शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 19:08 IST

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ नियोजनबद्ध असे नयना हे नवीन शहर वसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती ...

ठळक मुद्देमहाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने - रणजित पाटील निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल - रणजित पाटील

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ नियोजनबद्ध असे नयना हे नवीन शहर वसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली. 

पंढरपूर येथील नगरपरिषदेच्या वतीने आयोजित विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी पंढरपुरात आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आ़ प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर आदी उपस्थित होते. 

डॉ. रणजित पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईतील गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय मुंबई बाहेर न्यावे लागेल. चंदीगड, नवी मुंबई प्रमाणे नयना नावाचे नवीन शहर देखील वसविण्यात येत आहे. त्याचे काम सुरु झाल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूरचा विकास करताना स्थानिक नागरिकांचा विचार केला जात नाही. पंढरपूर शहरात सुमारे ८१ कोटी रुपये खर्चून ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. पण ती वापराअभावी धूळखात पडून आहेत. सध्या घाटाचे काम देखील चुकीच्या पद्धतीने सुरु आहे. भाविकांच्या सामान ठेवण्याची सोय व्हावी, यासाठी बांधण्यात आलेल्या लॉकर रुमही अयोग्य ठिकाणी बांधल्यामुळे त्याचा वापर होत नाही. विकासकामे होत असताना योग्य नियोजन नसल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे, असे अनेक प्रश्न पत्रकारांनी डॉ. पाटील त्यांना विचारले असता त्यांनी शांतपणे ऐकून घेऊन म्हणाले, पंढरपूरच्या इतिहासात कधी नव्हे इतका निधी या चार वर्षांच्या काळात शासनाने पंढरपूरसाठी खास बाब म्हणून दिलेला आहे. पूर्वी केवळ घोषणा होत होत्या; मात्र आता प्रत्यक्ष कामे होत आहेत. ही सर्व कामे होत असताना काही त्रुटी असतील तर त्याची दखल घेऊन निश्चित सुधारणा केल्या जातील. निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नगरविकास राज्यमंत्री अनभिज्ञ कॅनडा सरकारकडून तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या विकासासाठी कमी व्याजदराने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात गेल्या आषाढी यात्रेच्या वेळी सुतोवाच केले होते. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. दरम्यान, कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज यांनी देखील यासंदर्भात पंढरपूरचा दौरा केला़ पण पुढे काहीच झालेले नाही, याविषयी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांना प्रश्न विचारल्यानंतर डॉ. पाटील यांनी यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगून अनभिज्ञता व्यक्त केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरMantralayaमंत्रालयMumbaiमुंबई