शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी राज्यात जनप्रबोधन यात्रा निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 19:45 IST

रघुनाथ पाटील यांची माहिती- २८ नाेव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रम

सोलापूर : शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने २८ नाेव्हेंबर ते १२ डिसेंबर २०२० या कालावधीत राज्यभरातून जनप्रबोधन यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या यात्रेत सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करणे, कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर मदत करणे, शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे अप्रत्यक्ष कर कमी करणे, शेतीमालाच्याशेती उत्पादनातून तयार होणाऱ्या पक्क्या मालाच्या किमतीची तुलना कच्च्या मालाशी करणे, सी. रंगराजन समितीच्या शिफारसींच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आखणे, शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे आदी प्रश्नांबाबत या पंधरवड्यात सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ही प्रबोधन यात्रा २८ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील निपाणी, नेसरी व कुरुकली येथे सभा घेण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर रोजी इचलकरंजी, अर्जुनवाडा येथे सभा होईल, १ डिसेंबरला सांगलीत मेळावा, खरशिंग येथे सभा होणार आहे, २ डिसेंबरला इस्लामपूर येथे मेळावा, ३ डिसेंबरला पलूस, कडेगाव-आटपाडी येथे सभा, ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सभा, मेळावे, ६ डिसेंबरला अहमदनगर, ८ डिसेंबरला पुणे, ११ ला सातारा, फलटण, वाठार स्टेशन, वाई सभा, १२ ला कराड येथे सभा घेऊन सातारा येथे यात्रेची सांगता होणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस शेतकरी संघटनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंचFarmerशेतकरीagricultureशेती