शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:10 IST

वजा सहा टक्के पाणीसाठा : नागरिकांसह जनावरांची भटकंती, कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या शेतकºयांना फटका

ठळक मुद्देयंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेलीअत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली

शंभुलिंग अकतनाळ

चपळगाव : यंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेली. परिणामी अत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले गेले. सद्यस्थितीत पाण्याचा उपसा, बाष्पीभवनामुळे धरणात वजा सहा टक्केच पाणी शिल्लक असल्याने आतापासूनच अक्कलकोट तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच विशेष म्हणजे पशू-प्राण्यांना पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे हाल सोसावे लागत आहेत. यामुळेच अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. 

बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपली आहेत. पाणीच नसल्याने उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. बँकेचे कर्ज काढून धरणातून जलवाहिनी नेलेल्या शेतकºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती, पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली.

जे पीक हाती आले त्यास बाजारभाव मिळाला नाही. यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता बहुसंख्य शेतकºयांना लागली आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणाºया चार महत्त्वाच्या जलाशयांपैकी कुरनूर धरण महत्त्वाचे आहे. या धरण क्षेत्रातच नगरपरिषदेने मोठी विहीर खोदली आहे. मात्र धरणातील पाणी आटत चालल्याने विहिरीतील पाणीपातळीत लक्षणीय घट होत चालली आहे. 

काही ठिकाणी दूरवर खड्डे मारून पाणी उपसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परंतु धरणातील पाणी आटत चालल्याने भूजल                     पातळीही कमी झाली आहे.  यामुळे भविष्यात अक्कलकोटवासीयांसह संपूर्ण तालुक्याच्या संकटात मोठी वाढ होणार आहे.

 

पाणीस्रोत आटले- तब्बल ८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या कुरनूर धरणाचा विशेषकरून चपळगाव, बावकरवाडी, हन्नूर, बºहाणपूर, कुरनूर, दहिटणे, मोट्याळ, डोंबरजवळगे, दर्शनाळ, बोरेगाव, चपळगाववाडी यांसह अनेक गावांतील बळीराजांना फायदा झाला आहे. मात्र यंदा धरणातील पाणी आटल्याने भूजल पातळीत कमालीची घट होऊन परिणामी पंचक्रोशीतील विहिरी, कूपनलिका, ओढे, तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्पासह इतर स्रोत कोरडेठाक पडले आहेत.

कुरनूर धरणातील पाणी आटत चालल्याने पिण्याच्या पाण्यासह  जनावरांचे हाल होत आहेत. चारा कोठून आणायचा, हा सुद्धा प्रश्न आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडल्याने आम्ही पशुपालक संकटात आहोेत. प्रशासनाने गटानिहाय चारा छावण्या सुरू कराव्या.         -उमेश पाटील, माजी सरपंच, चपळगाव

यावर्षी धरणात पाणीच नसल्याने हातची पिके गेली. शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे हा भाग संकटात सापडला आहे.-विश्वनाथ भरमशेट्टी, हन्नूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ