शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेसाठी घराघरांमध्ये आंब्याचा मान; पण फळांचा राजा खातोय भलताच भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 10:53 IST

अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसाचा मान असल्याने आंबा खरेदीसाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी.

ठळक मुद्देरविवार व सोमवारी आंबा महोत्सवात ३४ लाख रुपयांची आंबा विक्रीशहरात अन्य मंडयांमध्ये आंबा खरेदीसाठी गर्दी होती;पण दर अधिक असल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी दिसून आले.

सोलापूर: अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसाचा मान असल्याने आंबा खरेदीसाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी केल्याचे आंबा महोत्सवात पाहावयाला मिळाले. गर्दीच्या प्रमाणात स्टॉलची संख्या कमी असल्याने आंबा खरेदीदारांची अडचण झाल्याचे दिसून आले. रविवार व सोमवारी आंबा महोत्सवात ३४ लाख रुपयांची आंबा विक्री झाल्याचे सांगण्यात आले. शहरात अन्य मंडयांमध्ये आंबा खरेदीसाठी गर्दी होती;पण दर अधिक असल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी दिसून आले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षयतृतीयेचा मान आहे. अक्षयतृतीया मंगळवारी असल्याने सोमवारी आंबा खरेदीसाठी सोलापूरकर आंबा महोत्सव, सातरस्ता, बाजार समिती व अन्य ठिकाणच्या बाजारात दिसून आले. महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. कोकणातील शेतकºयांचा आंबा येथे मिळत असल्याने खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र या ठिकाणी अपुरी जागा, गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सोय नसल्याने अनेकांनी आंबा खरेदीसाठी आत न जाता बाहेरुनच जाणे पसंद केले. अतिशय कमी जागेत अवघ्या २० स्टॉलची सोय करण्यात आली आहे. स्टॉल कमी अन् शेतकºयांची नोंदणी अधिक असे चित्र आंबा महोत्सवात झाले आहे. 

२७ शेतकºयांनी आंबा महोत्सवासाठी नोंदणी केली असून, स्थानिक शेतकºयांना नोंदणी न केल्याने विक्रीसाठी दरवर्षीप्रमाणे संधी मिळाली नाही. सोमवारी सायंकाळी २० स्टॉलपैकी पाच स्टॉल आंबा संपल्याने रिकामे होते. नोंदणी केलेले शेतकरी आंबा विक्रीसाठी सोलापुरात येण्यासाठी इच्छुक असले तरी लावलेल्या स्टॉलवरील आंबा कधी संपतो?, याचा अंदाज येत नसल्याने कोकणातील शेतकरी कोकणातच अडकले आहेत. महोत्सवातील स्टॉलवर एक डझन आंब्याचा दर ५०० रुपये व त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. सातरस्ता व अन्य ठिकाणी ८० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत एक डझन आंब्याची विक्री झाली. 

आंबा कमी पडणार नाही-नाईक- स्टॉल उभारणीसाठी जागा मिळाली नाही. अपुºया जागेत स्टॉलची उभारणी करावी लागली. सोलापूरकरांना आंबा कमी पडणार नाही. कोकणातून पुण्याकडे जाणारा आंबा सोलापुरला मागविला आहे. ज्या शेतकºयांचा आंबा संपला आहे अशा ठिकाणी नोंदणी केलेले कोकणातील शेतकरी मंगळवारी आंबा घेऊन येत असल्याचे कृषी पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक दिलीप नाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाMangoआंबाMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती