शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:08 IST

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ नियोजनबद्ध असे नयना हे नवीन शहर वसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती ...

ठळक मुद्देमहाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने - रणजित पाटील निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल - रणजित पाटील

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ नियोजनबद्ध असे नयना हे नवीन शहर वसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ़ प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर आदी उपस्थित होते. 

डॉ. रणजित पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईतील गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय मुंबई बाहेर न्यावे लागेल. चंदीगड, नवी मुंबई प्रमाणे नयना नावाचे नवीन शहर देखील वसविण्यात येत आहे. त्याचे काम सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूरचा विकास करताना स्थानिक नागरिकांचा विचार केला जात नाही. पंढरपूर शहरात सुमारे ८१ कोटी रुपये खर्चून ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. पण ती वापराअभावी धूळखात पडून आहेत. सध्या घाटाचे काम देखील चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. भाविकांच्या सामान ठेवण्याची सोय व्हावी, यासाठी बांधण्यात आलेल्या लॉकर रुमही अयोग्य ठिकाणी बांधल्यामुळे त्याचा वापर होत नाही. विकासकामे होत असताना योग्य नियोजन नसल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे, असे अनेक प्रश्न पत्रकारांनी डॉ. पाटील त्यांना विचारले असता त्यांनी शांतपणे ऐकून घेऊन म्हणाले, पंढरपूरच्या इतिहासात कधी नव्हे इतका निधी या चार वर्षांच्या काळात शासनाने पंढरपूरसाठी खास बाब म्हणून दिलेला आहे. पूर्वी केवळ घोषणा होत होत्या; मात्र आता प्रत्यक्ष कामे होत आहेत. ही सर्व कामे होत असताना काही त्रुटी असतील तर त्याची दखल घेऊन निश्चित सुधारणा केल्या जातील. निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नगरविकास राज्यमंत्री अनभिज्ञ कॅनडा सरकारकडून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी कमी व्याजदराने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात गेल्या आषाढी यात्रेच्या वेळी सुतोवाच केले होते. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. दरम्यान, कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज यांनी देखील यासंदर्भात पंढरपूरचा दौरा केला़ पण पुढे काहीच झालेले नाही, याविषयी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर डॉ. पाटील यांनी यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगून अनभिज्ञता व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरMantralayaमंत्रालयMumbaiमुंबई