शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Sikandar Shaikh: 'कुस्ती स्पर्धेत हरलो असलो तरी, मी जनतेच्या मनातला 'महाराष्ट्र केसरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 23:43 IST

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मिश्कील प्रतिक्रिया दिली

सोलापूर - पुणे येथे यावर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पै. सिकंदर शेख आणि पै. महेंद्र गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत झाली. या मॅचमध्ये गुणांवरुन वाद सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी पै. सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाला असल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी अन्याय झाला नसल्याचे म्हटले आहे, सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर सिंकदर शेख ट्रेंड करत होता. सिंकदरनेच हा डाव जिंकल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मात्र, पंचाच्या निर्णयामुळे तो महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून बाहेर पडला. आज, पुन्हा एकदा सिंकदरला पत्रकारांनी यासंदर्भात प्रश्न केला. त्यावर, मी जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी असल्याचं सिकंदरने म्हटले.  

महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील निकालावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही मिश्कील प्रतिक्रिया दिली. "महाराष्ट्र केसरी स्पर्धेत टांग कुणी कुणाला मारली यावरुन सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. त्यामध्ये कधी कुणी अंगाला माती न लावलेले, कधीही न शड्डू ठाकलेले आघाडीवर होते. माझ मत आहे जे यात खेळ खेळतात, त्यांनीच यात बोलावे. आमच्या सारख्यांनी यात तोंडाची वाफ वाया घालवू नये, असे अजित पवारांनी म्हटले. दरम्यान, हा वाद आता शांत झाला असतानाच, मी जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी असल्याचं सिकंदरने म्हटलं आहे.  

महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेत मी हरलो असलो तरी, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे. स्पर्धेत हरलो असलो तरी जनतेच्या मनातला महाराष्ट्र केसरी मी आहे, असे पै. सिकंदर शेख याने म्हटले आहे. पंढरपूर येथील भीमा केसरी कुस्ती मैदानात मल्ल बनून सिकंदर शेख फडात उतरला होता. खूप दिवसांनी आपल्याच तालुक्यात खेळतोय, याचा मला अधिक आनंद आहे, असेही सिकंदर शेखने माध्यमांशी बोलताना म्हटले.  

कुस्तीबद्दल पै. सिकंदरचे काय होते म्हणणे

सिकंदर शेखने म्हटले, "जिथे टांग लागली तिथे परफेक्ट टांग लागली नव्हती, पण त्याची (महेंद्र गायकवाड) ॲक्शन होती म्हणून त्याला 2 गुण द्यायला पाहिजे होते. तसेच माझी पूर्णपणे पकड होती म्हणून मला 1 गुण द्यायला हवा होता. अशी 4-3 ने कुस्ती चालायला हवी होती. तिथे 2 गुण द्यायला हवे होते तिथे 4 गुण देण्यात आले. वरून पूर्णपणे खाली पडल्यावर 4 गुण दिले जातात पण तसे झाले नाही. माझ्या प्रशिक्षकांना दाद मागितली पण त्यांना तिथून हाकलून दिले. मी पूर्णपणे तयारी केली होती त्यामुळे मी महाराष्ट्र केसरी झालो असतो. पण तसे झाले नाही हे सर्व थांबले पाहिजे."

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्तीSolapurसोलापूरPandharpurपंढरपूर