शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सामाजिक वनीकरण; आता संस्थांच्या मदतीने नऊ लाख वृक्षारोपणाचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:33 IST

लॉकडाऊनमुळे शासन निधी कपात, हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देमहायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविली‘वृक्षलागवड योजना माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू कोरोनाने राज्यात पाय पसरले आणि ही योजना कार्यान्वित होता होता थांबली

सोलापूर : पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्षलागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हरित महाराष्ट्र अभियानाला लॉक बसण्याची शक्यता आहे. यंदा ९ लाख रोपं तयार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सामाजिक संस्थांच्या मदतीने हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न सामाजिक वनीकरणाने चालवला असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी सुवर्णा झोळ-माने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविली. त्याच पद्धतीने पर्यावरण संतुलनासाठी ‘वृक्षलागवड योजना माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू ठेवण्याचा निर्णय वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला. मात्र कोरोनाने राज्यात पाय पसरले आणि ही योजना कार्यान्वित होता होता थांबली. 

१ जुलैपासून एसआरपी कॅम्प, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यावर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सामाजिक वनीकरणाशी संपर्क साधला आहे. त्यांना मोफत विविध प्रकारची रोपं पुरवली जात आहेत. तसेच याच काळात एनटीपीसी आणि पाणी फाउंडेशनसह अनेक संस्थांनीही वृक्षलागवड हाती घेतली आहे.

यंदाही ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांना कडूलिंब, चिंच, जांभूळ, सीताफळ अशी विविध मिक्स रोपं पुरवली जात आहेत. मात्र काही शेतकºयांनी बांबूकडे कल ठेवला आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात दरवर्षी मागणी वाढते. सध्या माळशिरस, मोहोळ, उत्तर, दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातून रोपं नेऊन लागवडी करण्याला प्रतिसाद मिळतोय.

शतकोटी वृक्षलागवड अभियानासाठी वर्षभर तयारी चालायची. या वर्षी निधीत कपात झाली आहे. मात्र जिल्ह्यात १७ रोपवाटिकांच्या माध्यमातून ९ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे फिल्डवरील कामे रखडली असली तरी एमआरजीएस (महात्मा गांधी राष्ट्रीय अभियान) मधून ही कामे सुरू ठेवली आहेत. - सुवर्णा झोळ-माने, उपविभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडenvironmentपर्यावरण