शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाप रे...सोलापूरकरही गुदमरताहेत दिल्लीच्या प्रदूषणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:55 IST

कामानिमित्त दिल्लीत राहणाºयांशी साधला संवाद : मास्कचा करताहेत वापर

ठळक मुद्देदिल्लीत प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडलीनागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाकामानिमित्त अनेक सोलापूरकर हे दिल्लीमध्ये स्थायिक झाले

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : दिल्लीतप्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली आहे. नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पातळीमध्ये गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी नोंदवण्यात आली आहे. या दिल्ली तसेच त्या परिसरात होणाºया प्रदूषणात मूळचे सोलापूरकरही गुदमरत आहेत. कामानिमित्त अनेक सोलापूरकर हे दिल्लीमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांनी दिल्लीतील प्रदूषणाविषयी ‘लोकमत’शी संवाद साधला.

दिवाळीत दिल्लीत फटाके फोडण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यामधून बाहेर पडणारा धूर वायू प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी तिथे वाहनांकरिता अरविंद केजरीवाल सरकारने सम-विषम योजना सोमवारपासून लागू केली आहे. 

दरवर्षी दिल्लीतलं प्रदूषण वाढतं. मात्र प्रदूषण कमी करण्यासाठी आपण काहीच पावलं उचलत नाही, असं म्हणत न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली होती. 

पंजाब, हरयाणात शेतकरी तण जाळतात. त्यामुळे दिल्लीत प्रचंड प्रदूषण होतं. लाखो लोकांचं   आयुष्य धोक्यात आणणाºयांवर काय कारवाई केली जाते, असा    प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं  राज्य सरकारांना विचारला  होता.

बांधकाम करण्यावर बंदीअतिधोकादायक प्रदूषणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये (एनसीआर) कोणतीही बांधकामे करण्यावर बंदी घातली आहे. न्यायालयाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत ही बंदी कायम राहील. तरीही बांधकामे सुरू ठेवणाºयांना १ लाख व कचरा जाळणाºयंना पाच हजारांचा दंड आकारण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

सोलापूर आणि दिल्लीच्या वातावरणात खूप फरक आहे. तशी धूळ आपल्याकडेही आहे. मात्र, दिल्लीतील सध्याचे वातावरण खूप खराब झाले आहे. म्हणून कामाशिवाय मी घराबाहेर पडत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे जवळ ठेवली आहेत. दुपारी १२ ते सायंकाळी पाचदरम्यानचे वातावरण हे सारखेच वाटते.- अजय राजगुरू, नोएडा

दिल्लीत मी जिथे राहतो त्याच्या तुलनेत सोलापुरात झाडांचे प्रमाण जास्त वाटते. येथील प्रदूषणामुळे डोळ्यांतून पाणी येते. प्रदूषणाचे काही परिणाम लगेच जाणवत असून, काही परिणाम हे दीर्घकालीन असू शकतात. बाहेर पडताना मास्क वापरण्याशिवाय पर्याय नाही. येथील मेडिकल दुकानात ५० रुपयांपासून मास्क मिळतो.- बालाजी सग्गम, गुरुग्राम

टॅग्स :Solapurसोलापूरpollutionप्रदूषणdelhiदिल्ली