शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

सामाजिक वनीकरण; आता संस्थांच्या मदतीने नऊ लाख वृक्षारोपणाचा केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:33 IST

लॉकडाऊनमुळे शासन निधी कपात, हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देमहायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविली‘वृक्षलागवड योजना माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू कोरोनाने राज्यात पाय पसरले आणि ही योजना कार्यान्वित होता होता थांबली

सोलापूर : पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्षलागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हरित महाराष्ट्र अभियानाला लॉक बसण्याची शक्यता आहे. यंदा ९ लाख रोपं तयार असून जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सामाजिक संस्थांच्या मदतीने हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्याचा प्रयत्न सामाजिक वनीकरणाने चालवला असल्याची माहिती उपविभागीय वन अधिकारी सुवर्णा झोळ-माने यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महायुती सरकारने मागील पाच वर्षांत राज्यात शतकोटी वृक्षलागवड योजना राबविली. त्याच पद्धतीने पर्यावरण संतुलनासाठी ‘वृक्षलागवड योजना माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र’ या नावाने योजना सुरू ठेवण्याचा निर्णय वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला. मात्र कोरोनाने राज्यात पाय पसरले आणि ही योजना कार्यान्वित होता होता थांबली. 

१ जुलैपासून एसआरपी कॅम्प, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षारोपणाला सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यावर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सामाजिक वनीकरणाशी संपर्क साधला आहे. त्यांना मोफत विविध प्रकारची रोपं पुरवली जात आहेत. तसेच याच काळात एनटीपीसी आणि पाणी फाउंडेशनसह अनेक संस्थांनीही वृक्षलागवड हाती घेतली आहे.

यंदाही ग्रामपंचायती आणि सामाजिक संस्थांना कडूलिंब, चिंच, जांभूळ, सीताफळ अशी विविध मिक्स रोपं पुरवली जात आहेत. मात्र काही शेतकºयांनी बांबूकडे कल ठेवला आहे. जुलै, आॅगस्ट महिन्यात दरवर्षी मागणी वाढते. सध्या माळशिरस, मोहोळ, उत्तर, दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातून रोपं नेऊन लागवडी करण्याला प्रतिसाद मिळतोय.

शतकोटी वृक्षलागवड अभियानासाठी वर्षभर तयारी चालायची. या वर्षी निधीत कपात झाली आहे. मात्र जिल्ह्यात १७ रोपवाटिकांच्या माध्यमातून ९ लाख रोपे तयार ठेवली आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे फिल्डवरील कामे रखडली असली तरी एमआरजीएस (महात्मा गांधी राष्ट्रीय अभियान) मधून ही कामे सुरू ठेवली आहेत. - सुवर्णा झोळ-माने, उपविभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडenvironmentपर्यावरण