नियामक मंडळाच्या बैठकीला आमदारांची दांडी
By Admin | Updated: July 11, 2014 01:40 IST2014-07-11T01:40:18+5:302014-07-11T01:40:18+5:30
दोन आमदार हजर : उद्दिष्ट १४,४४३ घरांचे, झाली अवघी ३४१ घरे

नियामक मंडळाच्या बैठकीला आमदारांची दांडी
सोलापूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या नियामक मंडळाच्या बैठकीस आमदार आणि खासदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित असताना आ़ गणपतराव देशमुख आणि आ़ बबनराव शिंदे हे दोन आमदार वगळता उर्वरित लोकप्रतिनिधींनी बैठकीला दांडी मारली़ केंद्राने देखील या योजनेकडे हात आखडता घेतल्यामुळे दारिद्र्यरेषेखालील अनेक कुटुंबांच्या घरांचे स्वप्न धुळीस मिळत आहे़
जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी नियामक मंडळाची तिमाही बैठक पार पडली़ यामध्ये गरिबांच्या घरांसाठी केंद्राच्या असणाऱ्या इंदिरा आवास आणि राजीव निवारा या योजनांबद्दल चर्चा झाली़ सन २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील बीपीएल कुटुंबांसाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे नियोजन केले होते, मात्र केंद्राने हे उद्दिष्ट कमी केले़ त्यामुळे उद्दिष्ट १४४३ वर आले़ या घरांसाठी केंद्राकडून ५२ हजार ५०० तर राज्याकडून ३७ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाते़ या १४४३ पैकी ३४१ घरकुले पूर्ण झाली असून, उर्वरित ११४२ घरकुले अपूर्ण असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली़
-------------------------
आ़ बबनराव शिंदेंचा ठिय्या
माढा तालुक्यातील रखडलेल्या विविध कामांबद्दल आ़ बबनराव शिंदे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या मांडला होता़ रस्ते, तीर्थक्षेत्र योजनेतील कामे तातडीने सुरू करा, असे आदेश त्यांनी बांधकाम विभागातील संजय माळी यांना दिले़ आम्ही वारंवार पाठपुरावा करतो, काही कारणास्तव कामे सुरू होत नाहीत़ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि माढा तालुक्यातील आम्ही दिलेल्या प्रस्तावानुसार कामे सुरू करावीत, असे त्यांनी सांगितले़ यावेळी जि़प़ अध्यक्षा डॉ़ निशिगंधा माळी, समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, शिक्षणाधिकारी राजेंद्र बाबर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते़
सन २०१३-१४ या वर्षासाठी १४ हजार ४४३ घरे बांधण्याचे उद्दिष्ट होते़ त्याप्रमाणे प्रशासकीय मान्यता दिली मात्र केंद्राने हे उद्दिष्ट १४४३ वर आणले़ त्यामुळे दारिद्र्यरेषेखाली अनेक लोकांना घरे मिळणे अवघड झाले आहे़ याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़
- डॉ़ निशिगंधा माळी
जि़ प़ अध्यक्षा