शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

आमचंही योगदान लक्षात घ्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:14 IST

कोरोना व्हायरस तथा कोवीड-१९ या महामारीने पूर्ण जगाला विळखा घातला आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस त्याचा फैलाव वाढत आहे. आपत्कालिन परस्थिती ...

कोरोना व्हायरस तथा कोवीड-१९ या महामारीने पूर्ण जगाला विळखा घातला आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस त्याचा फैलाव वाढत आहे. आपत्कालिन परस्थिती घोषित करून संचारबंदी घोषित केली आहे. घराच्या बाहेर पडण्यास प्रत्येकाला प्रतिबंध केला आहे. अशा जीवघेण्या संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. अशावेळी जनतेला अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, मीडिया हे रात्रंदिवस आपलें कार्य करीत आहेत प्रत्येकाचे कौतुक देखील होत आहे आणि ते झालेही पाहिजे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे.

परंतु घरात बसून ज्यामुळे वेळ काढू शकतो तो मोबाईल, टेलिव्हिजन, पंखा, एसी, लाईट किंवा दवाखान्यातील डॉक्टरचे ईलाज हे सर्व घडत आहे तो वीजपुरवठा अखंडित ठेवणारा, जीव धोक्यात घालून रात्रंदिवस राबणारा महानिर्मिती, महापारेषण, महावितरणचा अधिकारी- कर्मचारी यांची नोंद घेताना, उल्लेख होताना कुठे ही दिसत नाही. सहानुभूती दाखविली जात नाही. २ तास अन्नपाणी नाही मिळाले तरी चालते, १ तास रस्ता अडवला तरी चालतो, कोणत्याही कामात विलंब झालेला सहन करतो, कार्यालयीन दिरंगाई खपवून घेतो पण वीज बंद झालेली चालत नाही. वीज गेली की लगेच बेचैन होतो. लगेच कर्मचाºयांच्या नावाने लाखोली वहायला सुरू करतो.कोणत्याही कार्यालयातील कर्मचाºयाच्या फोन क्रमांकाची नोंद आपल्याजवळ नसली तरी चालते, परंतु वीजपुरवठ्यासंबंधी संबंधी वायरमन व सबस्टेशन पासून सर्व वरिष्ठ अधिका?्यांपर्यंत सर्वांच्या फोन क्रंमाकाच्या नोंदी कुटुंबातील सर्व व्यक्तीकडे असतात. वीजपुरवठा बंद पडला की, वेळकाळ न पहाता फोनवर रात्रीबेरात्री अखंड, अर्वाच्च भाषेत जागरूकता दाखविली जाते.  कर्मचाºयाला दमदाटी केली जाते. शिवाय काम पूर्ण झाल्यावरही कोणी त्याची सौजन्याने धन्यता मानील ही अपेक्षा दुरापास्त.

वीज कर्मचाºयालाही विश्रांतीची गरज असते, त्यालाही कुटुंब आहे, मुलबाळं आहेत, घरची कामे आहेत हे सर्व दुर्लक्षित करतो. म्हणूनच सतत त्रस्त, काळवंडलेले चेहरेच वीज कर्मचाºयांचे दिसून येतात. 

२४ तास कामाची बांधिलकी ! शिवाय जीवघेण्या विजेशी दिवसरात्र खेळताना केंव्हा जायबंदी होईल किंवा जीव गमवावा लागेल याचा भरोसा नाही. ग्राहकांची, जनतेची मर्जी राखत, त्यांचा मानसन्मान ठेवत अहोरात्र राबणाºया वीज कर्मचाºयाला शाब्बासकीची थाप कल्पनाबाह्य ! कामाचे कौतुक आणि प्रोत्साहन हे काम करणाºया  माणसात आणखी काम करण्याची उर्जा निर्माण करीत असते. प्रगत आणि जागृत देशामध्ये नोकरी हा नागरिकत्वाचा सन्मान असतो, लोकशाहीतील सजग नागरिकांनी तो जोपासला पाहिजे.??- अमेय केत(लेखक महापारेषणमध्ये उपकार्यकारी अभियंता आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस