शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

Good News; आता सोलापूर विभागातील शेतकºयांनाही मिळणार किसान रेलची सेवा

By appasaheb.patil | Updated: August 20, 2020 14:29 IST

मध्य रेल्वे: रोड वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे भाडे कमी, जलद व सुरक्षित माल पोहोचणार

ठळक मुद्देया किसान रेलमध्ये असलेल्या प्रत्येक कृषी मालाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणारया पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही रेल्वे गाडीत चोरीसारख्या घटना घडू नये, शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी आरपीएफ पोलीस तैनात

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील शेतकºयांच्या शेतात पिकविलेला माल आता जलद व कमी खर्चात हव्या त्या ठिकाणी पोहोचविणे सोपे झाले आहे़ दरम्यान, २१ आॅगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर भारतीय रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली किसान रेल सोलापूर विभागातून प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूरपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरू केली़ या रेल्वेतून भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात येणार आहे. सोलापूर आणि पुणे विभागामधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरातील शेतकरी डाळिंब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात़ ही ट्रेन छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाºयांच्या कृषी उत्पादनाच्या वाहतुकीची गरज भागविणार आहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा सुरुवातीला आठवड्यातून एकदा असणार आहे.

असा असेल किसान रेलचा प्रवासकिसान रेल प्रारंभी कोल्हापूरहून निघेल. मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकांवर थांबेल. सदर गाडीचे डबे गाडी क्र. ००१०७/ ००१०८ देवळाली-मुझफ्फरपूर-देवळाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूर या परिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येणार आहे़ यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांचा माल सुरक्षित आणि जलदगतीने पोहोचविण्यात रेल्वे प्रशासन यशस्वी ठरणार आहे़ 

चोरी रोखण्यासाठी आरपीएफ जवान तैनातया किसान रेलमध्ये असलेल्या प्रत्येक कृषी मालाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. या पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही. दरम्यान, रेल्वे गाडीत चोरीसारख्या घटना घडू नये, शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी आरपीएफ पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेagricultureशेती