शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

मेरी अम्मा मर गई... तो तीन दिवसांपासून रडतोय, पण त्या मतिमंद मुलाचं कोणीच ऐकलं नाही...!?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:46 IST

वेळेवर जेवण न मिळाल्याचाही परिणाम; दोन दिवस घरातच होता मृतदेह...

ठळक मुद्देसोलापूर शहरातील लॉकडाऊनचा फटकामागील आठ दिवसांपासून शहरातील तापमान वाढलेधक्कादायक घटनेने सोलापूर हळहळले

शितलकुमार कांबळेसोलापूर : शास्त्री नगर येथे राहणाºया वृद्ध दाम्पत्यांचा घरातच मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी काळजी घेण्यासाठी जाता न आल्याने त्यातच वाढलेल्या उन्हामुळे वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचे दोन दिवसांनी कळाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

हसीना शिलेदार ( वय ६०) व त्यांचे पती अब्दुलगनी शिलेदार (वय ६५) अशी मृत दाम्पत्यांची नावे आहेत. त्यांना एक मुलगाही असून तो बुद्धीबधीर (मतीमंद) आहे. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्यांची काळजी हे त्यांचे नातेवाईकच घेत होते. रोज त्यांना डबा देणे, त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणे, आंघोळ घालणे ही कामे त्यांचे नातेवाईकच करत होते. लष्कर परिसरात लॉकडाऊन असल्यामुळे डबा द्यायला जाणे व त्यांची काळजी घेणे अवघड झाले होते. अब्दुलगनी शिलेदार हे महापालिकेतून सेवानिवृत्त झाले होते.

मंगळवारी पाच मे रोजी वृद्ध दाम्पत्यांना त्यांचे नातेवाईक अशपाक शिलेदार यांनी आंघोळ घालून जेवण दिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना वृद्ध दाम्पत्याच्या घरी जाता आले नाही. गुरुवारी सात मे रोजी ते घरी गेले असता दोघेही वृद्ध दाम्पत्य मृत झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून हसिना शिलेदार या आजारीच होत्या. लॉकडाऊनमुळे तीन दिवस दुर्लक्ष झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती अब्दुलगनी शिलेदार यांना हा धक्का सहन न झाल्याने तेही मृत झाले. दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाल्याची शक्यता त्यांच्या नातेवाईक व शेजाºयांनी वर्तवली.---------------------------तो म्हणत होता अम्मी मर गई पण कुणीच ऐकले नाहीशिलेदार दाम्पत्यांचा मुलगा हा मनोरुग्ण आहे. आपली आई मृत झाल्याचे त्याला कळाले होते. तो इतरांना अम्मी मर गई असे सांगत होता. पण, तो मनोरुग्ण असल्याने त्याच्या सांगण्याकडे कुणी लक्ष दिले नाही. गुरुवारी अशपाक शिलेदार व त्यांचे इतर नातेवाईक घरी गेल्यानंतर दोघे दाम्पत्य मृत झाल्याचे दिसून आले. शासकिय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.-----------------------------–------लॉकडाऊनमुळे जेवन द्यायला जाण्यात अडचणी आल्या होत्या. आम्हाला तिथे जाता येणे शक्य नव्हते.  तीन दिवस आम्हाला त्यांना जेवण देता आले नाही. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मावशीची तब्बेतही बरी नव्हती. तर काकांना त्यांचा मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. ही बाब आम्हाला दोन दिवसानंतर समजली.- अशपाक शिलेदार, मृत दाम्पत्यांचे नातेवाईक

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस