शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा; पालकमंत्र्यांचे आदेश

By appasaheb.patil | Published: October 16, 2022 7:05 PM

नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये; ​​​​​​​पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना

पंढरपूर  :- जिल्हयात अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त एकही शेतकरी, नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील  यांनी दिल्या.

श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखानाच्या ३२ व्या गळीत हंगाम शुभारंभ  व आसवनी प्रकल्प उद्घाटन शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री विखे- पाटील बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, संत दामाजी सह.साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, पांडूरंग सह.साखर कारखान्याचे संचालक उमेश परिचारक, धैर्यशिल मोहिते पाटील, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, प्रांताधिकारी ज्योती कदम,  उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे, तहसिलदार जगदीश निंबाळकर यांच्यासह  पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री विखे-पाटील बोलताना म्हणाले,  जिल्हयात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतपिकांसह शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाने योग्यती खबरदारी घेवून या नुकसानीचे पंचनामे करण्याला प्राधान्य द्यावे  सर्व नुकसानीचे  तातडीने पंचनामे पुर्ण करुन तसा अहवाल शासनाला तात्काळ सादर करावा. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच शेती महामंडळाच्या कामगारांचे पुनवर्सन करण्याबाबत तात्काळ बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

केंद्र शासनाने साखर धोरणाची निश्चिती केल्याने सहकार क्षेत्र टिकले आहे. साखर कारखान्याला इथेनॉलचे धोरण वाचविणार असून, साखर कारखान्यांनी इथेनॉन निर्मिती बरोबरच इतर उप-पदार्थ निर्मिती करावी. श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखान्यानी वीज निर्मिर्तीख्‍ इथेनॉल निर्मिती तसेच पोटॅश निर्मिती बरोबरच योग्य व्यवस्थापन केल्याने राज्यासमोर नवा आदर्श निर्माण केल्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांनी सांगितले. तत्पुर्वी पालकमंत्री विखे-पाटील यांनी जिल्हयात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली.

उजनी धरणातील हक्काचे पाणी सोलापूर जिल्ह्याला मिळावे अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. तर  सोलापूर जिल्ह्यातील  पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मोठ्याप्रमाणात रिक्त असल्याने ती तात्काळ भरावित तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत जादाचा मोबदला मिळावा अशी मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली.

श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखाना साखर उद्योगावरच अवलंबून न राहता वीज निर्मिती, इथेनॉल निर्मिती, पोटॅश निर्मिती  व उत्तम व्यवस्थापन केल्याने शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उसाला दर देता आला. श्री.पांडूरंग सहकारी साखर कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय