होणारच नाही आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची गरज नव्हती, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. त्यातून विद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनी अलीकडेच बोरामणी येथील नियोजित विमानतळ होणारच नाही तसेच फताटेवाडी येथील ...

ठळक मुद्देविद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट - सुशीलकुमार शिंदे बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित - सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : बोरामणीचे विमानतळ होणारच नाही आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची गरज नव्हती, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. त्यातून विद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनी अलीकडेच बोरामणी येथील नियोजित विमानतळ होणारच नाही तसेच फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या प्रकल्पाची गरज नव्हती, असे विधान केले होते. त्यासंदर्भात बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, असे वक्तव्य आमदार, खासदार पदावर असणाºया लोकप्रतिनिधींना अशोभनीय आहे.

खरं म्हणजे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांची माहिती घ्यायला हवी होती. हे प्रकल्प त्यांना पूर्ण करता आले नाहीत, हे त्यांच्या सरकारचे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असावे, असा टोमणा त्यांनी मारला. होटगी रोडवरील विमानतळाचे क्षेत्रफळ अतिशय कमी आहे. जागा अपुरी असल्याने फारतर छोटी विमाने या विमानतळावर उतरू शकत होती. वाढते शहर आणि सध्याच्या होटगी रोडवरील विमानतळासमोरील अडचणी जाणून नवीन विमानतळाची गरज आहे. त्यामुळेच  बोरामणी येथे विमानतळ उभारण्यासाठी मंजुरी घ्यावी लागली. सोलापूरच्या विकासात दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या नवीन विमानतळाला मंजुरी दिली आहे. 

बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित केली. प्राधिकरणाने महाराष्ट्र सरकारशी याबाबतचा करार केला आहे. ५१ टक्के शेअर्स प्राधिकरणाचे तर महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार आहे. विमानतळ होणार नसेल तर एवढी मोठी रक्कम सरकारने का गुंतवली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरं म्हणजे आत्तापर्यंत विमानतळ पूर्णत्वास जायला हवे होते; परंतु तसे काही घडले नाही. पाठपुरावा नसल्याने विमानतळाचे घोडे अडले आहे, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी अलीकडेच विमानतळ प्राधिकरणाला पाठवलेल्या पत्रात बोरामणीचे विमानतळ हैदराबाद, बेंगलोरच्या धरतीवर विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. याकडे शिंदे यांनी खा. शरद बनसोडे यांचे लक्ष वेधले. प्रकल्प पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक आहे, परंतु विकासकामांची आस नसेल तर विकास कसा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फताटेवाडीच्या एनटीपीसी प्रकल्पाबाबतही खा. बनसोडे यांनी केलेले विधान हास्यास्पद असल्याचा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.  ते म्हणाले, एनटीपीसीचा प्रकल्प गरजेचा नाही, असे त्यांचे मत असेल, परंतु वीज निर्मिती प्रकल्प उभारणे ही देशाची गरज आहे.

या प्रकल्पात निर्माण केलेली वीज देशाची गरज भागवते आणि महाराष्ट्रालाही वीज पुरवण्यात येणार आहे. याचा उपयोग नाही, असे कसे म्हणता येईल? आधी एनटीपीसीमुळे तापमान वाढणार, प्रदूषण होणार, अशाही चर्चा रंगल्या होत्या. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा युक्तिवादही शिंदे यांनी केला. सुपर क्रिटीकल यंत्रसामुग्री वापरल्याने हा प्रकल्प दर्जेदार आणि प्रदूषणमुक्त असल्याचा दावा त्यांनी केला

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपा