शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

नवे उद्योग, विमानसेवा केव्हा येणार सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:09 IST

जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा; तज्ज्ञ म्हणतात, शहर धुमसतंय, जागे व्हा

ठळक मुद्देशहरातील शेकडो मुले रोजगारासाठी पुणे, मुंबईत, हैदराबादेत स्थायिक झालीपुण्यात तर पुणेरी सोलापूर ही संघटना तयार होत आहे सोलापुरातून दरवर्षी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या शहरात नवे उद्योग यायला हवेत

राकेश कदम 

सोलापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. पण शहर आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचे नियोजन अद्याप झालेले नाही. जिल्ह्यातून दरवर्षी हजारो गुणवान तरुण-तरुणी पुण्याला स्थलांतरित होत आहेत.  आयटी पार्क, टेक्स्टाईल पार्क, विडी उद्योग आणि साखर कारखान्यातील कंत्राटी कामगारांची अडचण हे विषय गंभीर होत असले तरी निवडणुकीच्या प्रचारात या मुद्यांना दुय्यम स्थान मिळत आहे. त्यावर सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. पाणी ही जिल्ह्याच्या आणि शहराची प्रमुख गंभीर समस्या आहे. उजनी धरणावरचा ताण वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार उजनी धरणातील पाणी कमी पडणार आहे. 

कृष्णा खोºयातील अतिरिक्त पाणी उजनी धरणात वळवू. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी नाही. यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने कामगारांवर टांगती तलवार आहे. 

केंद्राच्या नव्या धोरणामुळे विडी कामगारांवर कोणत्याही क्षणी गंडांतर येऊ शकते. शहरात मंजूर झालेल्या टेक्स्टाईल पार्कचे काय झाले, नवे पार्क कधी येणार? याची फारशी चर्चा प्रचारात नाही. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. मागील काळात यासाठी काय प्रयत्न झाले आणि पुढील काळात आम्ही काय करु याचाही ऊहापोह व्हायला हवा.

 लोकसभेची निवडणूक लढविणाºया काही उमेदवारांना येथील मूळ प्रश्न माहीत नाही. देव, धर्म, कथित राष्ट्रभक्ती यावरच प्रचाराचा जोर आहे. उद्या निवडणूक संपल्यानंतर धर्म-राष्ट्रभक्ती नव्हे तर पाणी आणि रोजगाराचा विषय महत्त्वाचा असेल. 

तज्ज्ञ म्हणतात...राजकीय नेत्यांनी नव्या उद्योगांबरोबरच  बार्टी, यशदा सारख्या प्रशिक्षण संस्था सोलापुरात याव्यात. सोलापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावे, वर्किंग वूमनसाठी शेल्टर्स सुरू व्हावेत, उजनी धरणाचे प्रदूषण कमी व्हावे या मुद्द्यांवर बोलायला हवे. पाणी ही गंभीर समस्या आहे. पण धर्माच्या प्रचारात ती बाजूलाच ठेवली. - अ‍ॅड़ सरोजनी तमशेट्टी, विधी सल्लागार, सूर्यतारा म.ब. विकास सं. 

सोलापूरची परिस्थिती समजून घेऊनच निवडणुकीचा प्रचार व्हायला हवा. केवळ तरुणच नव्हे तर कष्टकरी माणसेही आता स्थलांतरित होत आहेत. टेक्स्टाईल पार्कविषयी खूप बोलले गेले.पण त्याविषयी काही झाले नाही. अशा विविध मुद्द्यांचा ऊहापोह निवडणुकीच्या प्रचारात व्हायला हवा. त्याऐवजी वेगळ्याच मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे.- प्रा. विलास बेत, सामाजिक कार्यकर्ते.

आतापर्यंत काय झाले उपाय?1 सोलापूर- पुणे चौपदरीकरण झाले. पण सोलापूर-हैदराबाद रस्त्याचे चौपदरीकरण खूपच संथगतीने सुरू आहे. सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-विजापूर चौपदरीकरणाच्या कामातही अपेक्षित गती दिसत नाही.    2 उजनीमुळे जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढली. पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला. हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली. 3 २००४ पासून आतापर्यंत शहरात नवे उद्योग आणण्याच्या बाता मारण्यात आल्या. प्रत्यक्षात त्यादृष्टीने विशेष हालचाली झाल्या  नाहीत.  

तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1 सोलापुरातून दरवर्षी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या शहरात नवे उद्योग यायला हवेत. सध्या कार्यरत असलेल्या उद्योगातील कामगारांचे शोषण थांबायला हवे.    2 विडी उद्योग, यंत्रमाग, साखर कारखान्यातील हंगामी कामगारांसह कंत्राटी कामगारांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण काम व्हायला हवे. या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी स्वस्तात शिक्षण, आरोग्याच्या सुविधा मिळायला हव्यात. 3 उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी, विमानसेवा हे विषय तातडीने मार्गी लागायला हवेत. 

पुणेरी सोलापूरकर !शहरातील शेकडो मुले रोजगारासाठी पुणे, मुंबईत, हैदराबादेत स्थायिक झाली आहेत. पुण्यात तर पुणेरी सोलापूर ही संघटना तयार होत आहे. हे स्थलांतर बंद व्हायला हवे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीbusinessव्यवसाय