शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:10 IST

वजा सहा टक्के पाणीसाठा : नागरिकांसह जनावरांची भटकंती, कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या शेतकºयांना फटका

ठळक मुद्देयंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेलीअत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली

शंभुलिंग अकतनाळ

चपळगाव : यंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेली. परिणामी अत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले गेले. सद्यस्थितीत पाण्याचा उपसा, बाष्पीभवनामुळे धरणात वजा सहा टक्केच पाणी शिल्लक असल्याने आतापासूनच अक्कलकोट तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच विशेष म्हणजे पशू-प्राण्यांना पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे हाल सोसावे लागत आहेत. यामुळेच अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. 

बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपली आहेत. पाणीच नसल्याने उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. बँकेचे कर्ज काढून धरणातून जलवाहिनी नेलेल्या शेतकºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती, पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली.

जे पीक हाती आले त्यास बाजारभाव मिळाला नाही. यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता बहुसंख्य शेतकºयांना लागली आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणाºया चार महत्त्वाच्या जलाशयांपैकी कुरनूर धरण महत्त्वाचे आहे. या धरण क्षेत्रातच नगरपरिषदेने मोठी विहीर खोदली आहे. मात्र धरणातील पाणी आटत चालल्याने विहिरीतील पाणीपातळीत लक्षणीय घट होत चालली आहे. 

काही ठिकाणी दूरवर खड्डे मारून पाणी उपसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परंतु धरणातील पाणी आटत चालल्याने भूजल                     पातळीही कमी झाली आहे.  यामुळे भविष्यात अक्कलकोटवासीयांसह संपूर्ण तालुक्याच्या संकटात मोठी वाढ होणार आहे.

 

पाणीस्रोत आटले- तब्बल ८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या कुरनूर धरणाचा विशेषकरून चपळगाव, बावकरवाडी, हन्नूर, बºहाणपूर, कुरनूर, दहिटणे, मोट्याळ, डोंबरजवळगे, दर्शनाळ, बोरेगाव, चपळगाववाडी यांसह अनेक गावांतील बळीराजांना फायदा झाला आहे. मात्र यंदा धरणातील पाणी आटल्याने भूजल पातळीत कमालीची घट होऊन परिणामी पंचक्रोशीतील विहिरी, कूपनलिका, ओढे, तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्पासह इतर स्रोत कोरडेठाक पडले आहेत.

कुरनूर धरणातील पाणी आटत चालल्याने पिण्याच्या पाण्यासह  जनावरांचे हाल होत आहेत. चारा कोठून आणायचा, हा सुद्धा प्रश्न आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडल्याने आम्ही पशुपालक संकटात आहोेत. प्रशासनाने गटानिहाय चारा छावण्या सुरू कराव्या.         -उमेश पाटील, माजी सरपंच, चपळगाव

यावर्षी धरणात पाणीच नसल्याने हातची पिके गेली. शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे हा भाग संकटात सापडला आहे.-विश्वनाथ भरमशेट्टी, हन्नूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ