शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

आता फक्त कोठडी, जामीन अन् तात्काळ कामांसाठीच चालणार न्यायालयाचे कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 13:34 IST

न्यायालयाचे कामकाज चालणार अडीच तास; ५० टक्के कर्मचारी राहणार हजर

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापकीय समितीने घेतलेल्या निर्णयानुसार न्यायालयाचे कामकाज अडीच तास चालणार आहे. दरम्यान, फक्त ५० टक्के कर्मचारी न्यायालयात हजर राहणार असून कोठडी, जामीन आणि तत्काळ कामे होणार आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सध्या राज्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत न्यायालयाचे कामकाज पूर्णवेळ सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा न्यायालयीन कामकाजामध्ये बदल करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि मॅजिस्ट्रेट न्यायालय केवळ एकाच सत्रामध्ये काम करणार आहे. जिल्हा न्यायालयात कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते १२.३० अशी वेळ देण्यात आली आहे. सकाळी १० ते १२.३० दरम्यान न्यायालयाचे कामकाज सुरू राहणार आहे.

दर शनिवारी व रविवारी न्यायालयाला सुटी राहणार आहे. अडीच ते तीन तासांच्या न्यायालयीन वेळेमध्ये फक्त ५० टक्के कर्मचारी कामावर हजर राहणार आहेत. एकूण न्यायाधीशांपैकी निम्मे न्यायाधीश एक दिवस तर निम्मे न्यायाधीश दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कामकाज पाहणार आहेत. कर्मचाऱ्यांनाही एक दिवसाआड काम करावे लागणार आहे. न्यायालयीन वेळेमध्ये फक्त आरोपींना पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी, जामीन व तत्काळ (अर्जंट) कामे होणार आहेत.

गेल्या वर्षीही घेण्यात आला होता निर्णय

गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमध्ये न्यायालयाने अशाच पद्धतीने अडीच ते तीन तासांचा कालावधी ठेवला होता. लॉकडाऊन उठल्यानंतर हळूहळू कामाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला होता. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपूर्वी खऱ्या अर्थाने न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरळीतपणे पूर्ण वेळ सुरू झाले होते. मात्र, वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा वेळ कमी करण्यात आला असून कर्मचाऱ्यांची संख्याही ५० टक्के केली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता प्रादुर्भाव वाढू नये म्हणून न्यायालयीन कामकाजामध्ये बदल करण्यात आला आहे. अडीच तासांच्या वेळेत फक्त महत्त्वाची कामे होणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि तालुका पातळीवरील सर्व न्यायालयांमध्ये पुढील आदेश होईपर्यंत हीच स्थिती राहणार आहे.

- ॲड. प्रदीपसिंग राजपूत, जिल्हा सरकारी वकील

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयPoliceपोलिस