शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Video - इतिहासाची सत्यता तपासून पाहण्याची गरज - आनंद पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 15:45 IST

आपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल, असे प्रतिपादन तुलनाकार तथा गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे निवृत्त विभागप्रमुख प्रा.डॉ. आनंद पाटील यांनी केले.

ठळक मुद्देआपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल - प्रा.डॉ. आनंद पाटील शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केवळ देशी इतिहासकारांनीच नाही तर विदेशी साहित्यिकांनीही केला आहे.

सोलापूर : आपला इतिहास किती खरा आणि किती खोटा हे तपासून पाहण्याची गरज आहे. विश्वाच्या इतिहासाशी हा इतिहास जोडला तर नवा इतिहास निर्माण होईल, असे प्रतिपादन तुलनाकार तथा गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे निवृत्त विभागप्रमुख प्रा.डॉ. आनंद पाटील यांनी केले.

प्रकाशनापूर्वीच चर्चेत आलेल्या ‘महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या आपल्या पुस्तकासंदर्भात येथील साहित्यक्षेत्रातील मंडळींशी खासगी भेटीसाठी आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यातील अनेक संदर्भ इतिहासात अद्यापही उल्लेखलेले नाहीत. शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केवळ देशी इतिहासकारांनीच नाही तर विदेशी साहित्यिकांनीही केला आहे. स्वामी विवेकानंद यांनी त्यांचा उल्लेख सिंह असा केला आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी एक दीर्घकाव्यच त्यांच्यावर लिहिलेले आहे. 

शिवाजी महाराजांचा छत्रपती असा उल्लेख केला जातो; मात्र छत्रपती हा शब्द धर्माने संकुचित केला आहे. प्रत्यक्षात छत्रपती या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तो लक्षात घेतला तर ते केवळ छत्रपती नसून सम्राट आहेत, हे मान्य करावे लागेल. कसलाही राजकीय वारसा नसतानाही एक सर्वसामान्य शेतकऱ्या चा मुलगा स्वकर्तृत्वावर राजा होतो, ही घटना अत्यंत मोठी आहे. त्यामुळे सम्राट असा ज्या राजांचा उल्लेख होतो, त्यांच्या पंगतीमध्ये शिवाजी महाराजांना स्थान असावे. मोर्चे काढण्यापलीकडे आणि घोषणा देण्यापलीकडे जाण्यासाठी आपले पुस्तक महत्त्वाचे असल्याचा दावा त्यांनी केला. मराठीतील इतिहास हे अज्ञानाचे उत्पादन असल्याची टीका त्यांनी केली. आपल्या पुस्तकातील सर्व नोंदी आणि विधाने आकसाने नसून पुराव्यावरून आहे, असाही दावा त्यांनी केला.

टॅग्स :Solapurसोलापूरhistoryइतिहास