शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

‘लोकमत’ बांधावर; ज्वारीची धाटं झाली भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:13 IST

मोहोळ तालुक्यातील स्थिती; ज्वारीबरोबर कडब्याचे उत्पादनही घटणार

ठळक मुद्देमोहोळ तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरूशासनाकडून दिला जाणारा मोबदला मिळवून देण्यासाठी महसूलची यंत्रणा काम करीत आहे

अशोक कांबळेमोहोळ : दोन महिन्यांपूर्वी १५ एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली़ एकरी ५ हजार रुपयांप्रमाणे या क्षेत्रासाठी सुमारे ७५ हजार रुपये खर्च आला़ सध्या अडीच ते तीन फुटांपेक्षा जास्त उंची ज्वारीची थाटे आली आहेत़ यंदा पाऊस कमी असतानाही ज्वारीचे उत्पन्न वाढणार आणि जनावरांना कडबाही उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती; मात्र परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले, अशी व्यथा देवडी येथील महिला शेतकरी लता दिनकर थोरात यांनी व्यक्त केली.

त्यांच्याशी प्रत्यक्ष शिवारात जाऊन संवाद साधला असता त्या म्हणाल्या, गेल्या तीन वर्षांपासून सलग पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह चारा टंचाईला सामोरे जावे लागले होते़ यंदा पाऊस पडेल, अशी खात्री होती़ त्यामुळे शेतीची मशागत करून तब्बल १५ एकर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी केली़ यासाठी खर्चही केला; मात्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आणि सुमारे अडीच ते तीन फूट उंच आलेली ज्वारीची धाटे भुईसपाट झाली़ डोळ्यादेखत या पिकाचे नुकसान होत असलेले पाहावत नाही़ पण करणार काय? आता जनावरांच्या चाºयाचे काय करायचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच मोहोळ तालुक्यातील खरीप,रब्बी पिकांसह द्राक्ष व डाळिंब बागांचे सुमारे  ७५०० हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे़ हाताशी आलेले पीक पाण्यात गेल्याने अनेक शेतकरी बांधावर बसून त्या पिकाकडे पाहून गहिवरताना दिसून आले.

तालुक्यात २६०० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली होती तर १६०७  हेक्टर क्षेत्रावर मका तर २०१३  हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी झाली होती.

परतीच्या पावसाने मोहोळ मंडलसह नरखेड, पेनूर, टाकळी, कुरूल, सावळेश्वर,कामती या सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात पावसामुळे पिकांचे नुकसान झाले़ आता या सर्व पिकांचे पंचनामे करण्याचे काम मोहोळ महसूल विभागाच्या वतीने सुरू आहेत़ मोहोळ तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून आजपर्यंत २ हजार ३५० शेतकºयांच्या १९५६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे केले आहेत़ पंचनाम्याचे काम आणखीनही सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे यांनी सांगितले.

मोहोळ तालुक्यातील ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे काम सुरू आहे़ शासनाकडून दिला जाणारा मोबदला मिळवून देण्यासाठी महसूलची यंत्रणा काम करीत आहे़                                      

- जीवन बनसोडे, तहसीलदार 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस