शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
4
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
5
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
6
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
7
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
8
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
9
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
10
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
11
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
12
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
13
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
15
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
16
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
17
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
18
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
19
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
20
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   

coronavirus; ३१ मार्च नव्हे...आता १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार रेल्वेची प्रवासी वाहतूक

By appasaheb.patil | Updated: March 26, 2020 12:15 IST

रेल्वे बोर्डाची घोषणा; जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू राहणार

ठळक मुद्दे- भारतीय रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय- मालवाहतुक गाड्या सुरूच ठेवण्याचाही घेतला निर्णय- तिकीट आरक्षण केंद्रेही बंदच राहणार

सोलापूर : करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वेने ही १४ एप्रिलपर्यत देशभरात धावणा-या  सर्व प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय  घेतला आहे. देशात सर्वत्र धावणा-या मेल, एक्सप्रेस, प्रीमियम, पॅसेजर गाड्या १४ एप्रिल पर्यत रद्द करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी रेल्वे बोर्डाने केली. 

यापूर्वी  भारतीय रेल्वेने २२ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२०  पर्यत सर्व गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. देशातील विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. सर्व रेल्वे गाड्यां १४ एप्रिल २०२० च्या रात्री १२  वाजे पर्यतच्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सर्व स्थानकावरील आरक्षित काउंटर्स (पीआरएस) अनारक्षित तिकीट  काउंटर्स १४ एप्रिल-2020  पर्यंत बंद राहतील. रेल्वे स्थानकाबाहेरील अधिकृत तिकीट आरक्षण केंद्रे सध्या बंदच राहणार आहेत. यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी धावपळ करू नये. आॅनलाइन पध्दतीने तिकीटे काढलेल्यांचा परतावा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. ज्यांनी तिकीट खिडकीवरून काढली असतील, त्यांना परतावा मिळवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस