शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जालियनवाला बाग हत्याकांडाची शतकपूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:02 IST

जालियनवाला बाग हत्याकांड; आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली.

१९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध झाले. इंग्लंडसहित दोस्तराष्टÑांची या युद्धात सरशी झाली होती. त्यामुळे ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेत मुजोरी व मस्तवालपणा शिरलेला होता. जगभर पसरलेले ब्रिटिश साम्राज्य अधिक मजबूत व्हावे म्हणून वसाहतीमधील ब्रिटिश प्रशासन अधिक सतर्क होते. या प्रशासनात असणाºया अधिकाºयांची मानसिकता अरेरावी, उद्धट व आक्रमक होती.

इंग्लंडमधील राज्यकर्ते यांनी रौलेट कमिशन नेमले होते. त्यांनी ब्रिटिश सत्ता अधिक मजबूत व्हावी म्हणून कायद्याचे प्रारूप इंग्लंडच्या कायदे मंडळात मांडले होते. त्याला रौलेट अ‍ॅक्ट म्हणतात. या रौलेट अ‍ॅक्ट कायद्याप्रमाणे कोणालाही विनाचौकशी तुरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला प्राप्त होणार होते.

स्वातंत्र्यासाठी भारतात काँग्रेससहित अनेक राजकीय गट-तट कार्यरत होते. या कायद्याने लोकचळवळ दाबली जाणार हे त्यांनी ओळखले होते. अनेकांनी या कायद्याला विरोध केला. काही लोकांनी त्याला ‘काळा कायदा’ म्हटले. १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर (पंजाब) गावात सुवर्णमंदिराशेजारी असणाºया जालियनवाला बागेत हजारो स्त्री-पुरुष प्रार्थनेसाठी सभेत जमले होते. या सभेत स्वातंत्र्याचा जयजयकार होत होता. तसेच महात्मा गांधींचाही जयजयकार होत होता.

या बागेत जाण्यासाठी सात ते आठ फुटांची एकमेव चिंचोळी वाट होती. या  एकाच मार्गाने लोक आत येत व बाहेरही जात असत. ही वाट जनरल डायर या ब्रिटिश अधिकाºयाने आपल्यासोबत आणलेल्या शिपायांसह अडविली. हा प्रकार पाहून सभेत जमलेले लोक भांबावले. काही जण हताश झाले. कोणतीही पूर्वसूचना न देता डायरने आपल्या शिपायांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. काही मिनिटांत त्या बागेत अनेक लोक जमिनीवर पडले. जखमी स्त्री-पुरुषांच्या किंकाळ्यांनी भरून गेली. या हत्याकांडात ३७९ लोक मृत्युमुखी पडले़ सुमारे १२०० पेक्षा अधिक जखमी झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला, जगही हादरले.

नि:शस्त्र व शांततेने एकत्र येणाºया व मैदानात प्रार्थना करणाºया जमावावर अमानुष गोळीबार होण्याची घटना प्रथमच घडली होती. सर्व जगातून निषेध होऊ लागला. ‘ब्रिटिश परंपरेला कलंक लावणारी गोष्ट झाली’ असे चर्चिल म्हणाले. ब्रिटिशांच्या या अत्याचाराचा रवींद्रनाथ टागोरांवर एवढा परिणाम झाला की, ब्रिटिशांनी त्यांना देऊ केलेला ‘नाईट हूड’ ही पदवी त्यांनी परत केली. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत बोअर युद्धात ब्रिटिशांच्या शांती व सेवासेनेत दाखल होऊन उपकारक काम केल्यामुळे त्यांना हिंद केसरी (कैसर-ए-हिंद) ही पदवी दिली होती. गांधींनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करून ही पदवी ब्रिटिशांना परत केली. महात्मा गांधी म्हणाले, ‘हे राज्य ईश्वराचे नसून, सैतानाचे आहे.’

काँग्रेसने हत्याकांडाची चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठी जबाबदारी गांधीजींवर सोपविली. गांधीजी अनेक दिवस अमृतसरमध्ये राहिले. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. हत्याकांड व जुलूम जबरदस्तीचे तपशील एकत्र आले. गांधींच्या शिस्तप्रिय व विधिज्ञ वृत्तीमुळे पाशवी व जुलमी वृत्तीचे स्वरूप संपूर्ण जगाला माहीत झाले.

आज या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेनंतर काँग्रेसने स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरू केली. असहकार आंदोलन, संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी, छोडो भारत चळवळ या मार्गाने जनतेचा सहभाग वाढवून साम्राज्यवादाला धक्के दिले जाऊ लागले. या सर्व महासंग्रामात जालियनवाला बागेतील निरपराध व नि:शस्त्र जनतेप्रमाणे अनेक कार्यकर्त्यांचा गोळीबारात मृत्यू घडून आला. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. आजचा दिवस त्यांच्या त्यागाचा व समर्पित जीवनाची आठवण करण्याचा आहे. या सर्व हौतात्म्य पत्करणाºया कार्यकर्त्यांना नम्र आदरांजली. या हत्याकांडानंतर बदला घेण्याची भावना भारतीयांच्या मनात निर्माण झाली. सरदार उधमसिंग या तरुणाने १९४० साली जनरल डायर याचा लंडनमध्ये गोळ्या घालून खून केला व भारतीयांच्या मनातील बदला घेण्याची पूर्तता केली.-  एस. एस. सलगर(लेखक हे समाजसेवक आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूर