शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रामाकडे जावा किंवा काशीला तुम्ही लाेकांच्या मनातून उतरला; सदाभाऊ खोतांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2022 12:34 IST

सदाभाऊ खाेत : आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका

सोलापूर : राज्यातील मंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांवर बाेलायला हवे. पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि त्यांचे युवराज देशाच्या वारीवर जातात. रामाकडे जावा किंवा काशीला जावा, तुम्ही जनतेच्या मनातून उतरले आहात, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांनी येथे केली.

पंचायत समितीच्या समितीच्या दाैऱ्यानिमित्त खाेत सोलापूर शहरात आहेत. खाेत यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अयाेध्या दाैऱ्यावर टीका केली. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. गोंधळ घातला. भाजपवर टीका करताना ज्यांनी राममंदिर बांधायची यांच्यात हिंमत नाही असे सांगितले. आता तेच लाेक अयाेध्येला निघाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या देहू दाैऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बाेलू दिले नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या हाेत्या. यावर खाेत म्हणाले, मला या लोकांचे हसू येते. काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा, बघू तुमची दानत आहे का? मला वाटते की, महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. सुप्रिया सुळेंनी तो शपथविधी आठवावा, मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही? प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगे काय? असा टाेला खाेत यांनी लगावला.

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे