शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
3
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
4
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
5
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
6
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
7
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
8
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
9
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
10
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
11
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
12
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
13
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
14
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
15
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
16
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
17
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
18
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
19
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
20
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?

मेरी अम्मा मर गई... तो तीन दिवसांपासून रडतोय, पण त्या मतिमंद मुलाचं कोणीच ऐकलं नाही...!?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:46 IST

वेळेवर जेवण न मिळाल्याचाही परिणाम; दोन दिवस घरातच होता मृतदेह...

ठळक मुद्देसोलापूर शहरातील लॉकडाऊनचा फटकामागील आठ दिवसांपासून शहरातील तापमान वाढलेधक्कादायक घटनेने सोलापूर हळहळले

शितलकुमार कांबळेसोलापूर : शास्त्री नगर येथे राहणाºया वृद्ध दाम्पत्यांचा घरातच मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे त्यांच्या घरी काळजी घेण्यासाठी जाता न आल्याने त्यातच वाढलेल्या उन्हामुळे वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्याचे दोन दिवसांनी कळाले असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

हसीना शिलेदार ( वय ६०) व त्यांचे पती अब्दुलगनी शिलेदार (वय ६५) अशी मृत दाम्पत्यांची नावे आहेत. त्यांना एक मुलगाही असून तो बुद्धीबधीर (मतीमंद) आहे. त्यामुळे या वृद्ध दाम्पत्यांची काळजी हे त्यांचे नातेवाईकच घेत होते. रोज त्यांना डबा देणे, त्यांच्या तब्बेतीची काळजी घेणे, आंघोळ घालणे ही कामे त्यांचे नातेवाईकच करत होते. लष्कर परिसरात लॉकडाऊन असल्यामुळे डबा द्यायला जाणे व त्यांची काळजी घेणे अवघड झाले होते. अब्दुलगनी शिलेदार हे महापालिकेतून सेवानिवृत्त झाले होते.

मंगळवारी पाच मे रोजी वृद्ध दाम्पत्यांना त्यांचे नातेवाईक अशपाक शिलेदार यांनी आंघोळ घालून जेवण दिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना वृद्ध दाम्पत्याच्या घरी जाता आले नाही. गुरुवारी सात मे रोजी ते घरी गेले असता दोघेही वृद्ध दाम्पत्य मृत झाल्याचे दिसून आले. मागील काही दिवसांपासून हसिना शिलेदार या आजारीच होत्या. लॉकडाऊनमुळे तीन दिवस दुर्लक्ष झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे पती अब्दुलगनी शिलेदार यांना हा धक्का सहन न झाल्याने तेही मृत झाले. दोघांचाही मृत्यू एकाच दिवशी झाल्याची शक्यता त्यांच्या नातेवाईक व शेजाºयांनी वर्तवली.---------------------------तो म्हणत होता अम्मी मर गई पण कुणीच ऐकले नाहीशिलेदार दाम्पत्यांचा मुलगा हा मनोरुग्ण आहे. आपली आई मृत झाल्याचे त्याला कळाले होते. तो इतरांना अम्मी मर गई असे सांगत होता. पण, तो मनोरुग्ण असल्याने त्याच्या सांगण्याकडे कुणी लक्ष दिले नाही. गुरुवारी अशपाक शिलेदार व त्यांचे इतर नातेवाईक घरी गेल्यानंतर दोघे दाम्पत्य मृत झाल्याचे दिसून आले. शासकिय रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.-----------------------------–------लॉकडाऊनमुळे जेवन द्यायला जाण्यात अडचणी आल्या होत्या. आम्हाला तिथे जाता येणे शक्य नव्हते.  तीन दिवस आम्हाला त्यांना जेवण देता आले नाही. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. मावशीची तब्बेतही बरी नव्हती. तर काकांना त्यांचा मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. ही बाब आम्हाला दोन दिवसानंतर समजली.- अशपाक शिलेदार, मृत दाम्पत्यांचे नातेवाईक

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस