शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

किमान ‘बोला’ तरी राव...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:22 IST

परवाच एकाचा फोन आला होता, काय गोड गोड बोलत होता माणूस ! त्याच्या शब्दाशब्दातून साखर टपकत होती. याच्यासारखा सज्जन ...

परवाच एकाचा फोन आला होता, काय गोड गोड बोलत होता माणूस ! त्याच्या शब्दाशब्दातून साखर टपकत होती. याच्यासारखा सज्जन अन् ‘आपला’ माणूस दुसरा कुणी नसावा. असं वाटण्याइतपत त्यांचं बोलणं होतं. त्याच्या जिभेवरची बरीच खडीसाखर माझ्या कानात सांडली अन् आमचं फोनवरचं बोलणं संपलं. समोरच्याशी बोलण्याच्या नादात त्याच्याकडून फोन बंद करायचं राहून गेलं असावं ! जसं बोलणं बंद झालं तसं त्यानं माझी निंदा करायला सुरू केली. ते सगळंच मी फोनवर ऐकत राहिलो. तो समोरच्याला सांगत होता. ‘काय न्हाय हो, आपलं काम होईपर्यंत असंच गोड बोलावं लागतं, एकदा काम झाल्यावर कोण विचारतोय?’  त्याच्या गोड बोलण्याचं गणित मला त्याच्याकडूनच कळालं होतं. अर्थात तसा हा अनुभव माझ्यासाठी काही नवा नाही. कुणी गोड बोलायला लागलं की, नाही म्हणलं तरी धडकी भरायला लागते  मनात. आपलं काम साध्य करून घेण्यासाठी गोड बोलण्याचं अस्त्र बाळगतात अनेक जण या दुनियादारीत ! 

एकदा काम झालं की साधी ओळखही द्यायला तयार नसतात ही माणसं ! प्रत्येकाच्याच वळचणीला दडून बसलेली असतात अशी गिधाडं ! कधी टोच्या मारायला सुरुवात करतील हे नाही सांगता यायचं ! पण दुनियाही यानाच भुलते राव ! रोखठोकपणे खरं बोलणारी माणसं नाहीत चालत या दुनियादारीला. गोड बोलणारी माणसं प्रामाणिक असतीलच असं नाही पण तोंडावर खरं सांगणारी माणसं प्रामाणिक असू शकतात याची कधी ना कधी प्रचिती येत असते. तरीही हरभºयाच्या झाडावर चढवणारी अन् काम झालं की जोरदार आपटणारी माणसं जवळची वाटतात या दुनियादारीत ! अन् मग पुन्हा बसतात गद्दारांच्या नावानं शंख करीत.

स्वार्थाशिवाय हल्ली कुणी कुणाशी काही बोलायलाच तयार नाही राव! नुकताच मकर संक्रांतीचा सण साजरा झाला. ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ अशा शब्दांची समाज माध्यमात गर्दी झाली. खरंच असं तीळगूळ देऊन अन् खाऊन कोणी गोड बोलला असता तर किती बरं झालं असतं नाही! सोशल मीडियावर इतका तीळगूळ सांडला की हातातला स्मार्ट फोनही चिकट झाला पण मनं मात्र परस्परांशी नाही चिकटली. समाज माध्यमांनी दुनिया जवळ आणली पण माणसं मात्र खूप खूप दूर गेलीत. नुसतं काहीतरी निमित्त हवं असतं. शुभेच्छांचा सडाच पडतो ! शुभेच्छा तर हव्याच हो, पण त्यात काही ओलावा ? काही नाही, नुसता कोरडेपणा उरलाय. सोशल मीडियावरून टोपलीभर तीळगूळ पाठविणारा माणूस समोर भेटला तर चिमुटभरही तीळगूळ द्यायला तयार नाही की गोड शब्दात ‘गोड बोला’ असं म्हणायला राजी नाही ! अर्थात ही विसंगतीचेही पडसाद याच माध्यमात उमटले म्हणा ! तीळगूळ खाऊन तरी माणसं खरंच गोड बोलणार का हो? खरं तर, ‘गोड बोला’ असं म्हणण्यापेक्षा ‘खरं बोला’ असं म्हणण्याचेच हे दिवस आहेत.

शिवाजी हळणवर यांनी समाजमाध्यमातून संक्रांतीच्या शुभेच्छा देताना एक संदेशही देऊन टाकलाय.  ‘गोड गोड बोलण्यापेक्षा खरं अन् बरं बोललं पाहिजे’ असं सांगत दुनियादारीला आरसाच दाखवलाय. आमच्या नीलेश झालटे यांनी तर झणझणीत अंजनच घातलंय दुनियेच्या डोळ्यात. ‘गोड-गोड बोलण्यापेक्षा खरं बोला. स्पष्ट बोला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तोंडावर एक अन् मागं एक असं बोलू नका, चांगलं वाईट बोलू या पण तोंडावर बोलू या ! असं आवाहनच त्यांनी केलंय. हल्ली अशीच प्रवृत्ती वाढलीय हो दुनियादारीत. तोंडावर गोड गोड बोलतात अन् मागं खायचं तेवढं शेण खातातच! काही वाटत नाही, अंगवळणीच पडून गेलंय हे सगळं ! 

माणसाचं माणसांशी बोलणं कमी झालंय, गावातल्या पारावरची गर्दी दिसेनाशी होऊ लागलीय. मनाची कवाडं बंद होत चाललीय, संवाद हरवत चाललाय. सोशल मीडियावर गतीनं बोटं हलताहेत पण जिभेवरचे शब्द जागीच गोठून चाललेत, हे मात्र खरे ! सण, उत्सवही आता व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर सुरू झालेत. चार जण एकत्र आले तर दोन मिनिटं बोलतात अन् प्रत्येकजण स्मार्ट फोनशी खेळत बसतात. एका टेबलावर जेवायला बसतात पण तिथंही परस्परात प्रचंड दुरावा निर्माण झालेला दिसतो. शब्द हे मनाशी मनाचं नातं जोडणारा दुवा आहे पण आज शब्दही निशब्द झालेत आजच्या दुनियादारीत ! तरीही संक्रांत आली की जो जो म्हणतो, ‘तीळगूळ घ्या, गोड बोला !’ आमचे महेंद्र गणपुले म्हणतात, ‘जिथं समाजातील संवादच हरवलाय तिथं ‘गोड बोला’ म्हणण्यापेक्षा किमान ‘बोला तरी’ असं म्हणायची वेळ आलीय. खरंच आहे की ! शब्दांना मुके नका करू, त्यांना बोलतं राहू द्या ! गोड बोला, तिखट बोला पण किमान ‘बोला’ तरी राव..!   - अशोक गोडगे-कदम(लेखक हे साहित्यिक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरSocial Mediaसोशल मीडियाMakar Sankrantiमकर संक्रांती