शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘उजनीचं पाणी मराठवाड्याला जातंय’ असं सांगताच नेते म्हणाले, ‘लोक तर साधं ओढ्याचं पाणी वळवू देत नाहीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 15:09 IST

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला ...

ठळक मुद्देकै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद

सोलापूर : उजनी धरण भरलेलं असताना सोलापूरकरांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अशात आता उजनीचे पाणी मराठवाड्याला नेण्याची तयारी झाली आहे, अशी चिंता झेडपीचे कृषी व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी व्यक्त केली. त्यावर झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे म्हणाले, काळजी करू नका, लोक ओढ्याचे पाणी वळवू देत नाहीत. उजनीचे पाणी मराठवाड्याला देताना वरील धरणातून २५ टीएमसी पाणी सोडण्याची तरतूद करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी रंगभवन सभागृहात आयोजित कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात उजनी धरणाच्या पाण्यावर चिंतन झाले.

झेडपीच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे  कै. शंकरराव मोहिते-पाटील आदर्श गोपालक व पशुमित्र, कृषीनिष्ठ आणि कृषीमित्र पुरस्कार वितरण सोहळा झेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, सभापती मल्लिकार्जुन पाटील, विजयराज डोंगरे, रजनी देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सदस्य भारत शिंदे, मदन दराडे, संजय गायकवाड, रेखा राऊत, विभीषण आवटे, मीनाक्षी जगताप, मंजुळा कोळेकर, पंढरपूरचे सभापती राजेंद्र पाटील, मंगळवेढ्याचे सभापती प्रदीप खांडेकर, दक्षिणच्या सभापती सोनाली कडते, श्रीमंत थोरात, गहिनीनाथ नाईकनवरे, मंगल वाघमोडे, स्वाती कांबळे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ, कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढल्याने मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेती ही काळाची गरज बनली आहे. पण शेतकºयांना पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असून नेमके याकडेच सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. अध्यक्षीय भाषणात संजय शिंदे यांनी कृषी क्षेत्रात प्रयोगशील काम करणाºयांना पुरस्कार देऊन स्फूर्ती देण्याचे काम झेडपीने केले आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारून शेतकरी शेतीत प्रयोग करीत आहेत, ही चांगली गोष्ट असल्याचे नमूद केले. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील, अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांचे मार्गदर्शन झाले. पुरस्कार शेतकºयांचा फेटा, शाल, स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

शिंदे—ढोबळे यांच्यात संवादझेडपीचे अध्यक्ष संजय शिंदे दोन आठवड्यानंतर सोलापुरात आले. कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बसलेले असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचा त्यांना सारखा कॉल येत होता. शेवटी त्यांनी रंगभवन सभागृहात असल्याचे शिंदे यांनी सांगितल्यावर ढोबळे तेथे आले. समोर प्रेक्षकगृहात बसल्यावर शिंदे यांनी त्यांना व्यासपीठावर येण्यास सांगितले. त्यानंतर दोघांत सतत संवाद सुरू होता. हे दोघे नेमके काय बोलत असावेत याचीच चर्चा सभागृहात सुरू झाली.

पुरस्कारप्राप्त शेतकरी असेआदर्श गोपालक : विनायक पाटील, समीर भोरे, किरण सावंत, धनंजय शिंदे, सचिन बाबर, भिवा शिंदे, दत्तात्रय शिंदे, शशिकांत नागटिळक, मल्लिकार्जुन कोले, अर्जुन घाडगे, दत्तात्रय ढेकळे. कृषीनिष्ठ : बसवराज बेळ्ळे, दत्तात्रय पाटील, अभिजित भांगे, रुपाली काळे, शरद शिंदे, अमोल लाड, बाबासाहेब थोरात, बाळासाहेब यलगोंडे, काशिनाथ कदम, विजय गवळी, नितीन पाटील. शासन पुरस्कृत कृषिभूषण: अतुल बागल, शशिकांत पुदे, तुकारात पडवळे, रामचंद्र आलदर, मकरंद सरगर. कृषीमित्र : शंकर मिरगणे, भीमराव सूळ, सिद्धेश्वर नागटिळक, सचिन चव्हाण, शंकर पाथरवट. उत्कृष्ट सरपंच व ग्रामसेवक : नारायण ढवळे (ग्रामसेवक, शेगाव दुमाला), विष्णू अरकले (सरपंच, शेगाव दुमाला), संगनबसप्पा ठक्का (ग्रामविकास अधिकारी, करजगी), प्रिया तोडकरी (सरपंच, करजगी), बालम बादशहा कोरबू (ग्रामसेवक , बोंडले), राखी गायकवाड (सरपंच, बोंडले).

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद