शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

सोलापूर जिल्ह्यातील खरीप हंगाम वाया, रब्बीची पेरणी खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 10:54 IST

सर्वच पिकांचे नुकसान: परतीच्या पावसाने गुंगारा, ज्वारीची पेर नाही

ठळक मुद्देपाऊस नसल्याने खरीप हंगामावर परिणामकोणत्याही पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या हाती लागण्याची शक्यता नाहीपाऊस नसल्याने जनावरांच्या चाºयावरही परिणाम

सोलापूर: सरासरीच्या २६८ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले खरीप वाया गेल्यात जमा असताना परतीच्या पावसानेही गुंगारा मारल्याने दरवर्षी १५ सप्टेंबरपासून सुरू होणारी रब्बी पेरणी यंदा सुरुच झाली नसल्याचे कृषी खात्याकडून सांगण्यात आले. 

अत्यल्प पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील सर्वच पिके गेली आहेत. तसा अहवालही कृषी खात्याने वरिष्ठांना दिला आहे. जिल्ह्याचे खरीप पेरणीचे उद्दिष्ट ७९ हजार हेक्टर असताना दोन लाख १२ हजार हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. सुरुवातीला काही प्रमाणात पाऊस पडल्याने शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या; मात्र नंतर पाऊस गायब झाल्याने संपूर्ण खरीप पेर वाया गेली आहे. पाऊस नसल्याने खरिपाशिवाय ऊस, द्राक्ष, डाळिंब व अन्य पिकांवरही परिणाम झाला आहे. सोलापूर जिल्हा हा रब्बी असल्याने रब्बीचे क्षेत्र आठ लाख हेक्टरपर्यंत आहे; मात्र यावर्षी पावसाळ्यात व परतीचा पाऊसही नसल्याने रब्बी पेरणीला सुरुवातही झाली नाही. 

जिल्ह्यात साधारण १५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या कालावधीत ज्वारीची पेरणी केली जाते. पावसाच्या प्रमाणावर पेरणीचा कालावधी काही अंशी बदलतो;  मात्र यावर्षी पाऊसच नसल्याने ज्वारीच्या पेरणीला सुरुवातही झाली नसल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ या तालुक्यात सप्टेंबर महिन्यातच ज्वारीची पेरणी केली जाते. गुरुवारपर्यंत या तालुक्यात पेरणी झाल्याची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

पाऊस ४० टक्क्यांपर्यंतच..

दमदार पावसाची नक्षत्रे निघून गेली असून आतापर्यंत (गुरुवार दिनांक ४ आॅक्टोबर) ३९.७९ टक्के पाऊस पडला आहे. जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर या चार महिन्यात एकूण ५ हजार ३७७ मि. मी. तर सरासरी ४८८.८३ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षीत होते.  या कालावधीत प्रत्यक्षात एकूण २१४० मि.मी. व सरासरी १९४ मि.मी. पाऊस पडला आहे. बार्शी तालुक्यात ५९ टक्के, माळशिरस तालुक्यात ४७ टक्के तर अन्य सर्वच तालुक्यात ४० टक्केपेक्षा कमी पाऊस पडला आहे. 

पाऊस नसल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. कोणत्याही पिकांचे उत्पादन शेतकºयांच्या हाती लागण्याची शक्यता नाही. पाऊस नसल्याने जनावरांच्या चाºयावरही परिणाम होणार आहे; मात्र मागील काही वर्षाचा अनुभव लक्षात घेतला तर दिवाळीपर्यंतही पाऊस पडू शकतो.-बसवराज बिराजदार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

ऊस लागवडीवरही परिणामजिल्ह्यात जुलै ते आॅक्टोबर या कालावधीत ऊस लागवडीची लगबग सुरू असते; मात्र यावर्षी पाऊस नसल्याने नवीन ऊस लागवडीवर परिणाम झाला आहे. उजनी धरणालगत काही भागात उसाची नव्याने लागवड झाली असल्याचे सांगण्यात आले; मात्र जिल्ह्याच्या इतर भागात सध्या असलेल्या उसाची वाढही चांगली  झाली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस