शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

सोलापूरातील एनटीपीसी, विमानतळाबाबत खासदारांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे ! सुशिलकुमार शिंदे यांची भाजपावर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:03 IST

सोलापूर : बोरामणीचे विमानतळ होणारच नाही आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची गरज नव्हती, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. त्यातून विद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनी अलीकडेच बोरामणी येथील नियोजित विमानतळ होणारच नाही तसेच फताटेवाडी येथील ...

ठळक मुद्देविद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट - सुशीलकुमार शिंदे बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित - सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार - सुशीलकुमार शिंदे

सोलापूर : बोरामणीचे विमानतळ होणारच नाही आणि फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची गरज नव्हती, असे वक्तव्य लोकप्रतिनिधींना शोभत नाही. त्यातून विद्यमान सरकारची निष्क्रियता स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

सोलापूरचे भाजपा खासदार शरद बनसोडे यांनी अलीकडेच बोरामणी येथील नियोजित विमानतळ होणारच नाही तसेच फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या प्रकल्पाची गरज नव्हती, असे विधान केले होते. त्यासंदर्भात बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, असे वक्तव्य आमदार, खासदार पदावर असणाºया लोकप्रतिनिधींना अशोभनीय आहे.

खरं म्हणजे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांची माहिती घ्यायला हवी होती. हे प्रकल्प त्यांना पूर्ण करता आले नाहीत, हे त्यांच्या सरकारचे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले असावे, असा टोमणा त्यांनी मारला. होटगी रोडवरील विमानतळाचे क्षेत्रफळ अतिशय कमी आहे. जागा अपुरी असल्याने फारतर छोटी विमाने या विमानतळावर उतरू शकत होती. वाढते शहर आणि सध्याच्या होटगी रोडवरील विमानतळासमोरील अडचणी जाणून नवीन विमानतळाची गरज आहे. त्यामुळेच  बोरामणी येथे विमानतळ उभारण्यासाठी मंजुरी घ्यावी लागली. सोलापूरच्या विकासात दळणवळणाचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकारने या नवीन विमानतळाला मंजुरी दिली आहे. 

बोरामणी येथे ५४९.३४ हेक्टर जमीन राष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने संपादित केली. प्राधिकरणाने महाराष्ट्र सरकारशी याबाबतचा करार केला आहे. ५१ टक्के शेअर्स प्राधिकरणाचे तर महाराष्ट्र सरकारने ४९ टक्के गुंतवणुकीचा हा करार आहे. विमानतळ होणार नसेल तर एवढी मोठी रक्कम सरकारने का गुंतवली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खरं म्हणजे आत्तापर्यंत विमानतळ पूर्णत्वास जायला हवे होते; परंतु तसे काही घडले नाही. पाठपुरावा नसल्याने विमानतळाचे घोडे अडले आहे, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी अलीकडेच विमानतळ प्राधिकरणाला पाठवलेल्या पत्रात बोरामणीचे विमानतळ हैदराबाद, बेंगलोरच्या धरतीवर विकसित करण्याचा मानस व्यक्त केला आहे. याकडे शिंदे यांनी खा. शरद बनसोडे यांचे लक्ष वेधले. प्रकल्प पुढे नेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आवश्यक आहे, परंतु विकासकामांची आस नसेल तर विकास कसा होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

फताटेवाडीच्या एनटीपीसी प्रकल्पाबाबतही खा. बनसोडे यांनी केलेले विधान हास्यास्पद असल्याचा टोला सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला.  ते म्हणाले, एनटीपीसीचा प्रकल्प गरजेचा नाही, असे त्यांचे मत असेल, परंतु वीज निर्मिती प्रकल्प उभारणे ही देशाची गरज आहे.

या प्रकल्पात निर्माण केलेली वीज देशाची गरज भागवते आणि महाराष्ट्रालाही वीज पुरवण्यात येणार आहे. याचा उपयोग नाही, असे कसे म्हणता येईल? आधी एनटीपीसीमुळे तापमान वाढणार, प्रदूषण होणार, अशाही चर्चा रंगल्या होत्या. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा युक्तिवादही शिंदे यांनी केला. सुपर क्रिटीकल यंत्रसामुग्री वापरल्याने हा प्रकल्प दर्जेदार आणि प्रदूषणमुक्त असल्याचा दावा त्यांनी केला

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपा