शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण पाच दिवसात जाहीर होणार, पाशा पटेल यांची सोलापूर माहिती, सोलापूर बाजार समितीत सायंकाळच्या सौदे बाजार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:13 IST

तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे.

ठळक मुद्देतूर,मूग,सोयाबीन,उडीद,हरभरा,भुईमूग पिकांना किमान आधारभूत किंमत  देशात सुमारे १४ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा पेरा कमी झाला  शेतकरी केंद्रबिंदू मानून व्यापारी त्याच्या मालाला चांगला भाव देतात रात्रीच्या लिलाव बाजाराचा शुभारंभ तसेच आर. ओ. प्लांटचा लोकार्पणही करण्यात आला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे.या धोरणानंतर देशातील शेतक-यांना माणूस म्हणून जगण्याची संधी  असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी सांगितले.       सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे आणि भाजीपाला या नियंत्रित शेतीमालाचा सायंकाळच्या लिलावाचा शुभारंभ सोमवारी बाजार समिती परिसरातील कांदा सेल हॉल येथे पटेल यांच्या हस्ते करण्यात आला , त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे माजी  संचालक ,शहाजी पवार, देशमुख,बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे, प्रभारी सचिव विनोद पाटील,नानासाहेब देशमुख,रियाज बागवान,राजन जाधव,केदारनाथ उंबरजे,जगन्नाथ सिंदगी , प्रभुराज विभुते,महालिंगप्पा परमशेट्टी, ओसवाल,सिद्रामप्पा नरोणे,बाळू करवा,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  पाशा पटेल म्हणाले,गडकरी,रामविलास पासवान आणि राधामोहन सिंग यांच्यासह विविध खात्याच्या सचिवांची  एकत्रित बैठक नुकतीच झाली आहे. त्या बैठकळीला आपण स्वत: उपस्थित होतो. तूर,मूग,उडीद,भुईमूग,सोयाबीन,हरभरा या पिकांचे देशातील एकूण उत्पादन किती,गरज किती,राज्य सरकारने दराबाबत केलेली शिफारस याचा ताळमेळ घालून केंद्र सरकार येत्या पाच दिवसात किमान आधारभूत किमतीबाबत आपले नवीन व्यापक धोरण जाहीर करणार आहे. सप्टेंबर महिन्यात तूर,मूग आणि उडीद यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. लवकरच  हरभरा आणि मसूर या डाळींवरीलही निर्यातबंदी उठणार आहे. गेल्या बारा वर्षात चुकलेली घडी दुरुस्त करणार आहोत.स्वातंत्र्यानंतर शेतक-यांसाठी असा पहिलाच हा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.      पीक काढणीनंतर व्यवस्था नसल्याने देशात शेतकरी आणि व्यापारी यांचे वषार्काठी सुमारे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. स्थापन करण्यात आली आहे. सहा महिने राज्यातील सर्व पिकांच्या ८० शेतकरी प्रतिनिधींबरोबर बोलून प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर कायदा होणार असून उत्पन्न दुप्पट होण्यासाठी या कायद्याचा उपयोग होणार असल्याचे पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले.        देशात सुमारे १४ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे. मध्य प्रदेशात हा पेरा ७३ लाख हेक्टरवरून ५३ लाख हेक्टरवर आला आहे असेही त्यानीं सांगितले.   शेतकरी केंद्रबिंदू मानून व्यापारी त्याच्या मालाला चांगला भाव देतात. व्याप-यांना त्याचा हक्क आणि शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे .  पणनमंत्री सुभाष देशमुख आपल्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत. कोणाचाही व्यापार बुडावा आणि कोणाची गळचेपी होणार नाही असे सांगतानाच व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्यायालयात ११० पिटिशन दाखल केले असल्याचे शहाजी पवार यांनी सांगितले.         यानिमित्ताने पाशाभाई पटेल आणि मान्यवरांच्या हस्ते रात्रीच्या लिलाव बाजाराचा शुभारंभ तसेच आर. ओ. प्लांटचा लोकार्पणही करण्यात आला़ याप्रसंगी एन.एम खलिफा, अप्पासाहेब उंबरजे,राईस बागवान , सिद्धाराम तंबाके,सादिक बागवान,महालिंग परमशेट्टी , दिनेश उपासे,नारायण माशाळकर , श्रीमंत बंडगर,मुश्ताक चौधरी,त्रिंबक मुसळे,एस,एम , पौळ ,शिवानंद दरेकर यांच्यासह याडार्तील व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले तर आभार प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी मानले.