शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया, रब्बीची पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:54 IST

सर्वच पिकांचे नुकसान: परतीच्या पावसाने गुंगारा, ज्वारीची पेर नाही

ठळक मुद्देपाऊस नसल्याने खरीप हंगामावर परिणामकोणत्याही पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या हाती लागण्याची शक्यता नाहीपाऊस नसल्याने जनावरांच्या चाºयावरही परिणाम

सोलापूर: सरासरीच्या २६८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले खरीप वाया गेल्यात जमा असताना परतीच्या पावसानेही गुंगारा मारल्याने दरवर्षी १५ सप्टेंबरपासून सुरू होणारी रब्बी पेरणी यंदा सुरुच झाली नसल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. 

अत्यल्प पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सर्वच पिके गेली आहेत. तसा अहवालही कृषी खात्याने वरिष्ठांना दिला आहे. जिल्ह्याचे खरीप पेरणीचे उद्दिष्ट ७९ हजार हेक्टर असताना दोन लाख १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या; मात्र नंतर पाऊस गायब झाल्याने संपूर्ण खरीप पेर वाया गेली आहे. पाऊस नसल्याने खरिपाशिवाय ऊस, द्राक्ष, डाळिंब व अन्य पिकांवरही परिणाम झाला आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी असल्याने रब्बीचे क्षेत्र आठ लाख हेक्टरपर्यंत आहे; मात्र यावर्षी पावसाळ्यात व परतीचा पाऊसही नसल्याने रब्बी पेरणीला सुरुवातही झाली नाही. 

जिल्ह्यात साधारण १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत ज्वारीची पेरणी केली जाते. पावसाच्या प्रमाणावर पेरणीचा कालावधी काही अंशी बदलतो;  मात्र यावर्षी पाऊसच नसल्याने ज्वारीच्या पेरणीला सुरुवातही झाली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तालुक्यात सप्टेंबर महिन्यातच ज्वारीची पेरणी केली जाते. गुरुवारपर्यंत या तालुक्यात पेरणी झाल्याची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

पाऊस ४० टक्क्यांपर्यंतच..

दमदार पावसाची नक्षत्रे निघून गेली असून आतापर्यंत (गुरुवार दिनांक ४ आॅक्टोबर) ३९.७९ टक्के पाऊस पडला आहे. जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यात एकूण ५ हजार ३७७ मि. मी. तर सरासरी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते.  या कालावधीत प्रत्यक्षात एकूण २१४० मि.मी. व सरासरी १९४ मि.मी. पाऊस पडला आहे. बार्शी तालुक्यात ५९ टक्के, माळशिरस तालुक्यात ४७ टक्के तर अन्य सर्वच तालुक्यात ४० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. 

पाऊस नसल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. कोणत्याही पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या हाती लागण्याची शक्यता नाही. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाºयावरही परिणाम होणार आहे; मात्र मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेतला तर दिवाळीपर्यंतही पाऊस पडू शकतो.-बसवराज बिराजदार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

ऊस लागवडीवरही परिणामजिल्ह्यात जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत ऊस लागवडीची लगबग सुरू असते; मात्र यावर्षी पाऊस नसल्याने नवीन ऊस लागवडीवर परिणाम झाला आहे. उजनी धरणालगत काही भागात उसाची नव्याने लागवड झाली असल्याचे सांगण्यात आले; मात्र जिल्ह्याच्या इतर भागात सध्या असलेल्या उसाची वाढही चांगली  झाली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस