शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Vidhan Sabha 2019: भाषा बघून घेण्याची, वेळ उमेदवार शोधण्याची

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 05:04 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना बघून घेण्याचा इशारा दिला.

- राकेश कदमसोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना बघून घेण्याचा इशारा दिला. पण आता निवडणुकीच्या काळात त्यांच्या पक्षाला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. लोकसभा निवडणुकीपासून पक्षाचे एक-एक सरदार हा किल्ला सोडून चालले आहेत. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला खिंडार पाडून आपल्या तोफा या किल्ल्याच्या दिशेने वळविल्या.परवा शरद पवार यांच्या मंचावर दाटीवाटीने बसलेले निम्मे लोक मोहिते-पाटील यांना भेटून आलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटलांच्या माळशिरस मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगली मते मिळाली आहेत. पण विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्याची वेळ आहे. मोहोळ या राखीव मतदारसंघातील माजी आमदार राजन पाटील, बळीराम साठे हे नेते तग धरुन आहेत. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून दोन उमेदवार इच्छुक आहेत. मोहोळ आणि शहरातील नेत्यांनी शरद पवारांसमोर शक्तीप्रदर्शन केले. मोहोळमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. पण इतर मतदारसंघात आनंदी आनंद आहे.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे भाजपच्या वाटेवर आहेत. शिंदे बंधूची मतदारसंघावर चांगली पकड आहे. माढ्यात शिंदे यांच्या विरोधात भाजप-सेनेकडून रणनिती आखली जात आहे. पण त्यात राष्ट्रवादीचे शिलेदार दूरदूरवर दिसत नाहीत. पवारांच्या सांगण्यावरुन काही कायकर्ते शिंदे बंधूंविरोधात निवडणूक लढवतील. आज पवारांशी वाद झाला तरी पुढे सहा महिन्यांनी शिंदे आणि पवारांचे सूत जुळू शकते, असा अनेक कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. सांगोल्यात मुळातच पक्षाची ताकद क्षीण आहे. त्यात पुन्हा या तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इथेही राष्ट्रवादीला नवा उमेदवार मिळणे अवघड आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस दोन कुटुंबांनी वाढवली. पण ती नंतर वेठीसही धरली. आता पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात राग निर्माण झाला आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्याला संधी द्या म्हणून काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांसमोर घोषणाबाजी केली. दीपक साळुंखे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवी कार्यकारिणी अद्याप जाहीर झालेली नाही. शरद पवार पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना बघून घेतो म्हणत असले तरी जुने सरदार नव्या शिलेदाराला बघून घेत आहेत.>बार्शी आणि करमाळ्यात काय?बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत गेल्यानंतर वैरागचे निरंजन भूमकर आणि मकरंद निंबाळकर शरद पवारांना भेटून आले. मोहोळच्या बाळेराजे पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर डरकाळी फोडली. यापैकी भूमकर यांची उमेदवारी राष्ट्रवादीला सोपलांचे उट्टे काढण्यास पूरक ठरु शकते. पण राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार शर्यत जिंकण्याचे अंतर पार करु शकतील का? याबद्दल तालुक्यातील नेत्यांना शंका आहे. करमाळ््याच्या रश्मी बागल शिवसेनेपासून अनेक लोक पवारांना भेटून आले आहेत. त्यात निवडून येऊ शकेल, असा उमेदवार अद्याप तरी पक्षाला सापडलेला नाही. पंढरपूर, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट या भागातील पक्षाची ताकद गेल्या १० वर्षांपासून क्षीण होत आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस