शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

इतिहासाचे पुनर्लेखन करताना सम्यक दृष्टिकोन आवश्यक, आ़ ह़ साळुंखे यांचे मत, सोलापूरात समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 12:49 PM

प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़ 

ठळक मुद्देवालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रातील समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रगौतम बुद्धांपासून अमर्त्य सेनापर्यंत अनेक उदाहरणे देत डॉ़ साळुंखे यांनी सामाजिक शास्त्रासमोर उभ्या असलेल्या शेतकरी आत्महत्या, आर्थिक विषमता, स्त्रीभू्रणहत्या, जातीय व धार्मिक असहिष्णुता आदी ज्वलंत विषयांचा ऊहापोह केला़ स्वत:च्या धडावर स्वत:चे डोके असण्याचे भान समाजशास्त्रांच्या तर्क निष्ठ अभ्यासातून प्राप्त होते़ : डॉ़ चंद्रकांत चव्हाण

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : प्रस्थापितांच्या इतिहास लेखनाला प्रत्युत्तर म्हणून पुनर्लेखन करताना तटस्थता आवश्यक आहे़ इतिहास संशोधकांनी भावनिकता, अभिनिवेष, पूर्वग्रहदूषितपणा टाळून समतोल मांडणी करावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्राच्यविद्यासंशोधक डॉ़ आ़ ह़ साळुंखे यांनी केले़ वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्रातील समकालीन समस्या आणि आव्हाने विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात बीजभाषण करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले़ याप्रसंगी विश्वस्त भूषण शहा, प्ऱ प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण, समन्वयक डॉ़ धनराज पाटील, डॉ़ सिद्राम सलवदे यांची प्रमुख उपस्थिती होती़आपल्या अभ्यासपूर्ण बीजभाषणात तथागत गौतम बुद्धांपासून अमर्त्य सेनापर्यंत अनेक उदाहरणे देत डॉ़ साळुंखे यांनी सामाजिक शास्त्रासमोर उभ्या असलेल्या शेतकरी आत्महत्या, आर्थिक विषमता, स्त्रीभू्रणहत्या, जातीय व धार्मिक असहिष्णुता आदी ज्वलंत विषयांचा ऊहापोह केला़ समाजाला दिशा देण्याचे काम प्राध्यापकांचे असल्याचेही ते म्हणाले़ प्राचार्य डॉ़ चंद्रकांत चव्हाण म्हणाले, स्वत:च्या धडावर स्वत:चे डोके असण्याचे भान समाजशास्त्रांच्या तर्क निष्ठ अभ्यासातून प्राप्त होते़ मनुष्य हा समाजशील प्राणी असून मानवी विकासात समाजशास्त्राचे योगदान महत्त्वाचे आहे़ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ़ धनराज पाटील यांनी केले तर अतिथींचा परिचय डॉ़ अशोक गायकवाड यांनी करून दिला़ सूत्रसंचालन प्रा़ मनोहर जोशी यांनी केले तर आभार डॉ़ संगमेश्वर नीला यांनी मानले़ यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Solapurसोलापूर