शहरं
Join us  
Trending Stories
1
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
2
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
3
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
4
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
5
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
6
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
7
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
8
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
9
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
10
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
11
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे शैक्षणिक धोरण हवे

By appasaheb.patil | Updated: January 23, 2020 09:58 IST

अर्थसंकल्प २०२० : सोलापुरातील शिक्षणतज्ज्ञांनी मांडले मत

ठळक मुद्देकेंद्राच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या ६ टक्के तरतूदआरटीई अंतर्गत प्रवेश क्षमता वाढविण्याची गरज निर्माण झाली सर्व शिक्षा अभियानाला चालना देणारे धोरण आखावे त्यासाठी हवी तेवढी तरतूद करावी

सोलापूर : केंद्र सरकार युवकांसाठी नवे शैक्षणिक धोरण आणण्याचे प्रयत्न करीत असले तरी शाळा व उच्च शिक्षण या दोन्हींचा अभ्यासक्रम बदलण्यात यावा़ कोणताही अभ्यासक्रम हा व्यवसायाभिमुख हवा आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या विद्यार्थ्याला उपजीविकेसाठी साधन मिळाले पाहिजे, हे गृहीत धरले तरच शैक्षणिक धोरणाबाबतची वाटचाल यशस्वी होऊ शकेल़ आजवर भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. परंतु परदेशातून भारतात विद्यार्थी शिकण्यासाठी यावेत, यासाठी केंद्राने विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना आणाव्यात, तशाप्रकारच्या सेवासुविधा, इन्स्फ्राट्रक्चर, पुरेसे आधुनिक तंत्रज्ञान, नव्या आयटी कंपन्यांची निर्मिती करावी असे मत सोलापुरातील शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जीडीपीच्या तुलनेत शिक्षणाला अर्थसंकल्पात कमी प्रमाणात निधीची तरतूद केली जाते, ती वाढवावी़ प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील टेक्नॉलॉजीसाठी सरकारकडून प्रयत्न व्हावेत़ शाळांना इंटीग्रेटर सिस्टीम उपलब्ध करून देण्यासाठी मदत द्यावी़ ग्रामीण भागातील शाळांना प्रगत करण्यासाठी नवनवीन योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा़ आरटीई हा उपक्रम चांगला आहे. मात्र त्याचा निधी वेळेवर मिळत नाही, तो वेळेत मिळाल्यास आणखी त्या उपक्रमाला बळ मिळेल़ यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणाला चांगलं प्राधान्य मिळेल, अशी आशा आहे़ - अमोल जोशीसचिव - आयएमएस स्कूल

केंद्राच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या ६ टक्के तरतूद असते, पण आतापर्यंत २ टक्क्यांच्या पुढे तरतूद गेलीच नाही़ मात्र विद्यमान सरकारने विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंटवर भर दिला आहे़ केंद्र शासनाचा अभियांत्रिकी शिक्षणासाठी सपोर्ट आहेच़ परंतु पारंपरिक कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या पदवी शिक्षणात तीन वर्षांच्या कालावधीत एखाद्या वर्षी नावीन्यपूर्ण कोर्सचा समावेश करावा़ जेणेकरून या तिन्ही शाखेतून पदवी घेतलेला विद्यार्थीही स्वत:च्या कौशल्यावर व्यवसाय करू शकेल़ अर्थसंकल्पात शिक्षणावर जास्तीचा भर द्यावा़ - डॉ़ बी़ पी़ रोंगेप्राचार्य, श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर

आरटीई अंतर्गत प्रवेश क्षमता वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ बहुजन गटातील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असताना आरटीईद्वारे मिळणारे आरक्षण हे तुंटपुजे आहे़ त्याची क्षमता दुप्पट करण्यासाठीचे धोरण अमलात आणावे़ तसेच या आरटीई उपक्रमाची अंमलबजावणी खासगी संस्थांमधून करणे गरजेचे आहे़ या नव्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून असे जर धोरण राबविले जर शिक्षणातील मागासलेपणा कमी होण्यास मदत होईल़ सर्व शिक्षा अभियानाला चालना देणारे धोरण आखावे त्यासाठी हवी तेवढी तरतूद करावी़- सिद्धाराम काळेशिक्षक, दक्षिण सोलापूर

आजपर्यंतच्या अर्थसंकल्पात शिक्षणाला म्हणावी तशी तरतूद करण्यात आलेली नाही़ दरम्यान, सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आता हळूहळू शाळांना निधी येऊ लागला आहे़ पूर्वी उच्च शिक्षण देणाºया महाविद्यालयांना यूजीसीमार्फत निधी मिळत होता, आता तो राष्ट्रीय उच्चस्तर अभियान (रूसा) अंतर्गत निधी मिळत आहे़ या निधीमुळे शहरी भागातील महाविद्यालयांना फायदा होत आहे, ग्रामीण भागातील महाविद्यालयांना याचा फायदा होत नाही़ तरी केंद्र सरकारने विचार करून ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नवी पावलं उचलायला हवीत़- उमाकांत चनशेट्टी, प्राचार्य, ग्लोबल व्हिलेज स्कूल, बोरामणी

टॅग्स :Solapurसोलापूरbudget 2020बजेट २०१९SchoolशाळाEducationशिक्षण