शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आधुनिक नवदुर्गा ; संकटावर स्वार झालेल्या कोंडाबाईने केले सहा जणांना डॉक्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 10:47 IST

महेश कोटीवालेवडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर असून, पतीच्या निधनानंतर, प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबातील नऊ ...

महेश कोटीवालेवडवळ : ‘बाबांनो कष्ट हाच आपला देव आहे, काम करायला कधी लाजू नका, आपल्या हिमतीवर शिक्षण घ्या, मनगटात एवढी ताकद निर्माण करा की, यश तुमच्या पदरात येऊन पडेल’ ही वाक्ये कुण्या प्रथितयश व्यक्तीचे वा पुस्तकातील वाटतील पण असे नाही. स्वत: निरक्षर असून, पतीच्या निधनानंतर, प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबातील नऊ मुलांचा सांभाळ यशस्वीपणे तर केलाच पण सहा नातवंडे आज उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाली आहेत. या सगळ्यांचीच प्रेरणास्थान राहिलेल्या जिद्दी कोंडाबाई (अक्का) नागनाथ बाबर या नवदुर्गेची कहाणी अंगावर शहारे आणणारीच आहे.

२५ डिसेंबर १९९२ रोजी वडवळ (ता. मोहोळ) येथे राहणाºया कोंडाबाई यांचे पती नागनाथ यांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. पदरात ६ मुले व ३ मुली... मात्र या संकटांना कोंडाबाई घाबरल्या नाहीत. उलट धाडसी पतीप्रमाणेच आपल्या कमरेला पदर खोचून त्या ताठ मानेने उभ्या राहिल्या. त्यांना मोहन, दिलीप, विष्णुपंत, पोपट, राजाराम व दयानंद ही ६ मुले तर सिंधू, सुनीता व मीनाक्षी या ३ मुली. या सर्वांना आपल्या वडिलांची उणीव न जाणवू देता, ही माऊलीच त्यांचे सर्वस्व झाली.

सर्व मुलांनी देखील आईची शिकवण अंगीकृत करून जिद्दीने प्रारंभ केला. आज मोहन हे भारतीय सैन्यात अधिकारी तर त्यांची मुले डॉ. शक्तीजित, डॉ. शांती, डॉ. सत्यजित हे वैद्यकीय क्षेत्रात आहेत. दिलीप यांची मुलगी डॉ. मोहिनी पुणे येथे स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तर विष्णुपंत यांची मुलगी डॉ. अंजली ही शिकत आहे. मुलगी सुनीता हिची मुलगी डॉ. कांचन सातपुते ही देखील वैद्यकीय शिक्षण घेत आहे 

बाबर कुटुंबातील या जडणघडणीमध्ये जयश्री, विजया, संगीता, कविता, सुप्रिया, कल्पना या सहा सुना व सिंधू, सुनीता, मीनाक्षी या तीन मुली जणू नवरात्रीची नऊ रूपे झाली आहेत. कोंडाबाई यांची आज देखील हीच शिकवण आहे. कष्ट करणाºयाच्या मागे सदैव देव असतो, त्यामुळे कोणत्याही कामाला लाजू नका, शिक्षण घेतले की ते नक्की यशस्वी करतेच.

कष्ट करा... लाजू नका!च्कष्ट हेचं आपलं दैवत मानून कोंडाबाईनं निरक्षर असूनही पुढच्या पिढीमध्ये शिक्षणाचा वसा वाढवला. आयुष्यभर संघर्ष करत जागलेल्या सावित्रीबार्इंचा आदर्श मानत त्यांनी जीवनाशी दोन हात केले. कोणतेही काम करताना त्यांनी कमी न मानता कष्टाला न लाजता केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे हा स्तुतीपाठ आपल्या मुलांपुढे ठेवला. उच्च विद्याविभूषित मुलांनीही माऊलीच्या या कष्टाचे चिज केलं. वडिलांच्या अकाली निधनानंतरही आईने वाढवलं  याचा सर्वांनीच ठेवलीय. मुलं शिकली मोठी झाली. नातवंडानीही नाव काढलं. आयुष्यात केलेल्या या संघर्षाचं काही वाटत नाही. मन तृप्त झाल्याची भावना कोंडाबाई व्यक्त करतात.

टॅग्स :SolapurसोलापूरNavratriनवरात्रीdocterडॉक्टर