शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक वनीकरण; आता संस्थांच्या मदतीने नऊ लाख वृक्षारोपणाचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:33 IST

लॉकडाऊनमुळे शासन निधी कपात, हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देमहायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविली‘वृक्षलागवड योजना माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू कोरोनाने राज्यात पाय पसरले आणि ही योजना कार्यान्वित होता होता थांबली

सोलापूर : पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्षलागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हरित महाराष्ट्र अभियानाला लॉक बसण्याची शक्यता आहे. यंदा ९ लाख रोपं तयार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सामाजिक संस्थांच्या मदतीने हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न सामाजिक वनीकरणाने चालवला असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी सुवर्णा झोळ-माने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविली. त्याच पद्धतीने पर्यावरण संतुलनासाठी ‘वृक्षलागवड योजना माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू ठेवण्याचा निर्णय वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला. मात्र कोरोनाने राज्यात पाय पसरले आणि ही योजना कार्यान्वित होता होता थांबली. 

१ जुलैपासून एसआरपी कॅम्प, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यावर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सामाजिक वनीकरणाशी संपर्क साधला आहे. त्यांना मोफत विविध प्रकारची रोपं पुरवली जात आहेत. तसेच याच काळात एनटीपीसी आणि पाणी फाउंडेशनसह अनेक संस्थांनीही वृक्षलागवड हाती घेतली आहे.

यंदाही ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांना कडूलिंब, चिंच, जांभूळ, सीताफळ अशी विविध मिक्स रोपं पुरवली जात आहेत. मात्र काही शेतकºयांनी बांबूकडे कल ठेवला आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात दरवर्षी मागणी वाढते. सध्या माळशिरस, मोहोळ, उत्तर, दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातून रोपं नेऊन लागवडी करण्याला प्रतिसाद मिळतोय.

शतकोटी वृक्षलागवड अभियानासाठी वर्षभर तयारी चालायची. या वर्षी निधीत कपात झाली आहे. मात्र जिल्ह्यात १७ रोपवाटिकांच्या माध्यमातून ९ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे फिल्डवरील कामे रखडली असली तरी एमआरजीएस (महात्मा गांधी राष्ट्रीय अभियान) मधून ही कामे सुरू ठेवली आहेत. - सुवर्णा झोळ-माने, उपविभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडenvironmentपर्यावरण