शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जालियनवाला बाग हत्याकांडाची शतकपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:02 IST

जालियनवाला बाग हत्याकांड; आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली.

१९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध झाले. इंग्लंडसहित दोस्तराष्टÑांची या युद्धात सरशी झाली होती. त्यामुळे ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेत मुजोरी व मस्तवालपणा शिरलेला होता. जगभर पसरलेले ब्रिटिश साम्राज्य अधिक मजबूत व्हावे म्हणून वसाहतीमधील ब्रिटिश प्रशासन अधिक सतर्क होते. या प्रशासनात असणाºया अधिकाºयांची मानसिकता अरेरावी, उद्धट व आक्रमक होती.

इंग्लंडमधील राज्यकर्ते यांनी रौलेट कमिशन नेमले होते. त्यांनी ब्रिटिश सत्ता अधिक मजबूत व्हावी म्हणून कायद्याचे प्रारूप इंग्लंडच्या कायदे मंडळात मांडले होते. त्याला रौलेट अ‍ॅक्ट म्हणतात. या रौलेट अ‍ॅक्ट कायद्याप्रमाणे कोणालाही विनाचौकशी तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होणार होते.

स्वातंत्र्यासाठी भारतात काँग्रेससहित अनेक राजकीय गट-तट कार्यरत होते. या कायद्याने लोकचळवळ दाबली जाणार हे त्यांनी ओळखले होते. अनेकांनी या कायद्याला विरोध केला. काही लोकांनी त्याला ‘काळा कायदा’ म्हटले. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर (पंजाब) गावात सुवर्णमंदिराशेजारी असणाºया जालियनवाला बागेत हजारो स्त्री-पुरुष प्रार्थनेसाठी सभेत जमले होते. या सभेत स्वातंत्र्याचा जयजयकार होत होता. तसेच महात्मा गांधींचाही जयजयकार होत होता.

या बागेत जाण्यासाठी सात ते आठ फुटांची एकमेव चिंचोळी वाट होती. या  एकाच मार्गाने लोक आत येत व बाहेरही जात असत. ही वाट जनरल डायर या ब्रिटिश अधिकाºयाने आपल्यासोबत आणलेल्या शिपायांसह अडविली. हा प्रकार पाहून सभेत जमलेले लोक भांबावले. काही जण हताश झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता डायरने आपल्या शिपायांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. काही मिनिटांत त्या बागेत अनेक लोक जमिनीवर पडले. जखमी स्त्री-पुरुषांच्या किंकाळ्यांनी भरून गेली. या हत्याकांडात ३७९ लोक मृत्युमुखी पडले़ सुमारे १२०० पेक्षा अधिक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला, जगही हादरले.

नि:शस्त्र व शांततेने एकत्र येणाºया व मैदानात प्रार्थना करणाºया जमावावर अमानुष गोळीबार होण्याची घटना प्रथमच घडली होती. सर्व जगातून निषेध होऊ लागला. ‘ब्रिटिश परंपरेला कलंक लावणारी गोष्ट झाली’ असे चर्चिल म्हणाले. ब्रिटिशांच्या या अत्याचाराचा रवींद्रनाथ टागोरांवर एवढा परिणाम झाला की, ब्रिटिशांनी त्यांना देऊ केलेला ‘नाईट हूड’ ही पदवी त्यांनी परत केली. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धात ब्रिटिशांच्या शांती व सेवासेनेत दाखल होऊन उपकारक काम केल्यामुळे त्यांना हिंद केसरी (कैसर-ए-हिंद) ही पदवी दिली होती. गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करून ही पदवी ब्रिटिशांना परत केली. महात्मा गांधी म्हणाले, ‘हे राज्य ईश्वराचे नसून, सैतानाचे आहे.’

काँग्रेसने हत्याकांडाची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी जबाबदारी गांधीजींवर सोपविली. गांधीजी अनेक दिवस अमृतसरमध्ये राहिले. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. हत्याकांड व जुलूम जबरदस्तीचे तपशील एकत्र आले. गांधींच्या शिस्तप्रिय व विधिज्ञ वृत्तीमुळे पाशवी व जुलमी वृत्तीचे स्वरूप संपूर्ण जगाला माहीत झाले.

आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली. असहकार आंदोलन, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, छोडो भारत चळवळ या मार्गाने जनतेचा सहभाग वाढवून साम्राज्यवादाला धक्के दिले जाऊ लागले. या सर्व महासंग्रामात जालियनवाला बागेतील निरपराध व नि:शस्त्र जनतेप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांचा गोळीबारात मृत्यू घडून आला. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. आजचा दिवस त्यांच्या त्यागाचा व समर्पित जीवनाची आठवण करण्याचा आहे. या सर्व हौतात्म्य पत्करणाºया कार्यकर्त्यांना नम्र आदरांजली. या हत्याकांडानंतर बदला घेण्याची भावना भारतीयांच्या मनात निर्माण झाली. सरदार उधमसिंग या तरुणाने १९४० साली जनरल डायर याचा लंडनमध्ये गोळ्या घालून खून केला व भारतीयांच्या मनातील बदला घेण्याची पूर्तता केली.-  एस. एस. सलगर(लेखक हे समाजसेवक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूर