शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Video - इतिहासाची सत्यता तपासून पाहण्याची गरज - आनंद पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:45 IST

आपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल, असे प्रतिपादन तुलनाकार तथा गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे निवृत्त विभागप्रमुख प्रा.डॉ. आनंद पाटील यांनी केले.

ठळक मुद्देआपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल - प्रा.डॉ. आनंद पाटील शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केवळ देशी इतिहासकारांनीच नाही तर विदेशी साहित्यिकांनीही केला आहे.

सोलापूर : आपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल, असे प्रतिपादन तुलनाकार तथा गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे निवृत्त विभागप्रमुख प्रा.डॉ. आनंद पाटील यांनी केले.

प्रकाशनापूर्वीच चर्चेत आलेल्या ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या आपल्या पुस्तकासंदर्भात येथील साहित्यक्षेत्रातील मंडळींशी खासगी भेटीसाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यातील अनेक संदर्भ इतिहासात अद्यापही उल्लेखलेले नाहीत. शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केवळ देशी इतिहासकारांनीच नाही तर विदेशी साहित्यिकांनीही केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचा उल्लेख सिंह असा केला आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी एक दीर्घकाव्यच त्यांच्यावर लिहिलेले आहे. 

शिवाजी महाराजांचा छत्रपती असा उल्लेख केला जातो; मात्र छत्रपती हा शब्द धर्माने संकुचित केला आहे. प्रत्यक्षात छत्रपती या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो लक्षात घेतला तर ते केवळ छत्रपती नसून सम्राट आहेत, हे मान्य करावे लागेल. कसलाही राजकीय वारसा नसतानाही एक सर्वसामान्य शेतकऱ्या चा मुलगा स्वकर्तृत्वावर राजा होतो, ही घटना अत्यंत मोठी आहे. त्यामुळे सम्राट असा ज्या राजांचा उल्लेख होतो, त्यांच्या पंगतीमध्ये शिवाजी महाराजांना स्थान असावे. मोर्चे काढण्यापलीकडे आणि घोषणा देण्यापलीकडे जाण्यासाठी आपले पुस्तक महत्त्वाचे असल्याचा दावा त्यांनी केला. मराठीतील इतिहास हे अज्ञानाचे उत्पादन असल्याची टीका त्यांनी केली. आपल्या पुस्तकातील सर्व नोंदी आणि विधाने आकसाने नसून पुराव्यावरून आहे, असाही दावा त्यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूरhistoryइतिहास