शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

स्मार्टफोनसोबत आपणही स्मार्ट व्हावं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 13:16 IST

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आहे.

विसावं शतक सुरू झालंय. टष्ट्वेंटी टष्ट्वेंटीची धूम मनात नवीन आशा, उमेद घेऊन नववर्षाचे स्वागत केले. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते आहे. आपला भारत देशही आज प्रगतीचे अनेक टप्पे पार पाडत यशाची शिखरे पादांक्रांत करतो आहे. डिजिटल इंडिया यामध्ये आपली मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. अशाच प्रगतीमध्ये स्मार्टफोनने आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्मार्टफोनला महत्त्वाचे स्थान निर्माण झाले आहे. खरं तर आदानप्रदान, संवाद साधण्याचे एक प्रभावी माध्यम मानले जाते. पण वाजवीपेक्षा जास्त वापर व दुरुपयोगच होऊन आजची पिढी बिघडतेय व स्त्रियांची मानहानी होतेय, सामाजिक बांधिलकी नाहीशी होते आहे. खूप छान वाटणाºया स्मार्टफोनमुळे वैवाहिक जीवनात सौख्य नाही, घटस्फोटाचे प्रमाणही वाढले आहे.

सद्यस्थितीला सखीसहेलींना तर हा फोन म्हणजे कटकट वाटते आहे. सांगावे की नको, फोन तर लागतोच, मग नेट नको, पण रेटच असे आहेत की जे आताच्या कंपन्या नेट पॅकसहितच देतात. आपोआप आपण मग सोशल मीडियाकडे वळतो. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सामाजिक, निसर्ग असे एक ना अनेक ग्रुप होतात. सुरुवातीला छान माहिती,उपयुक्त मार्गदर्शन मिळत जाते. आपणही गुंतत जातो. मग सुंदर डीपी ठेवले जातात, फोटो शेअर केले जातात.

आपल्या सर्वांचे हेतू छान असताना आपले कौतुक केले जाते. कोणीतरी मैत्री वाढवून तू छान दिसतेस. तू मला फार आवडते, मी फोन करू का? तू वयाने लहानच दिसते. खरंच मी मनापासून बोलत आहे. रागाला नको जाऊस. असे संवाद पोस्ट येतात. नंतर फोन कॉल.. येथे तर तू खूप गोड बोलतेस. आवाज मस्तच आहे. तू बोलत रहावं व मी ऐकत रहावं तासंतास असं वाटतं. रोनो, पिल्लू, सोनू.. अशी गोंडस नावं देऊन घोळवत ठेवून जवळीक वाढवतात. भेटवस्तू पाठवतात. अचानक एक दिवस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, आपण भेटूयात असा आग्रह होतो. शेवटी आपण आपली शिकार होतो..

सखींनो असे अनेक अनुभव असतात. तुम्ही यातून जात असता, असे संवाद इतरांनाही सांगू शकत नाही. भांडण करून, दम देऊन, ब्लॉक करून नाही चालणार. कारण या व्यक्ती स्वत:स सेफ (सुरक्षित) ठेवत असतात. स्वत:च्या घरापर्यंत जाणवू देत नाहीत. मैत्री म्हणून घरी बोलवत नाहीत. आपण एक उच्च व्यक्तिमत्त्व बनून टेंभा मिरवत इतरांना असे त्रास देत, उलट वर स्त्री स्वातंत्र्याच्या चर्चा, लेखनही करतील. नाहक त्रास स्त्रीस होतो. तिची अहवेलना केली जाते. ‘ती’ तशीच अशी एक मानसिकता तयार केली जाते.तर मैत्रिणींनो जरा लक्ष द्या, असे त्रासदायक मेसेज आले तर पहिल्यांदा गोडीगुलाबीने सांगा, समजवा, नाही समजले तर नावासहित त्या मेसेजचे स्क्रीन शाॉट काढून व्हायरल करा.

समाजात जाणीव झाली की, सजगता वाढेल व आळा बसेल. भीतीमुक्त निर्णय घ्यायचा व आपण आत्मविश्वासाने चालत या घाणेरड्या विचार प्रवृत्तीला थोपवणे गरजेचे आहे. आपण हे ठामपणे सांगणे गरजेचे आहे. आपणच स्मार्टफोन नीट शिकून घेतला पाहिजे. नवनवीन अ‍ॅपची माहिती घ्यावी. घरबसल्या हातातील मोबाईलचा व्यवसायात वापर केला जातो, हे समजून घेतले पाहिजे. तसेच निर्भया, महिला सक्षमीकरण, सुरक्षा यांचीही माहिती, फोन नंबर सेव्ह करून ठेवावे. जेव्हा आपण स्मार्ट बनू तेव्हा पुढचा कुमकवत बनतो. विनाविषय संवाद टाळा. तुमची माहिती देऊ नका. माणसाला माणूस समजणं कठीण आहे. दक्षता हाच उपाय आहे- विद्या भोसले(लेखिका पर्यावरण व सामाजिक कार्यकर्त्या आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीMobileमोबाइल