शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

‘लोकमत’ बांधावर; ज्वारीची धाटं झाली भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:13 IST

मोहोळ तालुक्यातील स्थिती; ज्वारीबरोबर कडब्याचे उत्पादनही घटणार

ठळक मुद्देमोहोळ तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरूशासनाकडून दिला जाणारा मोबदला मिळवून देण्यासाठी महसूलची यंत्रणा काम करीत आहे

अशोक कांबळेमोहोळ : दोन महिन्यांपूर्वी १५ एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली़ एकरी ५ हजार रुपयांप्रमाणे या क्षेत्रासाठी सुमारे ७५ हजार रुपये खर्च आला़ सध्या अडीच ते तीन फुटांपेक्षा जास्त उंची ज्वारीची थाटे आली आहेत़ यंदा पाऊस कमी असतानाही ज्वारीचे उत्पन्न वाढणार आणि जनावरांना कडबाही उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती; मात्र परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले, अशी व्यथा देवडी येथील महिला शेतकरी लता दिनकर थोरात यांनी व्यक्त केली.

त्यांच्याशी प्रत्यक्ष शिवारात जाऊन संवाद साधला असता त्या म्हणाल्या, गेल्या तीन वर्षांपासून सलग पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईला सामोरे जावे लागले होते़ यंदा पाऊस पडेल, अशी खात्री होती़ त्यामुळे शेतीची मशागत करून तब्बल १५ एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली़ यासाठी खर्चही केला; मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आणि सुमारे अडीच ते तीन फूट उंच आलेली ज्वारीची धाटे भुईसपाट झाली़ डोळ्यादेखत या पिकाचे नुकसान होत असलेले पाहावत नाही़ पण करणार काय? आता जनावरांच्या चाºयाचे काय करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच मोहोळ तालुक्यातील खरीप,रब्बी पिकांसह द्राक्ष व डाळिंब बागांचे सुमारे  ७५०० हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे़ हाताशी आलेले पीक पाण्यात गेल्याने अनेक शेतकरी बांधावर बसून त्या पिकाकडे पाहून गहिवरताना दिसून आले.

तालुक्यात २६०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती तर १६०७  हेक्टर क्षेत्रावर मका तर २०१३  हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी झाली होती.

परतीच्या पावसाने मोहोळ मंडलसह नरखेड, पेनूर, टाकळी, कुरूल, सावळेश्वर,कामती या सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले़ आता या सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे काम मोहोळ महसूल विभागाच्या वतीने सुरू आहेत़ मोहोळ तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत २ हजार ३५० शेतकºयांच्या १९५६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे केले आहेत़ पंचनाम्याचे काम आणखीनही सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांनी सांगितले.

मोहोळ तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू आहे़ शासनाकडून दिला जाणारा मोबदला मिळवून देण्यासाठी महसूलची यंत्रणा काम करीत आहे़                                      

- जीवन बनसोडे, तहसीलदार 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस