शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

Good News; आता सोलापूर विभागातील शेतकºयांनाही मिळणार किसान रेलची सेवा

By appasaheb.patil | Updated: August 20, 2020 14:29 IST

मध्य रेल्वे: रोड वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे भाडे कमी, जलद व सुरक्षित माल पोहोचणार

ठळक मुद्देया किसान रेलमध्ये असलेल्या प्रत्येक कृषी मालाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणारया पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही रेल्वे गाडीत चोरीसारख्या घटना घडू नये, शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी आरपीएफ पोलीस तैनात

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील शेतकºयांच्या शेतात पिकविलेला माल आता जलद व कमी खर्चात हव्या त्या ठिकाणी पोहोचविणे सोपे झाले आहे़ दरम्यान, २१ आॅगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर भारतीय रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली किसान रेल सोलापूर विभागातून प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूरपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरू केली़ या रेल्वेतून भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात येणार आहे. सोलापूर आणि पुणे विभागामधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरातील शेतकरी डाळिंब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात़ ही ट्रेन छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाºयांच्या कृषी उत्पादनाच्या वाहतुकीची गरज भागविणार आहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा सुरुवातीला आठवड्यातून एकदा असणार आहे.

असा असेल किसान रेलचा प्रवासकिसान रेल प्रारंभी कोल्हापूरहून निघेल. मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकांवर थांबेल. सदर गाडीचे डबे गाडी क्र. ००१०७/ ००१०८ देवळाली-मुझफ्फरपूर-देवळाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूर या परिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येणार आहे़ यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांचा माल सुरक्षित आणि जलदगतीने पोहोचविण्यात रेल्वे प्रशासन यशस्वी ठरणार आहे़ 

चोरी रोखण्यासाठी आरपीएफ जवान तैनातया किसान रेलमध्ये असलेल्या प्रत्येक कृषी मालाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. या पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही. दरम्यान, रेल्वे गाडीत चोरीसारख्या घटना घडू नये, शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी आरपीएफ पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेagricultureशेती