शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:10 IST

वजा सहा टक्के पाणीसाठा : नागरिकांसह जनावरांची भटकंती, कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या शेतकºयांना फटका

ठळक मुद्देयंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेलीअत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली

शंभुलिंग अकतनाळ

चपळगाव : यंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेली. परिणामी अत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले गेले. सद्यस्थितीत पाण्याचा उपसा, बाष्पीभवनामुळे धरणात वजा सहा टक्केच पाणी शिल्लक असल्याने आतापासूनच अक्कलकोट तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच विशेष म्हणजे पशू-प्राण्यांना पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे हाल सोसावे लागत आहेत. यामुळेच अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. 

बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपली आहेत. पाणीच नसल्याने उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. बँकेचे कर्ज काढून धरणातून जलवाहिनी नेलेल्या शेतकºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती, पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली.

जे पीक हाती आले त्यास बाजारभाव मिळाला नाही. यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता बहुसंख्य शेतकºयांना लागली आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणाºया चार महत्त्वाच्या जलाशयांपैकी कुरनूर धरण महत्त्वाचे आहे. या धरण क्षेत्रातच नगरपरिषदेने मोठी विहीर खोदली आहे. मात्र धरणातील पाणी आटत चालल्याने विहिरीतील पाणीपातळीत लक्षणीय घट होत चालली आहे. 

काही ठिकाणी दूरवर खड्डे मारून पाणी उपसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परंतु धरणातील पाणी आटत चालल्याने भूजल                     पातळीही कमी झाली आहे.  यामुळे भविष्यात अक्कलकोटवासीयांसह संपूर्ण तालुक्याच्या संकटात मोठी वाढ होणार आहे.

 

पाणीस्रोत आटले- तब्बल ८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या कुरनूर धरणाचा विशेषकरून चपळगाव, बावकरवाडी, हन्नूर, बºहाणपूर, कुरनूर, दहिटणे, मोट्याळ, डोंबरजवळगे, दर्शनाळ, बोरेगाव, चपळगाववाडी यांसह अनेक गावांतील बळीराजांना फायदा झाला आहे. मात्र यंदा धरणातील पाणी आटल्याने भूजल पातळीत कमालीची घट होऊन परिणामी पंचक्रोशीतील विहिरी, कूपनलिका, ओढे, तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्पासह इतर स्रोत कोरडेठाक पडले आहेत.

कुरनूर धरणातील पाणी आटत चालल्याने पिण्याच्या पाण्यासह  जनावरांचे हाल होत आहेत. चारा कोठून आणायचा, हा सुद्धा प्रश्न आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडल्याने आम्ही पशुपालक संकटात आहोेत. प्रशासनाने गटानिहाय चारा छावण्या सुरू कराव्या.         -उमेश पाटील, माजी सरपंच, चपळगाव

यावर्षी धरणात पाणीच नसल्याने हातची पिके गेली. शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे हा भाग संकटात सापडला आहे.-विश्वनाथ भरमशेट्टी, हन्नूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ