शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 15:09 IST

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला ...

ठळक मुद्देकै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्याची तयारी झाली आहे, अशी चिंता झेडपीचे कृषी व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केली. त्यावर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, काळजी करू नका, लोक ओढ्याचे पाणी वळवू देत नाहीत. उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी रंगभवन सभागृहात आयोजित कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात उजनी धरणाच्या पाण्यावर चिंतन झाले.

झेडपीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे  कै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील, विजयराज डोंगरे, रजनी देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सदस्य भारत शिंदे, मदन दराडे, संजय गायकवाड, रेखा राऊत, विभीषण आवटे, मीनाक्षी जगताप, मंजुळा कोळेकर, पंढरपूरचे सभापती राजेंद्र पाटील, मंगळवेढ्याचे सभापती प्रदीप खांडेकर, दक्षिणच्या सभापती सोनाली कडते, श्रीमंत थोरात, गहिनीनाथ नाईकनवरे, मंगल वाघमोडे, स्वाती कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ, कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली आहे. पण शेतकºयांना पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून नेमके याकडेच सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अध्यक्षीय भाषणात संजय शिंदे यांनी कृषी क्षेत्रात प्रयोगशील काम करणाºयांना पुरस्कार देऊन स्फूर्ती देण्याचे काम झेडपीने केले आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारून शेतकरी शेतीत प्रयोग करीत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे नमूद केले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे मार्गदर्शन झाले. पुरस्कार शेतकºयांचा फेटा, शाल, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

शिंदे—ढोबळे यांच्यात संवादझेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे दोन आठवड्यानंतर सोलापुरात आले. कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बसलेले असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा त्यांना सारखा कॉल येत होता. शेवटी त्यांनी रंगभवन सभागृहात असल्याचे शिंदे यांनी सांगितल्यावर ढोबळे तेथे आले. समोर प्रेक्षकगृहात बसल्यावर शिंदे यांनी त्यांना व्यासपीठावर येण्यास सांगितले. त्यानंतर दोघांत सतत संवाद सुरू होता. हे दोघे नेमके काय बोलत असावेत याचीच चर्चा सभागृहात सुरू झाली.

पुरस्कारप्राप्त शेतकरी असेआदर्श गोपालक : विनायक पाटील, समीर भोरे, किरण सावंत, धनंजय शिंदे, सचिन बाबर, भिवा शिंदे, दत्तात्रय शिंदे, शशिकांत नागटिळक, मल्लिकार्जुन कोले, अर्जुन घाडगे, दत्तात्रय ढेकळे. कृषीनिष्ठ : बसवराज बेळ्ळे, दत्तात्रय पाटील, अभिजित भांगे, रुपाली काळे, शरद शिंदे, अमोल लाड, बाबासाहेब थोरात, बाळासाहेब यलगोंडे, काशिनाथ कदम, विजय गवळी, नितीन पाटील. शासन पुरस्कृत कृषिभूषण: अतुल बागल, शशिकांत पुदे, तुकारात पडवळे, रामचंद्र आलदर, मकरंद सरगर. कृषीमित्र : शंकर मिरगणे, भीमराव सूळ, सिद्धेश्वर नागटिळक, सचिन चव्हाण, शंकर पाथरवट. उत्कृष्ट सरपंच व ग्रामसेवक : नारायण ढवळे (ग्रामसेवक, शेगाव दुमाला), विष्णू अरकले (सरपंच, शेगाव दुमाला), संगनबसप्पा ठक्का (ग्रामविकास अधिकारी, करजगी), प्रिया तोडकरी (सरपंच, करजगी), बालम बादशहा कोरबू (ग्रामसेवक , बोंडले), राखी गायकवाड (सरपंच, बोंडले).

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद