शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

महाविकास आघाडी सरकार मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष उभा करतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:34 IST

चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका; शेतकरी, कामगारप्रश्नी अधिवेशनात धारेवर धरणार

सोलापूर : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सरकार असमर्थ ठरत आहे. अशावेळी ओबीसी विरुद्ध मराठा असा नवीन संघर्ष निर्माण करून संतांनी बांधलेली वीण विसकटण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसींचे मोर्चे उभे करायचे, त्याचे नेतृत्वही हेच लोक करणार. मराठा आरक्षणाचे नेतृत्वही हेच करणार, असे मुद्दामहून सरकारकडून केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केेला.

राज्यात वेगवेगळ्या कंपन्यांनी पीकविमा स्वीकारायला नकार दिला. विमा कंपनी व सरकारने अतिवृष्टीने झालेली नुकसानभरपाई दिली नाही. याबाबत सरकार काहीही न बोलता रोज नवे विषय काढून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवित आहे.

समाजाची दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद उपस्थित केला जात आहे. शेतकरी, कामगारांच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा वाद उपस्थित केला आहे. लॉकडाऊनमध्ये बेरोजगार झालेल्या एकाही असंघटित कामगाराला सरकारने मदत केली नाही. ते कसे जगत आहेत, याचा विचार सरकारने केला नाही. उलट केंद्राकडून इंजेक्शन, पीपीपी किट, टेस्टिंग किट घेण्यात आली. सर्वच जर केंद्र सरकार करणार असेल तर राज्य सरकार काय करते, असा सवाल त्यांनी केला. कोरोनामुळे आंदोलनाला मर्यादा होत्या. आता शेतकऱ्यांसहित विविध प्रश्नांवरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल पाटील यांनी मत व्यक्त केले. राज ठाकरे हे परप्रांतीयांबाबतची भूमिका जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुकीत एकत्र येऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आदी उपस्थित होते.

मुंडे प्रकरणी क्लीन चिट कशी मिळाली

या सरकारकडून एखादा विषय जमिनीत कसा गाडायचा हे शिकायला हवे. धनंजय मुंडे प्रकरणात त्यांना क्लीन चिट देऊन हे कसे मोकळे झाले. त्या महिलेशी संबंध असल्याचे त्यांनी कबूल केले. मुलांना आपले नाव दिल्याचेही सांगितले. मात्र, अफेडेव्हिटमध्ये दोन मुलं दाखवली गेली नाही. हे नैतिकतेमध्ये बसते का. याचे उत्तर सरकारने द्यावे. अधिवेशन काळात या सर्व विषयावर आवाज उठविणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस