शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

lokmat Agrostav ; सोलापुरी डाळिंब, ऊस, द्राक्षाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा कृषी महोत्सव पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 18:56 IST

पंढरपूर : आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या सोलापुरी डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ ...

ठळक मुद्दे‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ या कृषी महोत्सवाचे आयोजन केलेयेत्या १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाºया महोत्सवात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीविषयक योजनांची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चाही होणार

पंढरपूर : आंतरराष्ट्रीय ख्याती लाभलेल्या सोलापुरी डाळिंब आणि द्राक्ष उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘लोकमत’ने पंढरपूर येथे ‘अ‍ॅग्रोत्सव २०१९’ या कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. येत्या १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाºया महोत्सवात कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि कृषीविषयक योजनांची माहिती अत्याधुनिक तंत्रज्ञान यावर चर्चाही होणार आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाºया पंढरपूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात हा अ‍ॅग्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या जिल्ह्यात डाळिंब, ऊस आणि द्राक्षे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. एकेकाळी ज्वारीचे कोठार समजला जाणारा हा जिल्हा आता कात टाकतो आहे. शेतकºयांचा ओढा नगदी पिकाकडे असून शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्यावर त्यांचा भर आहे. मात्र त्यांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविण्याची गरज आहे. ‘लोकमत’ने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कृषी क्षेत्रात काम करणाºया संस्था-कंपन्या यांचा या अ‍ॅग्रोत्सवात सक्रिय सहभाग असणार आहे.

यात शासकीय योजनांची माहिती, नवे प्रकल्प, नवनवीन संशोधन यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे़ कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ आणि आत्मा या कृषी क्षेत्रातील संस्था सहभागी होत आहेत़ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचेही सहकार्य लाभणार आहे.  चार दिवसांत कृषी प्रदर्शन, नवीन कृषी तंत्रज्ञान, दुग्धोत्पादन, कृषी प्रक्रिया उद्योग, कृषीपूरक उद्योग, उत्पादित कृषी मालाला बाजारपेठ, सेंद्रिय शेती यावर तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.

राज्यातील मान्यवरांचे मार्गदर्शन- राज्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, केळी, सीताफळ, चिकू, बोर या फळबागांना जोपासणे हे मोठे संकट आहे. शेतकºयांसाठी हे आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी कमी पाण्यात शेती, उपलब्ध पाण्याचा वापर, सूक्ष्म सिंचन, चारा निर्मिती यावर कृषी क्षेत्रातील मान्यवरांशी सल्लामसलत, चर्चा करण्याची संधी शेतकºयांना उपलब्ध होणार आहे.

पीक उत्पादन स्पर्धा आणि पुरस्कार- सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी ऊस, फळबाग उत्पादनात आघाडीवर आहेत. त्यांच्या कृषी उत्पादनांचे प्रदर्शन, दर्जेदार आणि विक्रमी पीक उत्पादन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकºयांना विक्रमी पीक उत्पादनाबाबत पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात येणार आहे. तरी पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांनी जास्तीत जास्त संख्येने या पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे.

महाराष्टÑातल्या शेतकºयांसाठी लोकमतने सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. पश्चिम महाराष्टÑातील शेतकºयांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्षे अन् ऊस यांच्यासह इतर पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही शेतकºयांना मिळणार आहे.  याचा लाभ शेतकºयांनी घ्यावा.- प्रशांत परिचारकआमदार

सोलापूर जिल्हा फळबागांच्या उत्पादनात अग्रेसर आहे. पाणीटंचाईवर मात करून शेतकरी डाळिंब, द्राक्षे पिके घेतात. सध्याच्या दुष्काळी स्थितीत त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ऊस उत्पादनात येथील शेतकरी आघाडीवर आहेत. कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास ते कृषी क्षेत्रात क्रांती करतील इतकी त्यांच्यात क्षमता आहे. लोकमत आणि शासनाचा कृषी विभाग यांनी आयोजित केलेले प्रदर्शन महत्त्वाचे आहे.-  बसवराज बिराजदारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

कोल्हापूर, बार्शी व अन्य ठिकाणी शेतकºयांना कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी पैसे खर्च करून जावे लागते. मात्र पंढरपूरमध्ये लोकमतने कृषी प्रदर्शन भरवले आहे. या प्रदर्शनाचा सर्व क्षेत्रातील शेतकºयांना लाभ घेता येणार आहे. तसेच शेतकºयांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी याचे मार्गदर्शन लाभणार आहे. यामुळे लोकमतचे आभार.- वसंतराव देशमुखउपाध्यक्ष, पांडुरंग कारखाना, श्रीपूर

दुष्काळातून शेतकºयांना बाहेर काढण्यासाठी लोकमतच्या अ‍ॅग्रोत्सवातून कृषी तज्ज्ञांचे अनमोल मार्गदर्शन मिळणार आहे. डाळिंबाचे दर घसरले आहेत, निर्यात घटली आहे, त्यात वाढ करण्याविषयी या अ‍ॅग्रोत्सवाला अधिक महत्त्व आहे. थेट शासनापर्यंत डाळिंब उत्पादकांच्या व्यथा मांडण्यासाठी लोकमतचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.- प्रभाकर चांदणे, अध्यक्ष अ. भा. डाळिंब उत्पादक शेतकरी संघ

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटagricultureशेती