शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

बाप रे...सोलापूरकरही गुदमरताहेत दिल्लीच्या प्रदूषणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:55 IST

कामानिमित्त दिल्लीत राहणाºयांशी साधला संवाद : मास्कचा करताहेत वापर

ठळक मुद्देदिल्लीत प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडलीनागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाकामानिमित्त अनेक सोलापूरकर हे दिल्लीमध्ये स्थायिक झाले

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : दिल्लीतप्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली आहे. नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे. या दिल्ली तसेच त्या परिसरात होणाºया प्रदूषणात मूळचे सोलापूरकरही गुदमरत आहेत. कामानिमित्त अनेक सोलापूरकर हे दिल्लीमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणाविषयी ‘लोकमत’शी संवाद साधला.

दिवाळीत दिल्लीत फटाके फोडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तिथे वाहनांकरिता अरविंद केजरीवाल सरकारने सम-विषम योजना सोमवारपासून लागू केली आहे. 

दरवर्षी दिल्लीतलं प्रदूषण वाढतं. मात्र प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काहीच पावलं उचलत नाही, असं म्हणत न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली होती. 

पंजाब, हरयाणात शेतकरी तण जाळतात. त्यामुळे दिल्लीत प्रचंड प्रदूषण होतं. लाखो लोकांचं   आयुष्य धोक्यात आणणाºयांवर काय कारवाई केली जाते, असा    प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं  राज्य सरकारांना विचारला  होता.

बांधकाम करण्यावर बंदीअतिधोकादायक प्रदूषणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये (एनसीआर) कोणतीही बांधकामे करण्यावर बंदी घातली आहे. न्यायालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहील. तरीही बांधकामे सुरू ठेवणाºयांना १ लाख व कचरा जाळणाºयंना पाच हजारांचा दंड आकारण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

सोलापूर आणि दिल्लीच्या वातावरणात खूप फरक आहे. तशी धूळ आपल्याकडेही आहे. मात्र, दिल्लीतील सध्याचे वातावरण खूप खराब झाले आहे. म्हणून कामाशिवाय मी घराबाहेर पडत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे जवळ ठेवली आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी पाचदरम्यानचे वातावरण हे सारखेच वाटते.- अजय राजगुरू, नोएडा

दिल्लीत मी जिथे राहतो त्याच्या तुलनेत सोलापुरात झाडांचे प्रमाण जास्त वाटते. येथील प्रदूषणामुळे डोळ्यांतून पाणी येते. प्रदूषणाचे काही परिणाम लगेच जाणवत असून, काही परिणाम हे दीर्घकालीन असू शकतात. बाहेर पडताना मास्क वापरण्याशिवाय पर्याय नाही. येथील मेडिकल दुकानात ५० रुपयांपासून मास्क मिळतो.- बालाजी सग्गम, गुरुग्राम

टॅग्स :Solapurसोलापूरpollutionप्रदूषणdelhiदिल्ली