शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

दहा वर्षांपुर्वीचे साहित्य झालं नष्ट; पूर आल्यास सांगलीचं पथकच देवदूत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:26 AM

भीमा - सीना नदीच्या काठी मानवी वसाहती वाढल्या आहेत. मनुष्य आणि जनावरे महापुरात वाहून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, ...

भीमा - सीना नदीच्या काठी मानवी वसाहती वाढल्या आहेत. मनुष्य आणि जनावरे महापुरात वाहून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यातून कोणताच बोध घेतला नाही. १० वर्षांपूर्वी शोध आणि बचाव साहित्य खरेदी केले होते. हे साहित्य जीर्ण होऊन नष्ट झाले, आता पूर परस्थिती उद्भवली की, सांगलीच्या पथकाला पाचारण करुन त्यांची मदत घेतली जाते. मात्र, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्था सक्षम करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

राज्यभर अतिवृष्टीने धुमाकूळ घातला. दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. संततधार सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी पसरत आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे भरून ओसंडत वाहात आहेत. उजनी धरणातील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील भीमा, सीना, भोगावती, हरणा, बोरी नद्यांना कोणत्याही स्थितीत महापूर येण्याची शक्यता आहे. साहित्याविना पूरस्थितीवर मात करण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची अवस्था दयनीय झाली आहे.

गेल्या दहा वर्षात चार वेळा भीमा आणि सीना नद्यांना महापूर आल्याने नदीकाठच्या जनतेची अवस्था बिकट झाली आहे. मागील वर्षी सीना नदीने पात्र बदलले, तर भीमेच्या पुरात मोठे नुकसान झाले. लवंगी येथे तीन शाळकरी बालकांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. बचावाचे कोणतेही साहित्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे नाही. याची प्रचिती त्याचवेळी आली होती. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शोध आणि बचाव साहित्यासाठी जिल्हा प्रशासनाने दोन कोटींची मागणी केल्याचे सांगण्यात आले होते. अद्यापपर्यंत मागणीची दखल घेण्यात आली नाही.

-------

मागणी केलेले शोध, बचाव साहित्य

रबर / रेस्क्यू बोटी (१३), सर्च लाईट (२६), लाईफबॉय (६५), सेफ्टी हेल्मेट (६५), मेगाफोन (२६), फ्लोटिंग पंप (५), ब्रीदिंग अप्रायटस (१३) या साहित्याच्या खरेदीसाठी दोन कोटींची मागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने मागणीची दखलच घेतली नाही.

................

एप्रिल महिन्यांत राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे साहित्य खरेदीसाठी २ कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. त्याचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे. अद्याप तरतूद करण्यात आली नाही.

-चंद्रकांत हेडगिरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

------

लवंगी येथील दुर्घटनेनंतर प्रशासनाने बोध घ्यायला हवा होता. महापूर सांगून येत नाही. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मदतकार्य कसे करणार, याबाबत शासन गंभीर नाही. चार महिन्यांपूर्वी मी स्वतः सचिवांशी बोललो. पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालायला हवे. साहित्य खरेदीसाठी निधीची तातडीने तरतूद करायला हवी.

सुभाष देशमुख, आमदार