शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

सोलापूरातील एनटीपीसी, विमानतळाबाबत खासदारांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे ! सुशिलकुमार शिंदे यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:03 IST

सोलापूर : बोरामणीचे विमानतळ होणारच नाही आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची गरज नव्हती, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. त्यातून विद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनी अलीकडेच बोरामणी येथील नियोजित विमानतळ होणारच नाही तसेच फताटेवाडी येथील ...

ठळक मुद्देविद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट - सुशीलकुमार शिंदे बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित - सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : बोरामणीचे विमानतळ होणारच नाही आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची गरज नव्हती, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. त्यातून विद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनी अलीकडेच बोरामणी येथील नियोजित विमानतळ होणारच नाही तसेच फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या प्रकल्पाची गरज नव्हती, असे विधान केले होते. त्यासंदर्भात बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, असे वक्तव्य आमदार, खासदार पदावर असणाºया लोकप्रतिनिधींना अशोभनीय आहे.

खरं म्हणजे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांची माहिती घ्यायला हवी होती. हे प्रकल्प त्यांना पूर्ण करता आले नाहीत, हे त्यांच्या सरकारचे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असावे, असा टोमणा त्यांनी मारला. होटगी रोडवरील विमानतळाचे क्षेत्रफळ अतिशय कमी आहे. जागा अपुरी असल्याने फारतर छोटी विमाने या विमानतळावर उतरू शकत होती. वाढते शहर आणि सध्याच्या होटगी रोडवरील विमानतळासमोरील अडचणी जाणून नवीन विमानतळाची गरज आहे. त्यामुळेच  बोरामणी येथे विमानतळ उभारण्यासाठी मंजुरी घ्यावी लागली. सोलापूरच्या विकासात दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या नवीन विमानतळाला मंजुरी दिली आहे. 

बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित केली. प्राधिकरणाने महाराष्ट्र सरकारशी याबाबतचा करार केला आहे. ५१ टक्के शेअर्स प्राधिकरणाचे तर महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार आहे. विमानतळ होणार नसेल तर एवढी मोठी रक्कम सरकारने का गुंतवली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरं म्हणजे आत्तापर्यंत विमानतळ पूर्णत्वास जायला हवे होते; परंतु तसे काही घडले नाही. पाठपुरावा नसल्याने विमानतळाचे घोडे अडले आहे, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी अलीकडेच विमानतळ प्राधिकरणाला पाठवलेल्या पत्रात बोरामणीचे विमानतळ हैदराबाद, बेंगलोरच्या धरतीवर विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. याकडे शिंदे यांनी खा. शरद बनसोडे यांचे लक्ष वेधले. प्रकल्प पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक आहे, परंतु विकासकामांची आस नसेल तर विकास कसा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फताटेवाडीच्या एनटीपीसी प्रकल्पाबाबतही खा. बनसोडे यांनी केलेले विधान हास्यास्पद असल्याचा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.  ते म्हणाले, एनटीपीसीचा प्रकल्प गरजेचा नाही, असे त्यांचे मत असेल, परंतु वीज निर्मिती प्रकल्प उभारणे ही देशाची गरज आहे.

या प्रकल्पात निर्माण केलेली वीज देशाची गरज भागवते आणि महाराष्ट्रालाही वीज पुरवण्यात येणार आहे. याचा उपयोग नाही, असे कसे म्हणता येईल? आधी एनटीपीसीमुळे तापमान वाढणार, प्रदूषण होणार, अशाही चर्चा रंगल्या होत्या. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा युक्तिवादही शिंदे यांनी केला. सुपर क्रिटीकल यंत्रसामुग्री वापरल्याने हा प्रकल्प दर्जेदार आणि प्रदूषणमुक्त असल्याचा दावा त्यांनी केला

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपा